शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

महापुरामुळे जिल्ह्यात हजार कोटीहून अधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जुलैमधील अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार ५० कोटींहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या ...

कोल्हापूर : जुलैमधील अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार ५० कोटींहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून पुढील काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल, सानुग्रह अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून १७ कोटी ४२ लाख ५ हजार इतका निधी मिळाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी दिली.

सध्या जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील पंचनामे सुरु आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ७ व्यक्तींचा मृत्यू झाला. शासकीय निकषानुसार ६ व्यक्ती आर्थिक मदतीसाठी पात्र असून त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. तर एका व्यक्तीच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत मदत देण्याबाबतचा प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करण्यात आला

आहे. हस्तकला, हातमाग, क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

----------------

नुकसानीचा प्रकार : संख्या : पंचनामे पूर्ण झालेले

पूरबाधित कुटुंब : ७१ हजार २८९ : ६१ हजार ८६४

घरांची अंशत: पडझड : ५ हजार ७८९ : ५ हजार १०३

घरांची पूर्ण पडझड : १ हजार १०७ : ८०९

गोठा पडझड : २ हजार ४६६ : ६४६

दुकानदार : १२ हजार १५७ : ९ हजार ६७५

हस्तकला, कारागीर : १ हजार १६९ :९४१

कृषी नुकसान : ५८ हजार ९९७ हेक्टर: २४ हजार ६७०

जनावरे : लहान मोठी १६१ जनावरे व १३ कुटुंबातील १५ हजार १७८ काेंबड्यांचा मृत्यू

-----------