शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५४६ गुन्हेगार मोस्ट वॉन्टेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:30 IST

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील खून, गँगवार, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, दरोडा, फसवणूक अशा गंभीर गुन्ह्णांतील ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील खून, गँगवार, खुनाचा प्रयत्न, अत्याचार, दरोडा, फसवणूक अशा गंभीर गुन्ह्णांतील सुमारे ५४६ सराईत गुन्हेगार फरार आहेत. गेल्या ४२ वर्षांपासून पोलीस शोध सुरू आहे, इतकेच कारण सांगत आहेत. फरार गुन्हेगारांना त्यांच्या पत्त्यावर वारंवार नोटिसा देऊनही ते हजर होत नाहीत; त्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘थर्ड डिग्री’पेक्षा आर्थिक फटका बसला, तर पुन्हा कोणी गुन्हेगार फरार होण्याचे धाडस करणार नाहीत. हा उद्देश समोर ठेवून ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. आतापर्यंत ३५ गुन्हेगारांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.कोल्हापूरसह सांगली, सातारा, कराड, पुणे, सोलापूर, मुंबई, ठाणे, कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांतील गुन्हेगारांचा समावेश आहे. हे सर्व गुन्हेगार सराईत असून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. पोलीस त्यांच्या राहत्या पत्त्यावर गेले, तरी ते मिळून येत नाहीत. नातेवाईकही त्यांची माहिती लपवत आहेत. त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहे; परंतु आरोपी अटक नसल्याने हे गुन्हे प्रलंबित आहेत. त्यांना फरार घोषित करून त्यांचे छायाचित्र, माहिती भित्ती फलकावर चिकटविली असून, सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केली आहे.शेख ते पवार-अकोळकर१९७६ पासून राजारामपुरी पोलीस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल असलेला संशयित नन्हासाब बमिदाब शेख (रा. वड्डवाडी-राजारामपुरी) हा फरार आहे. त्याच्या पाठोपाठ २०१५ मध्ये पानसरे हत्येप्रकरणातील संशयित विनय बाबूराव पवार, सारंग दिलीप अकोळकर, अशी ही फरारांची साखळी आहे.कारागृहातील ३४ कैदी फरारखून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, घरफोडी, अपहरण, खंडणी, आदी विविध गुन्ह्णांत शिक्षा झालेल्या मुंबई, ठाणे, कल्याण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी ठिकाणच्या अंडरवर्ल्ड टोळीमधील गुन्हेगारांसह १८६० कैदी सध्या कारागृहात आहेत. कुटुंबासह स्वत:च्या आजारपणासाठी, तर मुलांच्या शैक्षणिक कामासाठी एक महिन्यासाठी पॅरोलवर (रजा) कळंबा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडलेले सुमारे ६९ कैदी गेल्या चार वर्षांपासून फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात पोलीसही हतबल झाले आहेत.