शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

सर्वाधिक निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार निरक्षर; साक्षरतेचे आव्हान मोठे 

By समीर देशपांडे | Updated: June 26, 2023 17:17 IST

३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यातील सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट

समीर देशपांडेकोल्हापूर : एक रुपयाही मानधन न देता राज्यातील सव्वा लाख निरक्षरांना साक्षर करण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात असून मुंबई राजधानी शेजारच्या ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार ७९६ निरक्षर आहेत. निरक्षरतेबाबत गडचिरोली, वाशिम आणि नाशिक अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या क्रमांकावर आहेत.केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबवण्याची सूचना सर्व राज्यांना केली असून त्यानुसार महाराष्ट्रातही कामकाज सुरू झाले आहे. परंतु सध्या केवळ सर्वेक्षणाच्या पातळीवरच तयारी सुरू आहे. ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यातील सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.१५ ते ३५ या वयोगटातील निरक्षरांना प्राधान्याने साक्षर करण्यात येणार असून त्यानंतर ३५ वर्षांहून अधिक वयोगटातील निरक्षरांचा विचार करण्यात येणार आहे. परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता ३५ वयापर्यंतच्या निरक्षरांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे प्रौढांच्या साक्षरतेवरच भर देण्यात येणार आहे.

स्वयंसेवकांवर भरही संपूर्ण योजना स्वयंसेवकांवर आधारित आहे. राष्ट्रीय सेवा योजना, छात्रसेना, नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या, निवृत्त शिक्षक यांनी ही सेवा द्यावी, अशी अपेक्षा असून यातील कोणालाही मानधन देण्यात येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.राज्यातील जिल्हावार निरक्षर२०११ च्या जनणनेनुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यातील निरक्षरांची संख्या अहमदनगर २०,७०२, अकोला ६,२५०, अमरावती ९,४१८, छत्रपती संभाजीनगर १७,८३७, भंडारा ४,४२७, बीड १४,५८२, बुलढाणा ११,३२७, चंद्रपूर ९,३७४, धुळे ११,१५४, गडचिरोली ३७,२००, गोंदिया ४,८१७, हिंगोली ६,२५०, जळगाव १९,७९०, जालना ११,२८४, कोल्हापूर १५,४५०, लातूर ११,७६१, मुंबई शहर ८,२८९, मुंबई उपनगर २६,०४०, नागपूर १४,३२२, नांदेड १७,४४७, नंदूरबार ६८,८२०, नाशिक २८,२५३, परभणी १०,०२५, पुणे३३,३७५, रायगड १०,३७३, रत्नागिरी ६,३३६, सांगली ११,४५८, सातारा ११,४१४, सिंधुदुर्ग २,६९१, सोलापूर २१,३०९, ठाणे ४०,७९६, वर्धा ५,१२३, वाशिम ३१,६२०, यवतमाळ १२,३२६ आहेत.

निरक्षरतेची कारणे

  • कुटुंबातील गरिबी
  • रोजगारासाठी स्थलांतर
  • पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष
  • शैक्षणिक वातावरणाचा अभाव
  • शाळा जवळ नसल्याचा परिणाम
टॅग्स :kolhapurकोल्हापूरnandurbar-acनंदुरबारthaneठाणे