शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीचा निकाल चुकीच्या निकषावर, हजारो उमेदवारांना फटका

By संदीप आडनाईक | Updated: July 17, 2023 16:13 IST

घाईघाईने निकाल कशासाठी? चाचणीबाबत मॅटमध्ये सुनावणी सुरू असतानाच मर्जीचे निकष

संदीप आडनाईककोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गाकरिता घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीतील तांत्रिक चुकांसंदर्भात मॅटमध्ये सुनावणी सुरू असतानाच आयोगाने स्वत:च्या मर्जीच्या निकषावर गेल्या आठवड्यात घाईघाईत निकाल जाहीर केला. याचा फटका हजारो गुणवत्ताधारक उमेदवारांना बसला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २३ मार्चच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील मंत्रालयीन लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गासाठी १३०० जागांसाठी पात्र ठरलेल्या ३००३ उमेदवारांसाठी ७ एप्रिल ३००३ उमेदवारांसाठी मुंबईतील केंद्रावर कौशल्य चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे उमेदवारांनी आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने १२ आणि १३ एप्रिल रोजी 'संभ्रम टंकलेखन चाचणीचा' या मालिकेद्वारे प्रकाश टाकला होता. यानंतर तब्बल ७० उमेदवारांनी १५ एप्रिल रोजी मॅटमध्ये तक्रार दिली होती. दरम्यान, आयोगाने तक्रारीची दखल घेऊन ३१ मे या दिवशी ही चाचणी पुन्हा घेतली, त्यातही असंख्य त्रुटी झाल्याची तक्रार उमेदवारांनी केली होती.हे उमेदवार ३ एप्रिल २०२२ रोजी पूर्व परीक्षा आणि ६ ऑक्टोबर २०२२ रोजी मुख्य परीक्षा पात्र ठरले आहेत. या परीक्षेला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी पुन्हा तांत्रिक समस्या आणि अमर्यादित उतारा टंकलेखनासाठी दिल्याबद्दल १५ एप्रिलला मॅटमध्ये तक्रार दिली होती. याबाबत २८ जुलै रोजी सुनावणी होणार असतानाच तत्पूर्वीच आयोगाने या चाचणीचा निकाल ११ जुलै रोजी घाईघाईत घोषित केला. यात आयोगाने स्वत:चाच निकष डावलून निकाल लावल्याने अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे.निकष चुकीचा

  • आयोगाने लिपिक, टंकलेखक परीक्षा अंतिम टप्प्यावर असताना स्वत:च काढलेल्या अधिसूचनेच्या विरुद्ध जावून मनमानी करत चुकीच्या निकषावर हा निकाल जाहीर केला आहे. याचा हजारो गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे. या निकालामुळे अनेकांना प्रचंड धक्का बसला आहे.
  • ज्या निकषावर आयोगाने हा निकाल लावला, तो यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या एकाही अधिसूचनेत नसताना हा बदल ऐनवेळी करून उमेदवारांना फटका दिला आहे. हा निकाल कोणाच्या भल्यासाठी लावला, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे.

अमर्यादित उताऱ्याबाबत लेखी आक्षेप७ एप्रिल आणि ३१ मे या दिवशी घेण्यात आलेल्या या चाचणीसाठी दिलेल्या अमर्यादित उताऱ्याबाबत उमेदवारांनी आयोगाकडे ३१ मे या चाचणीच्या दिवशीच ई-मेल आणि लेखी पत्राने आक्षेप घेतला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षा