शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालणार

By admin | Updated: June 24, 2017 19:01 IST

रामहरी रुपनर : धनगर समाज आरक्षण प्रश्नावरून आंदोलनासाठी महाराष्ट्रभर दौरे

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राज्यातील धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी येत्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालणार असल्याचा इशारा आमदार व राज्यातील धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष रामहरी रुपनर यांनी पत्रकार परिषदेत दिला. राज्यात असणारा १४ टक्के धनगर समाज एकत्र आला तर सरकारची अडचण ठरूशकेल, असेही ते म्हणाले. धनगर समाजाच्या आरक्षण मेळाव्यासाठी शनिवारी आमदार रुपनर कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व समाजात जागृती होण्यासाठी पोटजाती बाजूला ठेवून विविध संघटनांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सत्तेवर कोणतेही सरकार असो ते धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर नेहमीच बगल देत आले आहे. यासाठी समाजाने एकजूट होऊन सरकारवर दबाव वाढविला पाहिजे. या आंदोलनाची ठिणगी भडकण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्"ांत मेळावे घेण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५ जिल्"ांत मेळावे घेण्यात आले असून, त्यासाठी उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. यातून मिळणाऱ्या लोकसहभागाच्या बळावर आंदोलनाचे उग्र रूप धारण करू, असा इशारा दिला. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी पाठिंबा मिळविण्यासाठी दिलेला शब्द सत्तेवर आल्यावर पाळला नसल्याचा आरोप करत जर राज्यात १४ टक्के असणारा धनगर समाज एकत्र आल्यास राज्य सरकारची अडचण ठरू शकेल, त्यामुळे सरकारने आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशीही मागणी केली. चौकट.. प्रश्न सोडविण्यास मंत्री जानकर असमर्थ धनगर समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे यापूर्वी दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी जाहीर केल्याने जानकर हे समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ ठरल्याची टीका आमदार रुपनर यांनी यावेळी केली, तर शिवसेना सत्तेत असूनही गोंधळलेल्या अवस्थेत असून, त्यांनी जनतेची विश्वासार्हता गमावली असल्याचे त्यांनी सांगितले. चौकट.. चंद्रकांतदादा म्हणजे फसवा बाजार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी अनेक प्रश्न सोडविण्याची धुरा ते महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सोपवितात. तसेच चंद्रकांतदादांकडे विषय जाणे म्हणजे त्याची सोडवणूक न होणे अगर तो प्रश्न गुंतागुंतीचा करून ठेवणे असेच असल्याने चंद्रकांतदादा म्हणजे फसवा बाजार असल्याचीही टीका आमदार रुपनर यांनी केली.