शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोल्हापूरचे खासदार चमकले... प्रश्न रेंगाळले...!

By admin | Updated: May 26, 2016 01:05 IST

मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण : नव्या सरकारच्या काळातही जिल्ह्याच्या विकासाची पावले अडखळतच; राजकीय ताकदही कमी पडली

विकासात्मक पातळीवर शेट्टींची आघाडीखासदार राजू शेट्टी यांनी दोन वर्षांत रस्ते, रेल्वे पूल आदीसाठी केंद्राकडून २०० कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवरील कोकण रेल्वे, रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणास मंजुरी आणून विदर्भ, मराठवाडा व कोकणाला पश्चिम महाराष्ट्र जोडण्यात, मिरज ते पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणास मंजुरीत महत्त्वाची भूमिका बजावली. जादा ऊस दरासाठी सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले. निर्यात अनुदान, मळीवरील बंदी उठवून कारखानदारांना दिलासा दिला. कोल्हापूर : केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला आज, गुरुवारी दोन वर्षे होत आहेत. नव्या सरकारने लोकांना जी स्वप्ने दाखविली, त्यातील किती पूर्ण झाली हा संशोधनाचा विषय आहे. नव्या सरकारच्या काळात कोल्हापूरच्या विकासाचे पाऊल पुढे पडले का, याचा धांडोळा घेतल्यास त्यातून फारसे काही हाती लागत नाही. दोन्ही खासदार व्यक्तिगत पातळीवर चमकल्याचे दिसत असले तरी, कोल्हापूरच्या प्रश्नांना गती देण्यात त्यांना पुरेसे यश आलेले दिसत नाही. राजकीय ताकद कमी पडत असल्याचेच हे द्योतक आहे. ‘टॉप थ्री’ची महाडिकांना पोहोचपावतीएकेकाळी कोल्हापूरच्या खासदारांना उपहासाने ‘मौनीबाबा’ म्हटले जायचे. परंतु खासदारांची ही ‘मौनीबाबा’ची प्रतिमा धनंजय महाडिक यांनी प्रयत्नपूर्वक पुसून तर काढलीच; शिवाय संसदीय कामकाजातील ‘टॉप थ्री’ खासदारांच्या यादीत स्थान पटकावले, हीच त्यांच्या दोन वर्षांतील खासदारकीच्या कामाची पोहोचपावती म्हणावी लागते. खासदार महाडिक यांनी जिल्ह्यातील विकासकामांसाठी २१२ कोटींचा निधी खेचून आणण्यातही यश मिळविले. दोन वर्षांत त्यांनी ५३८ विषयांवर लोकसभेत भाषणे केली आहेत. त्यांचा शालेय विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्याचा विषय तर केंद्र सरकारतर्फे धोरण म्हणून स्वीकारला गेला. साखर उद्योगातील चढउतार आणि या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारला त्यांनी उपाययोजना सुचविल्या आहेत. निधी आणण्यातील अपयशाने पंचगंगा प्रदूषितचपंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठीचा १०८ कोटी ९३ लाखांचा प्रकल्प अहवाल निधीसाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे वर्षापूर्वी पाठविण्यात आला होता. मात्र, निधी आणण्यात खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक यांना यश आले नाही. त्यामुळे अजूनही पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करता आलेल्या नाहीत. नदीकाठावरील ३८ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळते. परिणामी नदीतील पाणी प्रदूषित होत आहे. विकास आराखड्याच्या पुढे ‘उड्डाण’ नाहीचदेशातील लो-कॉस्ट विमानतळांमध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश करण्याचे काम भाजप सरकारकडून झाले आहे. विमानतळाच्या विकासाचा आराखडाही तयार केला आहे. त्यापुढे सरकारकडून काहीच पाऊल पडले नाही. विकास व विस्ताराबाबतचे सर्वेक्षण पूर्ण केले असले तरी विस्तारीकरणासाठी वनविभागाची जमीन संपादित करण्याबाबतचा गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा ठरावाचा मुद्दा दीड वर्षापासून अडखळला आहे.‘आदर्श गाव’मध्ये खासदार नापासकेंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदारांनी आदर्श ग्राम करण्यासाठी दत्तक घेतलेल्या गावच्या सर्वांगीण विकासातही दोन्ही खासदार नापास झाल्याची प्रतिक्रिया संबंधित ग्रामस्थांमधून उमटत आहेत. गावचा कायापालट होईल यासंबंधी त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ‘सांसद आदर्श ग्राम योजना’ सुरू केली. योजनेंतर्गत जिल्ह्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी यांनी पेरिड (ता. शाहूवाडी), कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार धनंजय महाडिक यांनी राजगोळी खुर्द (ता. चंदगड), राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी सोनवडे (ता. शाहूवाडी) गाव गेल्यावर्षी दत्तक घेतले. या योजनेतून गावची निवड झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली; पण या योजनेसाठी स्वतंत्र असा निधी नाही. त्यामुळे विकासकामे करण्यावर मर्यादा आल्या. खासदार शेट्टी, खासदार महाडिक सध्याच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेतून काही विकासकामे केली आहेत; पण सर्वांगीण विकास झालेला नाही, असे ग्रामस्थांचे मत आहे.