शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

उदगावात आघाडीत हालचाली, स्वाभिमानीत शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST

शुभम गायकवाड : उदगाव उदगावची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये आघाडीच्या आठ तर स्वाभिमानीच्या नऊ जागा निवडून ...

शुभम गायकवाड : उदगाव

उदगावची निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये आघाडीच्या आठ तर स्वाभिमानीच्या नऊ जागा निवडून आल्या. हीच परिस्थिती कायम राहील, अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतु, निराशेच्या गर्तेत गेलेल्या आघाडीने आमच्याकडे जिल्हा परिषद, मंत्रिपद, खासदारकी आहे. त्यामुळे आम्हीच गावाचा विकास करू शकतो, हा विश्वास दिला व आश्वासनांची खैरात केल्याने स्वाभिमानीकडून निवडून आलेल्या कलीमुन नदाफ यांनी थेट पत्रकार परिषद घेत आघाडीत प्रवेश केल्याने सारे चित्रच पालटले.

निवडणुकीसाठी स्वाभिमानी विरुद्ध काँग्रेस, शिवसेना, यड्रावकर गट अशी आघाडी आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत आघाडीला आठ तर स्वाभिमानीला आठ असा समसमान कौल मतदारांनी दिला. स्वाभिमानीची एक जागा बिनविरोध झाल्याने त्यांच्या पदरात नऊ जागा पडल्या. काठावरच्या बहुमताने स्वाभिमानी सुरुवातीपासूनच अस्वस्थ होती. त्यातच एका सदस्याने प्रवेश केल्याने बालेकिल्ल्यातच खिंडार पडल्याने आघाडीच्या नेत्यांविरुद्ध माजी सभापती सावकर मादनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील यांच्याकडे त्यांनी तसे म्हणणे मांडल्याचे समजते, तर आघाडीकडून समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, बाळासोा कोळी, राजू मगदूम यांनी स्थानिक निवडणुकीत संदर्भ वेगळे आहेत, आम्हाला आमच्या स्तरावर निर्णय घेऊ द्या, अशी थेट भूमिका नेत्यांजवळ व्यक्त केली आहे. दरम्यान, सरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर सदस्य सहलीला गेले आहेत.