शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

कमावत्या वयोगटाला कोरोनाची सर्वाधिक लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 05:43 IST

महाराष्ट्रातील चित्र : लोकांतील वाढती बेफिकिरीही कारणीभूत

विश्वास पाटीललोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रात कमावत्या वयोगटातील (३१ ते ४०) लोक कोरोनाला सर्वाधिक बळी पडत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक २१.९६ टक्के रुग्ण हे या वयोगटातील आहेत. या लोकांमध्ये ‘आपल्याला काही होत नाही’ अशी बेफिकिरी जास्त आहे. त्यांचा सार्वजनिक वावरही नोकरी, व्यवसायानिमित्ताने जास्त असल्याने त्यांना संसर्ग होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांमधील संसर्ग व मृत्यूचेही प्रमाण जास्त होते. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यावर आरोग्य विभागाने सर्वाधिक भर दिला. त्यामुळेच केंद्र सरकारने लसीकरणात त्यांनाच प्राधान्य दिले. त्यामुळे हा घटक कोरोनापासून संरक्षित झाल्याचे अनुभवण्यास येत आहे. याउलट आता २१ ते ४० या वयोगटातील कोरोना संसर्गाचे प्रमाण तब्बल ४८.७५ टक्के म्हणजे एकूण रुग्णांच्या जवळजवळ निम्मे आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येमध्येही या वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे. मास्क वापरण्यासह पुरेशी दक्षता घेण्यात हयगय, तसेच लसीकरण न झाल्यानेही या वयोगटातील संसर्ग वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने समाजात सर्वाधिक वावर असलेला हा वयोगट आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. नाक व तोंडावर नीटपणे मास्क न वापरणे व या वयोगटातील लोकांचे न झालेले लसीकरण हीदेखील त्याची कारणे आहेत.    -डॉ. उमेश कदम,     वैद्यकीय अधीक्षक,     शासकीय सेवा रुग्णालय,     कसबा बावडा, कोल्हापूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या