शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

मोरेवाडीतील जमीन पुन्हा ‘अंबाबाई’च्या नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या नावे असणारी मौजे मोरेवाडी (ता. करवीर) येथील आठ एकर जमीन तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘इनाम जमिनी’च्या कायद्याला बगल देत विक्रीसाठी मोकळी असल्याचा आदेश दिला होता. मात्र, बेकायदेशीररीत्या विक्री झालेल्या आठ एकर जमिनीच्या सात-बारावर पुन्हा एकदा ‘अंबाबाई’चे नाव लागले आहे. ही ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या नावे असणारी मौजे मोरेवाडी (ता. करवीर) येथील आठ एकर जमीन तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘इनाम जमिनी’च्या कायद्याला बगल देत विक्रीसाठी मोकळी असल्याचा आदेश दिला होता. मात्र, बेकायदेशीररीत्या विक्री झालेल्या आठ एकर जमिनीच्या सात-बारावर पुन्हा एकदा ‘अंबाबाई’चे नाव लागले आहे. ही प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली आहे. आजच्या दराने या जमिनीची किंमत ५० कोटी इतकी असल्याची माहिती प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.मौजे मोरेवाडी येथील गट नं.३२ व ४५ (क्षेत्र सुमारे ८ एकर) ही जमीन श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या नावे होती. नियमानुसार इनाम जमीन कोणालाही विकता येत नसतानाही मार्च २०११ मध्ये धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता ही जमीन परस्पर बांधकाम व्यावसायिक धनंजय साळोखे यांना विकण्यात आली. त्यांनी या जमिनीचा ‘देवस्थान इनाम वर्ग-३’ रद्द करून जमीन भरआकारी करण्यासाठी महसूल मंत्र्यांकडे अर्ज केला. तत्कालीन महसूल मंत्री सुरेश धस यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये हा अर्ज मंजूर करून ही जमीन ‘देवस्थान इनाम वर्ग’मधून कमी केली. मात्र, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी सुरेश धस यांनी दिलेले सर्व आदेश रद्द केले. त्यानंतर महसूल मंत्रिपदी आलेल्या एकनाथ खडसेंनी डिसेंबर २०१५ रोजी पुन्हा या जमिनीचा ‘इनाम वर्ग-३’चा शेरा रद्द केला. महसूल यंत्रणेतील अधिकाºयांच्या संगनमतामुळे पुढील प्रक्रिया राबविण्यात आली व या जमिनीची पुन्हा-पुन्हा विक्री करण्यात आली.ही जमीन बिल्डर साळोखे यांनी विजय बाबूराव शेवाळे (६० गुंठे), प्रवीणसिंह जयसिंगराव घाटगे व वीरेंद्रसिंह प्रवीणसिंह घाटगे (सामाईक क्षेत्र १२० गुंठे), संजय प्रतापराव साळुंखे (९ गुंठे) आणि विक्रमसिंह भिकाजीराव गायकवाड (२३ गुंठे) यांना विकली. माहितीच्या अधिकारात जमिनीची माहिती मिळाल्यानंतर प्रजासत्ताक संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मार्च २०१६ मध्ये गैरकारभाराची तक्रार केली. मात्र, गेल्या अठरा महिन्यांत त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर करवीरचे प्रातांधिकारी सचिन इथापे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आणि पुराव्यांनिशी जमिनीची बेकायदा विक्री झाल्याचे सिद्ध झाल्याने ११ जुलै २०१७ रोजी प्रांताधिकाºयांनी या जमिनीच्या सात-बारावरील सर्व खरेदीदारांची नावे कमी करून पुन्हा त्यावर ‘करवीर निवासनी देवीचे’ नाव लावले व इतरांची नांवे कमी केली. यावेळी उपाध्यक्ष सुशील कोरडे, सचिव बुºहान नायकवडी उपस्थित होते.