शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

वीज बिल वसुलीवरून महावितरणचे कर्मचारी दुहेरी कात्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 11:55 IST

mahavitaran Kolhapur- लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यावरून जनता आणि सरकार यांच्यामधील संघर्षाचा त्रास मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. वसुलीची मोहीम तीव्र केल्याच्या काही दिवसातच जिल्ह्यात १५ वायरमनना जनतेकडून मार खावा लागला आहे. एका बाजूला महावितरण अधिकाऱ्यांचा मार्चपर्यंत १०० टक्के वसुलीचा दबाब आणि दुसऱ्या बाजूला जनतेकडून मार, अशा दुहेरी कात्रीत हे कर्मचारी अडकले आहेत.

ठळक मुद्देवीज बिल वसुलीवरून महावितरणचे कर्मचारी दुहेरी कात्रीत ग्राहकांकडून आतापर्यंत १५ कर्मचाऱ्यांना मारहाण

कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यावरून जनता आणि सरकार यांच्यामधील संघर्षाचा त्रास मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. वसुलीची मोहीम तीव्र केल्याच्या काही दिवसातच जिल्ह्यात १५ वायरमनना जनतेकडून मार खावा लागला आहे. एका बाजूला महावितरण अधिकाऱ्यांचा मार्चपर्यंत १०० टक्के वसुलीचा दबाब आणि दुसऱ्या बाजूला जनतेकडून मार, अशा दुहेरी कात्रीत हे कर्मचारी अडकले आहेत.लॉकडाऊन काळातील वीज बिलांचा भरणा करण्यावरून सर्वसामान्य जनता व सरकार आमने-सामने उभे ठाकले आहेत. एप्रिलपासून एकही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजाराहून अधिक कनेक्शन्स तोडली आहेत.

तोडलेले कनेक्शन जोडण्यासाठी ३०० रुपये सेवाशुल्कही आकारले जात असल्याने सर्वसामान्य जनतेच्या संतापात आणखीन भर पडली आहे. त्यातून कनेक्शन तोडण्यास येणाऱ्या १५ वायरमनना आतापर्यंत मारहाण केली आहे.हे कर्मचारी महावितरणचे नोकर आहेत. त्यांना महावितरणने मार्चअखेरपर्यंत १०० टक्के वसुलीचे टार्गेट दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करावेच, असे सांगून त्याप्रमाणे त्यांना रोज प्रत्येक गावात धाडले जात आहे. पण तेथे जनतेकडून मार खावा लागत असल्याने, या कर्मचाऱ्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी झाली आहे. वाद सरकारशी आहे, त्याचा राग वायरमनवर का काढता, असा संतप्त सवाल ते करू लागले आहेत.कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे धावकर्मचाऱ्यांना मारहाण होण्याचे प्रमाण वाढल्याने महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनने सोमवारी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडेच धाव घेतली आहे. संघटनेचे कृष्णा भोयर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, मारहाणीकडे लक्ष वेधताना संरक्षणाची मागणी केली आहे. महावितरणची सरकारी कंपनी असल्याने तिला वाचविणेही महत्त्वाचे असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.संरक्षण द्याल, आमच्याशी गाठमहावितरणच्या कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे संरक्षणाची मागणी केल्यानंतर वीजग्राहकांचे नेतृत्व करणाऱ्या इरिगेशन फेडरेशन व वीज बिल भरणार नाही कृती समितीने वसुलीसाठी व कनेक्शन तोडण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला संरक्षण पुरवू नये, पोलिसांनीही जनतेच्याच पाठीशी उभे राहावे, असे पत्र तयार करून पोलीस प्रशासनाकडे देण्याची तयारी केली आहे, अशी माहिती विक्रांत पाटील किणीकर यांनी दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर