शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

२४५४ हेक्टरमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक हानी

By admin | Updated: March 17, 2015 00:10 IST

शासकीय पंचनामे : २८ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंतचे पंचनामे पूर्ण; १८ हजार हेक्टरवरील क्षेत्रात कमी नुकसान

सांगली : जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने याचा रब्बी पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधित झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असून २१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झालेले बाधित क्षेत्र १८४१८.२७ हेक्टर असून ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र २४५४.५९ हेक्टर एवढे आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान द्राक्षे आणि ज्वारी पिकाचे झाले आहे. आतापर्यंत चार महिन्यात पाचवेळा फेरपंचनामे करण्यात आले आहेत. शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्रीपासून संततधार पावसास प्रारंभ झाला होता. रात्रभर पावसाने मुक्काम ठोकल्याने जिल्ह्यातील शेतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. दि. १ मार्चला देखील दिवसभर पाऊस होता. यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांना फटका बसला होता. त्याचप्रमाणे द्राक्ष पिकाचेही नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, तेथील पाहणी करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार कृषी अधिकाऱ्यांनी दोन दिवसातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. अवकाळीमुळे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांमध्ये ज्वारी पिकाचा क्रमांक सर्वात वरचा आहे. मिरज तालुक्यात (३०४.७७ हेक्टर), तासगाव (७१.०८), कवठेमहांकाळ (४५.५५), खानापूर (६८.२०), पलूस (२३.२१), वाळवा (२३.०७ हेक्टर) एवढे नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्यांमध्ये देखील ज्वारी पिकालाच फटका बसला आहे. तासगाव तालुक्यात (११६१.६२ हेक्टर), कवठेमहांकाळ (१३३.३४), जत (८३६६.५१), आटपाडी (१७१.१६), खानापूर (४१), पलूस (३१.८६), वाळवा (१७२.०६) आणि शिराळा तालुक्यात (५.३५ हेक्टर) एवढे नुकसान झाले आहे. ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख बाधित क्षेत्र पुढीलप्रमाणे : गहू (४५०.६४ हेक्टर), हरभरा (३७३.६३), आंबा (२१.८८), डाळिंब (२६.८० हेक्टर). त्याचबरोबरीने द्राक्षाचे देखील अपरिमित नुकसान झाले आहे. ५० टक्केवरील बाधित क्षेत्रात मिरज तालुक्यातील (३३१.३५ हेक्टर), तासगाव (९२२.०४), कवठेमहांकाळ (१२०.६५), खानापूर (६५९.२५), पलूस (३७०.७८), कडेगाव (२०) आणि वाळवा तालुक्यातील (३०.५२ हेक्टर) क्षेत्राचा समावेश आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात बेदाण्याचे २८७0 मेट्रिक टन नुकसान जिल्ह्यातील २८७०.३३ मेट्रिक टन बेदाण्याचेही नुकसान झाले आहे. रब्बी पिकांची आकडेवारी पाहिल्यास, ५० टक्केच्या आतील बाधित क्षेत्रावरील नुकसान अधिक आहे. परंतु ५० टक्केवरील नुकसान झालेल्यांनाच शासकीय मदत मिळण्याची शक्यता आहे. अवकाळीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे झाले असले तरी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार? हाच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. ४जिल्ह्यातील ५० टक्केवरील बाधित क्षेत्रामध्ये गहू पिकाचे (४५०.६४ हेक्टर), हरभरा (३७३.६३), मका (३.१०), भाजीपाला (११) आंबा (२१.८८), पेरु (०.३५), पपई (०.३०), केळी (०.६०), तर २६.८० हेक्टर क्षेत्रामधील डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे.