शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालणार

By admin | Updated: June 24, 2017 19:01 IST

रामहरी रुपनर : धनगर समाज आरक्षण प्रश्नावरून आंदोलनासाठी महाराष्ट्रभर दौरे

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राज्यातील धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी येत्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालणार असल्याचा इशारा आमदार व राज्यातील धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष रामहरी रुपनर यांनी पत्रकार परिषदेत दिला. राज्यात असणारा १४ टक्के धनगर समाज एकत्र आला तर सरकारची अडचण ठरूशकेल, असेही ते म्हणाले. धनगर समाजाच्या आरक्षण मेळाव्यासाठी शनिवारी आमदार रुपनर कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व समाजात जागृती होण्यासाठी पोटजाती बाजूला ठेवून विविध संघटनांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सत्तेवर कोणतेही सरकार असो ते धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर नेहमीच बगल देत आले आहे. यासाठी समाजाने एकजूट होऊन सरकारवर दबाव वाढविला पाहिजे. या आंदोलनाची ठिणगी भडकण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्"ांत मेळावे घेण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५ जिल्"ांत मेळावे घेण्यात आले असून, त्यासाठी उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. यातून मिळणाऱ्या लोकसहभागाच्या बळावर आंदोलनाचे उग्र रूप धारण करू, असा इशारा दिला. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी पाठिंबा मिळविण्यासाठी दिलेला शब्द सत्तेवर आल्यावर पाळला नसल्याचा आरोप करत जर राज्यात १४ टक्के असणारा धनगर समाज एकत्र आल्यास राज्य सरकारची अडचण ठरू शकेल, त्यामुळे सरकारने आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशीही मागणी केली. चौकट.. प्रश्न सोडविण्यास मंत्री जानकर असमर्थ धनगर समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे यापूर्वी दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी जाहीर केल्याने जानकर हे समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ ठरल्याची टीका आमदार रुपनर यांनी यावेळी केली, तर शिवसेना सत्तेत असूनही गोंधळलेल्या अवस्थेत असून, त्यांनी जनतेची विश्वासार्हता गमावली असल्याचे त्यांनी सांगितले. चौकट.. चंद्रकांतदादा म्हणजे फसवा बाजार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी अनेक प्रश्न सोडविण्याची धुरा ते महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सोपवितात. तसेच चंद्रकांतदादांकडे विषय जाणे म्हणजे त्याची सोडवणूक न होणे अगर तो प्रश्न गुंतागुंतीचा करून ठेवणे असेच असल्याने चंद्रकांतदादा म्हणजे फसवा बाजार असल्याचीही टीका आमदार रुपनर यांनी केली.