शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यातील मदरशांमध्ये झाली शिक्षणाची ‘पहाट’

By admin | Updated: February 15, 2016 01:11 IST

आशादायक चित्र : नियमित अभ्यासक्रमाचे धडे, सर्वांनाच मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर --जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये नियमित शिक्षणाची ‘पहाट’ झाली आहे. त्या मदरशांमधील २४७ विद्यार्थी शासनाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम शिकत आहेत. यंदाच इतक्या मोठ्या संख्येने मदरशांमधील मुले शिक्षणाकडे वळल्याने सकारात्मक पाऊल पडत असल्याचा अनुभव प्रशासनास आला आहे. सर्वच मदरशांमधील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी विशेष बैठक बोलावली आहे. मदरसे कमी आणि प्रत्येक वर्षी बाहेर पडणारे विद्यार्थी अधिक आहेत. त्यामुळेच फक्त धार्मिक शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या सर्वांनाच भविष्यात मदरशांमध्ये पूजाअर्चा, धार्मिक विधी करून चरितार्थ चालविता येईल, असे सध्याचे चित्र नाही. परिणामी केवळ धार्मिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता असते. नोकरी न मिळाल्यास त्यांना छोटे व्यवसाय आणि मिळेल तेथे कष्टाचे काम करून संसार करावा लागतो. परिणामी हयातभर कष्ट उपसले तरी आर्थिक उन्नती होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मुस्लिम समाजातील कुटुंबे इंग्रजी, मराठी माध्यमांचे शिक्षण पाल्यांना देत आहेत. तंत्रज्ञानाच्या जमान्यात मागे राहू नये याची जाणीव झाल्याने व शिक्षणाचे महत्त्व पटल्याने मदरशांमधील विद्यार्थीही धार्मिकसह नोकरी, रोजगाराभिमुख शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात एकूण १६ मदरसे आहेत. त्यामध्ये १२१९ मुले आणि ६६ मुली आहेत. त्यापैकी हातकणंगले तालुक्यातील दारूल उलूम (शिरोली), निजामिया (आळते), दारूल उलूम दअवतुल इस्लाम (निमशिरगाव), तर शिरोळ तालुक्यातील हजरत अबुहुरेरा रजिअल्ला (कुरुंदवाड) या मदरशांमधील २४७ विद्यार्थी शासकीय अभ्यासक्रम शिकत आहेत. याशिवाय इमदादूल इस्लाम, दारूल उलूम (आजरा) या मदरशांमधील १३० विद्यार्थी गणित, इंग्रजी, हिंदी, संगणक विषयांचे शिक्षण घेतात. यासाठी २० शिक्षक कार्यरत आहेत. उर्वरित मदरशांमधील विद्यार्थीही शिक्षक व्हावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण प्रशासन सातत्याने पाठपुरावा करीत आहे.उर्दू माध्यमांच्या १६ शाळांत ३९०१ विद्यार्थीजिल्ह्यात पहिली ते १२वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण १६ उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. त्यामध्ये ३९०१ विद्यार्थी उर्दू शिक्षण घेत आहेत. कोल्हापूर शहरातील दोन शाळांत २७१ मुले आणि ४०३ मुली उर्दू माध्यमाचे शिक्षण घेत आहेत. शासनाचा नियमित अभ्यासक्रमच उर्दू माध्यमातून हे विद्यार्थी शिकत आहेत. यावरून मुस्लिम समाजही शिक्षणात अग्रेसर राहत आहे, हे स्पष्ट होते. कोणत्या मदरशांमध्ये किती मुले ?मदरसांनिहाय ६ ते १४ वयोगटातील मुलांची संख्या कंसात अशी : आजरा तालुका - इंदादुल इस्लाम (४०), दारूल उलूम (३५), चंदगड - कासीमूल उलूम (१२५), नुराणी (६०), हातकणंगले -निजामिया, आळते (१२०), दारूल उलूम, शिरोली (२५०), दारूल उलूम दाउत्तुल इस्लाम मदरसा और स्कूल निमशिरगाव फाटा, तारदाळ (१७२), दारूल उलूम दाउत्तुल उस्मान, दावतनगर, कबनूर (४३), गौसिया, इचलकरंजी (४०), चॉँदतारा मर्कज, इचलकरंजी (५२), दारूल उलूम मुणुलिया, खोतवाडी (४०), शिरोळ-आरबिया जहरूल-उलूम, कुरुंदवाड (८८), जामिया खैरूल उलूम, उदगाव (११), जामिया हजरत आबुहुरैरा रजि. जामियानगर, कुरुंदवाड (७३), दारूल उलूम फैजाने गौसिया, आलास, शिरोळ (४०). कुरुंदवाडमधील मोमीन महद आइशा सिद्दिका या मदरशांत ६६ मुली आहेत. सर्वच मदरशांमधील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. स्वत:हून काही मदरसे धार्मिकसह शासनाच्या अभ्यासक्रमातील शिक्षणही देत आहेत. - सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारीस्पर्धेच्या युगात सर्वच भाषिकांना आधुनिक शिक्षणाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे मदरशांमधील मुलेही राज्य, केंद्र शासनाच्या अभ्यासक्रमाकडे मोठ्या संख्येने वळत आहेत. मदरशांंमध्ये ई-लर्निंगसारखी शिक्षण प्रणाली वापरली जात आहे, ही आनंदाची बाब आहे.- आदिल फरास, माजी सभापती, स्थायी समिती, कोल्हापूर महापालिकां