शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महिला बचत गट एक चळवळ ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:26 IST

भारत पाटील महाराष्ट्र शासनाने महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिला स्वयंसाहाय्यता बचत गट ही नवीन संकल्पना आणलेली होती. यामध्ये गावोगावी ...

भारत पाटीलमहाराष्ट्र शासनाने महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिला स्वयंसाहाय्यता बचत गट ही नवीन संकल्पना आणलेली होती. यामध्ये गावोगावी महिलांचे बचत गट तयार करणे व तो बचत गट बँकेशी जोडणे हे पहिल्या टप्प्यामध्ये नियोजन होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (ऊफऊअ) व महिला बालकल्याण या विभागांच्यावतीने अध्यक्ष अण्णासाहेब नवणे व उपाध्यक्ष बळीराम देसाई यांच्या नेतृत्वाखाली व सी.ई.ओ. प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदशर्नाखाली प्रकल्प संचालक आनंद पुसावळे हे या कार्यक्रमाचे समन्वयक होते. दहा हजार बचत गटांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. माझ्या पन्हाळा तालुक्याला १८00 गटांचे टार्गेट दिले होते. कोल्हापूर जिल्ह्यात ‘महालक्ष्मी स्वयंसाहाय्यता महिला बचत गट’ या नावाने ही मोहीम राबविली होती. शासनाच्या नवीन योजना व नवीन परिपत्रके वाचायची व त्यावर अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करायची मला सवयच लागली होती. यामुळे शासनपातळीवर कोणतीही नवीन योजना तयार करताना खूप अभ्यास केला जातो, याची मला जाणीव झाली होती. या सगळ्या शासकीय योजना लोकांपर्यंत वाडी-वस्त्यांवर पोहोचविणे ही खरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असते. यासाठी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समन्वयाची खूपच गरज असते; पण अजूनही आपल्या देशात असे घडत नाही. हीच खरी मोठी शोकांतिका आहे. शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे व गावागावांत नवीन योजनांचा विस्तार करणे ही तालुक्याचा सभापती या नात्याने माझी मुख्य जबाबदारी आहे, ही जाणीव मला नक्कीच झालेली होती. बचत गट या संकल्पनेची उद्दिष्ट्ये समजावून घेतल्यानंतर ग्रामीण भागातील महिलांच्या उत्कर्षासाठी ही एक नवीन संधी आहे. तसेच महिलांना कार्यरत राहण्यासाठी एक नवीन व्यासपीठ मिळू शकते. विकासाच्या प्रवाहात महिलांची सक्रियता राहू शकते. महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची एक नामी संधी या मोहिमेत मिळू शकते. या संकल्पनेमुळे ग्रामीण महिला स्वावलंबी व समृद्ध बनू शकतात. ग्रामीण भागात परिवर्तन घडू शकते. यामुळे मी पन्हाळा तालुक्यात ही लोकचळवळ निर्माण करता येईल का? यासाठी सर्वांशी संवाद साधत होतो. आम्ही सगळ्यांनी यासाठी नेटके नियोजन केले होते. दोन हजारांपेक्षा जास्त बचत गट तालुक्यात स्थापन करून जिल्ह्यात एक उच्चांक निर्माण करण्याचा आम्ही सगळ्यांनी संकल्प केला होता. विजयसिंह जाधव यांच्याकडेच त्यावेळी इऊड चा पदभार होता. बचत गट स्थापन करताना दहा ते वीस महिलांचा गटात समावेश आवश्यक होता. स्वयंसाहाय्यता बचत गटामुळे महिलांचे संघटन, दारिद्र्य निर्मूलन व महिलांचे आर्थिक, सामजिक, शैक्षणिक व आरोग्याविषयी महिलांचे सक्षमीकरण हा मुख्य हेतू साध्य होणार होता. आपल्या भारत देशात बचत गटाची चळवळ ‘म्हैसूर रिसेटलमेंट अँड डेव्हलपमेंट एजन्सी (मायराडा)’या संस्थेने प्रथम सुरुवात केली होती. नाबार्डनेदेखील बचत गटाचे मॉडेल तयार करून ग्रामीण भागात प्रयोग सुरू केले होते. १९७0 च्या दशकात बांगलादेशात डॉ. मोहम्मद युनूस यांनी महिलांची बचत गट मोहीम सुरू केली होती. ‘मायक्रो क्रेडिट स्कीम’ म्हणून ही बांगलादेशात आर्थिक क्षेत्रात ही एक लोकचळवळ निर्माण झालेली आहे. यामुळे महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानाने उभे राहता आले आहे. गटातील प्रत्येक सभासदांनी आपली ठराविक बचत गोळा करणे व ती साठविलेली रक्कम सभासदांना त्यांची आर्थिक गरज सोडविण्यासाठी त्यांना कर्ज स्वरूपात मदत करणे, यामुळे कौटुंबिक गरज व व्यवसाय वृद्धी या दोन्ही गोष्टी साध्य होणार होत्या. पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक गावांत आम्ही विशेष महिलांच्या ग्रामसभा आयोजित केल्या होत्या.हळदी कुंकू व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आम्ही महिलांना बचत गटांचे महत्त्व, उद्दिष्ट व फायदे यांविषयी प्रबोधन करीत होतो. सरपंच संघटना, ग्रामसेवक, शिक्षक व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मनापासून सहभाग आम्हाला त्यावेळी लाभला होता. मालेच्या सरपंच राधाबाई चौगले, जाखलेच्या उपसरपंच रंजना पाटील, पैजारवाडीच्या रूपाली चिले व संगीता यादव यांनी त्यावेळी खूप प्रभावी काम केले होते. मी जवळजवळ सर्व गावांच्या बैठकींना हजर राहिलो होतो. आम्ही त्यावेळी तालुक्यातील दोन हजारच्या वर बचत गटांची स्थापना केली होती. जवळजवळ चाळीस टक्के बचत गट एका वर्षात आम्ही बँकेशी जोडले होते. नाबार्डचे अधिकारी घाडगे यांचीही त्यावेळी आम्हाला मौलिक मदत झालेली होती. जिल्हा परिषदेच्या मिटिंगमध्ये या अलौकिक कामाबद्दल पन्हाळा तालुक्यातील सर्वांचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यात त्यावेळी अकरा हजारच्या वर महालक्ष्मी स्वयंसाहाय्यता बचत गट स्थापन झाले होते. हा एका वेगळा नावलौकिक आपल्या कोल्हापूर जिल्ह्याने मिळविला होता. सर्व गट बँकेशी जोडून त्यांना आता व्यवसायात्मक प्रशिक्षण देण्याची गरज होती.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)