शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

खत दरवाढ विरोधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:26 IST

केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ करून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केलीय. एका हाताने दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले. ...

केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ करून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केलीय. एका हाताने दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले. खताची दरवाढ करून दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांकडून पैसे काढून घेतले जात आहेत.रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राधानगरी विधानसभा मतदार संघाचे समन्वयक सुशिल पाटील कौलवकर युवा मंच व तालुका काँग्रेस (आय) च्या वतीने निवेदनाद्वारे राधानगरीचे तहसीलदार मीना निंबाळकर यांना देण्यात आला.

निवेदनात असे म्हटले आहे, केंद्र शासनाने शेतीसाठी लागणाऱ्या डीएपी, युरिया, मिश्र खत अशा रासायनिक खतांच्या किमतीत दीड पटीने वाढ केली आहे. शेतकरी नैसर्गिक संकटांनी आधीच कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. कोरोना महामारीच्या काळात खताची दरवाढ करून शेतकऱ्याची थट्टा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच कोरोना काळात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला कवडीमोल किंमत मिळत आहे. शेतीमाल जागेवर कुजत पडला आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला असतानाच शेतीला लागणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती वाढविणे चुकीचे आहे. अन्यायी दरवाढ तत्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील यांनी दिला आहे.

भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, संचालक संजयसिंह पाटील, माजी सरपंच सागर धुंदरे, पंचायत समितीचे सदस्य उत्तम पाटील (येळवडेकर),शहाजी कवडे, सरपंच सुभाष पाटील, राहुल चौगले,रवी पाटील तारळेकर,दिगंबर येरूडकर,वैभव तहसीलदार,प्रभाकर पाटील (चंद्रेकर) इंद्रजित पाटील,बाजीराव चौगले, अमर वनकुंद्रे, आदी यावेळी उपस्थित होते.

फोटो ओळी :

केंद्र सरकारने खत दरवाढ केली. त्याच्या निषेधार्थ राधानगरी तालुका कॉंग्रेसच्यावतीने आदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी सुशील पाटील, सदाशिवराव चरापले, संजय पाटील, प्रभाकर पाटील आदी.