शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

२४५४ हेक्टरमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक हानी

By admin | Updated: March 17, 2015 00:10 IST

शासकीय पंचनामे : २८ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंतचे पंचनामे पूर्ण; १८ हजार हेक्टरवरील क्षेत्रात कमी नुकसान

सांगली : जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने याचा रब्बी पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधित झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असून २१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झालेले बाधित क्षेत्र १८४१८.२७ हेक्टर असून ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र २४५४.५९ हेक्टर एवढे आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान द्राक्षे आणि ज्वारी पिकाचे झाले आहे. आतापर्यंत चार महिन्यात पाचवेळा फेरपंचनामे करण्यात आले आहेत. शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्रीपासून संततधार पावसास प्रारंभ झाला होता. रात्रभर पावसाने मुक्काम ठोकल्याने जिल्ह्यातील शेतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. दि. १ मार्चला देखील दिवसभर पाऊस होता. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांना फटका बसला होता. त्याचप्रमाणे द्राक्ष पिकाचेही नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, तेथील पाहणी करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार कृषी अधिकाऱ्यांनी दोन दिवसातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. अवकाळीमुळे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांमध्ये ज्वारी पिकाचा क्रमांक सर्वात वरचा आहे. मिरज तालुक्यात (३०४.७७ हेक्टर), तासगाव (७१.०८), कवठेमहांकाळ (४५.५५), खानापूर (६८.२०), पलूस (२३.२१), वाळवा (२३.०७ हेक्टर) एवढे नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्यांमध्ये देखील ज्वारी पिकालाच फटका बसला आहे. तासगाव तालुक्यात (११६१.६२ हेक्टर), कवठेमहांकाळ (१३३.३४), जत (८३६६.५१), आटपाडी (१७१.१६), खानापूर (४१), पलूस (३१.८६), वाळवा (१७२.०६) आणि शिराळा तालुक्यात (५.३५ हेक्टर) एवढे नुकसान झाले आहे. ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख बाधित क्षेत्र पुढीलप्रमाणे : गहू (४५०.६४ हेक्टर), हरभरा (३७३.६३), आंबा (२१.८८), डाळिंब (२६.८० हेक्टर). त्याचबरोबरीने द्राक्षाचे देखील अपरिमित नुकसान झाले आहे. ५० टक्केवरील बाधित क्षेत्रात मिरज तालुक्यातील (३३१.३५ हेक्टर), तासगाव (९२२.०४), कवठेमहांकाळ (१२०.६५), खानापूर (६५९.२५), पलूस (३७०.७८), कडेगाव (२०) आणि वाळवा तालुक्यातील (३०.५२ हेक्टर) क्षेत्राचा समावेश आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात बेदाण्याचे २८७0 मेट्रिक टन नुकसान जिल्ह्यातील २८७०.३३ मेट्रिक टन बेदाण्याचेही नुकसान झाले आहे. रब्बी पिकांची आकडेवारी पाहिल्यास, ५० टक्केच्या आतील बाधित क्षेत्रावरील नुकसान अधिक आहे. परंतु ५० टक्केवरील नुकसान झालेल्यांनाच शासकीय मदत मिळण्याची शक्यता आहे. अवकाळीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे झाले असले तरी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार? हाच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. ४जिल्ह्यातील ५० टक्केवरील बाधित क्षेत्रामध्ये गहू पिकाचे (४५०.६४ हेक्टर), हरभरा (३७३.६३), मका (३.१०), भाजीपाला (११) आंबा (२१.८८), पेरु (०.३५), पपई (०.३०), केळी (०.६०), तर २६.८० हेक्टर क्षेत्रामधील डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे.