शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार निरक्षर; साक्षरतेचे आव्हान मोठे 

By समीर देशपांडे | Updated: June 26, 2023 17:17 IST

३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यातील सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट

समीर देशपांडेकोल्हापूर : एक रुपयाही मानधन न देता राज्यातील सव्वा लाख निरक्षरांना साक्षर करण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात असून मुंबई राजधानी शेजारच्या ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार ७९६ निरक्षर आहेत. निरक्षरतेबाबत गडचिरोली, वाशिम आणि नाशिक अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या क्रमांकावर आहेत.केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबवण्याची सूचना सर्व राज्यांना केली असून त्यानुसार महाराष्ट्रातही कामकाज सुरू झाले आहे. परंतु सध्या केवळ सर्वेक्षणाच्या पातळीवरच तयारी सुरू आहे. ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यातील सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.१५ ते ३५ या वयोगटातील निरक्षरांना प्राधान्याने साक्षर करण्यात येणार असून त्यानंतर ३५ वर्षांहून अधिक वयोगटातील निरक्षरांचा विचार करण्यात येणार आहे. परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता ३५ वयापर्यंतच्या निरक्षरांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे प्रौढांच्या साक्षरतेवरच भर देण्यात येणार आहे.

स्वयंसेवकांवर भरही संपूर्ण योजना स्वयंसेवकांवर आधारित आहे. राष्ट्रीय सेवा योजना, छात्रसेना, नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या, निवृत्त शिक्षक यांनी ही सेवा द्यावी, अशी अपेक्षा असून यातील कोणालाही मानधन देण्यात येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.राज्यातील जिल्हावार निरक्षर२०११ च्या जनणनेनुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यातील निरक्षरांची संख्या अहमदनगर २०,७०२, अकोला ६,२५०, अमरावती ९,४१८, छत्रपती संभाजीनगर १७,८३७, भंडारा ४,४२७, बीड १४,५८२, बुलढाणा ११,३२७, चंद्रपूर ९,३७४, धुळे ११,१५४, गडचिरोली ३७,२००, गोंदिया ४,८१७, हिंगोली ६,२५०, जळगाव १९,७९०, जालना ११,२८४, कोल्हापूर १५,४५०, लातूर ११,७६१, मुंबई शहर ८,२८९, मुंबई उपनगर २६,०४०, नागपूर १४,३२२, नांदेड १७,४४७, नंदूरबार ६८,८२०, नाशिक २८,२५३, परभणी १०,०२५, पुणे३३,३७५, रायगड १०,३७३, रत्नागिरी ६,३३६, सांगली ११,४५८, सातारा ११,४१४, सिंधुदुर्ग २,६९१, सोलापूर २१,३०९, ठाणे ४०,७९६, वर्धा ५,१२३, वाशिम ३१,६२०, यवतमाळ १२,३२६ आहेत.

निरक्षरतेची कारणे

  • कुटुंबातील गरिबी
  • रोजगारासाठी स्थलांतर
  • पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष
  • शैक्षणिक वातावरणाचा अभाव
  • शाळा जवळ नसल्याचा परिणाम
टॅग्स :kolhapurकोल्हापूरnandurbar-acनंदुरबारthaneठाणे