शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

महिला बचत गट एक चळवळ ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:26 IST

भारत पाटील महाराष्ट्र शासनाने महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिला स्वयंसाहाय्यता बचत गट ही नवीन संकल्पना आणलेली होती. यामध्ये गावोगावी ...

भारत पाटीलमहाराष्ट्र शासनाने महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिला स्वयंसाहाय्यता बचत गट ही नवीन संकल्पना आणलेली होती. यामध्ये गावोगावी महिलांचे बचत गट तयार करणे व तो बचत गट बँकेशी जोडणे हे पहिल्या टप्प्यामध्ये नियोजन होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (ऊफऊअ) व महिला बालकल्याण या विभागांच्यावतीने अध्यक्ष अण्णासाहेब नवणे व उपाध्यक्ष बळीराम देसाई यांच्या नेतृत्वाखाली व सी.ई.ओ. प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदशर्नाखाली प्रकल्प संचालक आनंद पुसावळे हे या कार्यक्रमाचे समन्वयक होते. दहा हजार बचत गटांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. माझ्या पन्हाळा तालुक्याला १८00 गटांचे टार्गेट दिले होते. कोल्हापूर जिल्ह्यात ‘महालक्ष्मी स्वयंसाहाय्यता महिला बचत गट’ या नावाने ही मोहीम राबविली होती. शासनाच्या नवीन योजना व नवीन परिपत्रके वाचायची व त्यावर अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करायची मला सवयच लागली होती. यामुळे शासनपातळीवर कोणतीही नवीन योजना तयार करताना खूप अभ्यास केला जातो, याची मला जाणीव झाली होती. या सगळ्या शासकीय योजना लोकांपर्यंत वाडी-वस्त्यांवर पोहोचविणे ही खरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असते. यासाठी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समन्वयाची खूपच गरज असते; पण अजूनही आपल्या देशात असे घडत नाही. हीच खरी मोठी शोकांतिका आहे. शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे व गावागावांत नवीन योजनांचा विस्तार करणे ही तालुक्याचा सभापती या नात्याने माझी मुख्य जबाबदारी आहे, ही जाणीव मला नक्कीच झालेली होती. बचत गट या संकल्पनेची उद्दिष्ट्ये समजावून घेतल्यानंतर ग्रामीण भागातील महिलांच्या उत्कर्षासाठी ही एक नवीन संधी आहे. तसेच महिलांना कार्यरत राहण्यासाठी एक नवीन व्यासपीठ मिळू शकते. विकासाच्या प्रवाहात महिलांची सक्रियता राहू शकते. महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची एक नामी संधी या मोहिमेत मिळू शकते. या संकल्पनेमुळे ग्रामीण महिला स्वावलंबी व समृद्ध बनू शकतात. ग्रामीण भागात परिवर्तन घडू शकते. यामुळे मी पन्हाळा तालुक्यात ही लोकचळवळ निर्माण करता येईल का? यासाठी सर्वांशी संवाद साधत होतो. आम्ही सगळ्यांनी यासाठी नेटके नियोजन केले होते. दोन हजारांपेक्षा जास्त बचत गट तालुक्यात स्थापन करून जिल्ह्यात एक उच्चांक निर्माण करण्याचा आम्ही सगळ्यांनी संकल्प केला होता. विजयसिंह जाधव यांच्याकडेच त्यावेळी इऊड चा पदभार होता. बचत गट स्थापन करताना दहा ते वीस महिलांचा गटात समावेश आवश्यक होता. स्वयंसाहाय्यता बचत गटामुळे महिलांचे संघटन, दारिद्र्य निर्मूलन व महिलांचे आर्थिक, सामजिक, शैक्षणिक व आरोग्याविषयी महिलांचे सक्षमीकरण हा मुख्य हेतू साध्य होणार होता. आपल्या भारत देशात बचत गटाची चळवळ ‘म्हैसूर रिसेटलमेंट अँड डेव्हलपमेंट एजन्सी (मायराडा)’या संस्थेने प्रथम सुरुवात केली होती. नाबार्डनेदेखील बचत गटाचे मॉडेल तयार करून ग्रामीण भागात प्रयोग सुरू केले होते. १९७0 च्या दशकात बांगलादेशात डॉ. मोहम्मद युनूस यांनी महिलांची बचत गट मोहीम सुरू केली होती. ‘मायक्रो क्रेडिट स्कीम’ म्हणून ही बांगलादेशात आर्थिक क्षेत्रात ही एक लोकचळवळ निर्माण झालेली आहे. यामुळे महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानाने उभे राहता आले आहे. गटातील प्रत्येक सभासदांनी आपली ठराविक बचत गोळा करणे व ती साठविलेली रक्कम सभासदांना त्यांची आर्थिक गरज सोडविण्यासाठी त्यांना कर्ज स्वरूपात मदत करणे, यामुळे कौटुंबिक गरज व व्यवसाय वृद्धी या दोन्ही गोष्टी साध्य होणार होत्या. पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक गावांत आम्ही विशेष महिलांच्या ग्रामसभा आयोजित केल्या होत्या.हळदी कुंकू व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आम्ही महिलांना बचत गटांचे महत्त्व, उद्दिष्ट व फायदे यांविषयी प्रबोधन करीत होतो. सरपंच संघटना, ग्रामसेवक, शिक्षक व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मनापासून सहभाग आम्हाला त्यावेळी लाभला होता. मालेच्या सरपंच राधाबाई चौगले, जाखलेच्या उपसरपंच रंजना पाटील, पैजारवाडीच्या रूपाली चिले व संगीता यादव यांनी त्यावेळी खूप प्रभावी काम केले होते. मी जवळजवळ सर्व गावांच्या बैठकींना हजर राहिलो होतो. आम्ही त्यावेळी तालुक्यातील दोन हजारच्या वर बचत गटांची स्थापना केली होती. जवळजवळ चाळीस टक्के बचत गट एका वर्षात आम्ही बँकेशी जोडले होते. नाबार्डचे अधिकारी घाडगे यांचीही त्यावेळी आम्हाला मौलिक मदत झालेली होती. जिल्हा परिषदेच्या मिटिंगमध्ये या अलौकिक कामाबद्दल पन्हाळा तालुक्यातील सर्वांचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यात त्यावेळी अकरा हजारच्या वर महालक्ष्मी स्वयंसाहाय्यता बचत गट स्थापन झाले होते. हा एका वेगळा नावलौकिक आपल्या कोल्हापूर जिल्ह्याने मिळविला होता. सर्व गट बँकेशी जोडून त्यांना आता व्यवसायात्मक प्रशिक्षण देण्याची गरज होती.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)