शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

विमाने उतरण्यासाठी सव्वाशेहून अधिक अडथळे, कोल्हापूर सल्लागार समिती बैठकीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:02 IST

येथील विमानतळावर मोठी विमाने उतरविण्यासाठी सव्वाशेहून अधिक अडथळे आहेत. ते दूर करण्याची मागणी शुक्रवारी सकाळी विमानतळावर झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली.

कोल्हापूर : येथील विमानतळावर मोठी विमाने उतरविण्यासाठी सव्वाशेहून अधिक अडथळे आहेत. ते दूर करण्याची मागणी शुक्रवारी सकाळी विमानतळावर झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. वीज खात्याचे मोठे टॉवर हलविण्याचेही मोठे काम शिल्लक असून, याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे.खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकीकडे कोल्हापुरात मोठी विमाने उतरण्यासाठी तसेच रात्रीची सेवा सुरू राहण्यासाठी वाढीव धावपट्टी आवश्यक आहे. त्यासाठी नऊ एकरांहून अधिक जागा लागणार आहे. यामध्ये ३0 हून अधिक शेतकऱ्यांची जमीन असून तिची मोजणी करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. विमानतळाच्या दक्षिण बाजूला सध्या वापरला जाणार रस्ता हा विमानतळाच्या हद्दीत असल्याने तो बंद करून पर्यायी रस्ता देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

गडमुडशिंगीच्या हद्दीत असणारे छोटे मंदिर, अनेक होर्डिंग्ज, टॉवर, सिंटेक्सच्या टाक्या असे एकूण १२५ पेक्षा अधिक अडथळे दूर करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. तेव्हा येथे वीजखात्याचे उपकेंद्र उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा मोठा प्रश्न असून त्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.बैठकीनंतर खासदार महाडिक म्हणाले,भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने उजळाईवाडी विमानतळाचा विकास आराखडा तयार केला होता. सध्या विमातळावर १४ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. ८0 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत. राज्य शासनानेही आपला ३0 टक्के खर्चाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे येथील कामे वेगाने सुरू असून विमानतळ लवकरच सुसज्ज होईल. प्रवाशांसाठीही आवश्यक सर्व सुविधा या ठिकाणी पुरविण्याच्या सूचना यावेळी महाडिक यांनी केल्या.

विमानतळ प्राधिकरणाच्या संचालिका पूजा के. मूल यांनी कामांविषयी सादरीकरण केले. बैठकीला महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, समीर शेठ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.नोकरीच्या अमिषापासून सावध राहण्याचे राजू शेट्टी यांचे आवाहनविमानतळाचा विकास वेगाने होत असल्यामुळे काही अपप्रवृत्ती विमानतळ प्राधिकरणात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक करीत आहेत. अशा व्यक्तींपासून जनतेने सावध राहावे. सध्या विमानतळ प्राधिकरणात कोणत्याही प्रकारची भरती सुरू नाही. तसेच जी भरती होते, ती प्रशासकीय नियमांच्या अधीन राहून केली जात असल्यामुळे कोणीही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन बैठकीनंतर खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

 

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर