शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

एमपीएससीचा निकाल चुकीच्या निकषावर, हजारो उमेदवारांना फटका

By संदीप आडनाईक | Updated: July 17, 2023 16:13 IST

घाईघाईने निकाल कशासाठी? चाचणीबाबत मॅटमध्ये सुनावणी सुरू असतानाच मर्जीचे निकष

संदीप आडनाईककोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गाकरिता घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीतील तांत्रिक चुकांसंदर्भात मॅटमध्ये सुनावणी सुरू असतानाच आयोगाने स्वत:च्या मर्जीच्या निकषावर गेल्या आठवड्यात घाईघाईत निकाल जाहीर केला. याचा फटका हजारो गुणवत्ताधारक उमेदवारांना बसला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २३ मार्चच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील मंत्रालयीन लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गासाठी १३०० जागांसाठी पात्र ठरलेल्या ३००३ उमेदवारांसाठी ७ एप्रिल ३००३ उमेदवारांसाठी मुंबईतील केंद्रावर कौशल्य चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे उमेदवारांनी आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने १२ आणि १३ एप्रिल रोजी 'संभ्रम टंकलेखन चाचणीचा' या मालिकेद्वारे प्रकाश टाकला होता. यानंतर तब्बल ७० उमेदवारांनी १५ एप्रिल रोजी मॅटमध्ये तक्रार दिली होती. दरम्यान, आयोगाने तक्रारीची दखल घेऊन ३१ मे या दिवशी ही चाचणी पुन्हा घेतली, त्यातही असंख्य त्रुटी झाल्याची तक्रार उमेदवारांनी केली होती.हे उमेदवार ३ एप्रिल २०२२ रोजी पूर्व परीक्षा आणि ६ ऑक्टोबर २०२२ रोजी मुख्य परीक्षा पात्र ठरले आहेत. या परीक्षेला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी पुन्हा तांत्रिक समस्या आणि अमर्यादित उतारा टंकलेखनासाठी दिल्याबद्दल १५ एप्रिलला मॅटमध्ये तक्रार दिली होती. याबाबत २८ जुलै रोजी सुनावणी होणार असतानाच तत्पूर्वीच आयोगाने या चाचणीचा निकाल ११ जुलै रोजी घाईघाईत घोषित केला. यात आयोगाने स्वत:चाच निकष डावलून निकाल लावल्याने अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे.निकष चुकीचा

  • आयोगाने लिपिक, टंकलेखक परीक्षा अंतिम टप्प्यावर असताना स्वत:च काढलेल्या अधिसूचनेच्या विरुद्ध जावून मनमानी करत चुकीच्या निकषावर हा निकाल जाहीर केला आहे. याचा हजारो गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे. या निकालामुळे अनेकांना प्रचंड धक्का बसला आहे.
  • ज्या निकषावर आयोगाने हा निकाल लावला, तो यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या एकाही अधिसूचनेत नसताना हा बदल ऐनवेळी करून उमेदवारांना फटका दिला आहे. हा निकाल कोणाच्या भल्यासाठी लावला, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे.

अमर्यादित उताऱ्याबाबत लेखी आक्षेप७ एप्रिल आणि ३१ मे या दिवशी घेण्यात आलेल्या या चाचणीसाठी दिलेल्या अमर्यादित उताऱ्याबाबत उमेदवारांनी आयोगाकडे ३१ मे या चाचणीच्या दिवशीच ई-मेल आणि लेखी पत्राने आक्षेप घेतला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षा