शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वीज बिल वसुलीवरून महावितरणचे कर्मचारी दुहेरी कात्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 11:55 IST

mahavitaran Kolhapur- लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यावरून जनता आणि सरकार यांच्यामधील संघर्षाचा त्रास मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. वसुलीची मोहीम तीव्र केल्याच्या काही दिवसातच जिल्ह्यात १५ वायरमनना जनतेकडून मार खावा लागला आहे. एका बाजूला महावितरण अधिकाऱ्यांचा मार्चपर्यंत १०० टक्के वसुलीचा दबाब आणि दुसऱ्या बाजूला जनतेकडून मार, अशा दुहेरी कात्रीत हे कर्मचारी अडकले आहेत.

ठळक मुद्देवीज बिल वसुलीवरून महावितरणचे कर्मचारी दुहेरी कात्रीत ग्राहकांकडून आतापर्यंत १५ कर्मचाऱ्यांना मारहाण

कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यावरून जनता आणि सरकार यांच्यामधील संघर्षाचा त्रास मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. वसुलीची मोहीम तीव्र केल्याच्या काही दिवसातच जिल्ह्यात १५ वायरमनना जनतेकडून मार खावा लागला आहे. एका बाजूला महावितरण अधिकाऱ्यांचा मार्चपर्यंत १०० टक्के वसुलीचा दबाब आणि दुसऱ्या बाजूला जनतेकडून मार, अशा दुहेरी कात्रीत हे कर्मचारी अडकले आहेत.लॉकडाऊन काळातील वीज बिलांचा भरणा करण्यावरून सर्वसामान्य जनता व सरकार आमने-सामने उभे ठाकले आहेत. एप्रिलपासून एकही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजाराहून अधिक कनेक्शन्स तोडली आहेत.

तोडलेले कनेक्शन जोडण्यासाठी ३०० रुपये सेवाशुल्कही आकारले जात असल्याने सर्वसामान्य जनतेच्या संतापात आणखीन भर पडली आहे. त्यातून कनेक्शन तोडण्यास येणाऱ्या १५ वायरमनना आतापर्यंत मारहाण केली आहे.हे कर्मचारी महावितरणचे नोकर आहेत. त्यांना महावितरणने मार्चअखेरपर्यंत १०० टक्के वसुलीचे टार्गेट दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करावेच, असे सांगून त्याप्रमाणे त्यांना रोज प्रत्येक गावात धाडले जात आहे. पण तेथे जनतेकडून मार खावा लागत असल्याने, या कर्मचाऱ्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी झाली आहे. वाद सरकारशी आहे, त्याचा राग वायरमनवर का काढता, असा संतप्त सवाल ते करू लागले आहेत.कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे धावकर्मचाऱ्यांना मारहाण होण्याचे प्रमाण वाढल्याने महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनने सोमवारी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडेच धाव घेतली आहे. संघटनेचे कृष्णा भोयर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, मारहाणीकडे लक्ष वेधताना संरक्षणाची मागणी केली आहे. महावितरणची सरकारी कंपनी असल्याने तिला वाचविणेही महत्त्वाचे असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.संरक्षण द्याल, आमच्याशी गाठमहावितरणच्या कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे संरक्षणाची मागणी केल्यानंतर वीजग्राहकांचे नेतृत्व करणाऱ्या इरिगेशन फेडरेशन व वीज बिल भरणार नाही कृती समितीने वसुलीसाठी व कनेक्शन तोडण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला संरक्षण पुरवू नये, पोलिसांनीही जनतेच्याच पाठीशी उभे राहावे, असे पत्र तयार करून पोलीस प्रशासनाकडे देण्याची तयारी केली आहे, अशी माहिती विक्रांत पाटील किणीकर यांनी दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर