शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

पैसे, दमदाटीवर यंत्रणा चालते- कोल्हापूर पाणीपुरवठ्याच्या बैठकीत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 17:18 IST

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा ही पैसे आणि दमदाटीवर चालत असल्याचा गंभीर आरोप गुरुवारी झालेल्या महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी यांच्या बैठकीत झाला. गेल्या अनेक वर्षांपासून सांगूनही पाणीपुरवठ्याचे नियोजन

ठळक मुद्देआठ दिवसांत महापालिकेची सभा

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा ही पैसे आणि दमदाटीवर चालत असल्याचा गंभीर आरोप गुरुवारी झालेल्या महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी यांच्या बैठकीत झाला. गेल्या अनेक वर्षांपासून सांगूनही पाणीपुरवठ्याचे नियोजन सुधारत नसल्याचा निषेध जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना गुलाबाची फुले देऊन करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. येत्या आठ दिवसांत महापालिकेची सभा बोलाविण्याचा निर्णय यावेळी झाला.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रशासनाने काय धोरण ठरविले आहे, याबाबत चर्चा करण्याकरिता महापौर मोरे यांनी ही बैठक आयोजित केली होती. बैठकीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तीन वर्षांपासून गळती काढण्याचे काम तसेच लोकांना पाणी देण्याचे नियोजन करता येत नसेल तर जल अभियंता कुलकर्णी यांनी आपला कार्यभार सोडून द्यावा, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार थांबविले जावेत, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.

पाण्यासंदर्भात वारंवार बैठका घेऊनही काही होत नसल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत राहुल चव्हाण यांनी गेल्या महिन्यापासून शाहूपुरी परिसरात पाणी येत नाही. नागरिक आम्हाला स्वस्थ बसून देत नाहीत. तेव्हा यापुढे वेळेवर आणि नियोजनाप्रमाणे पाणी मिळाले नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा दिला.उपमहापौर भूपाल शेटे यांनी जलअभियंता कुलकर्णी यांना जबाबदार धरले. गेल्या तीन वर्षांपासून ३५ ते ४० ठिकाणी गळती आहे म्हणून सांगितले जाते. आयुक्त बदलले की त्यांच्या घरातील फर्निचर बदलले जाते. मात्र पाण्यासंदर्भात काही कामे निघाली की तितक्या तातडीने ती के ली जात नाहीत, अशी तक्रार केली.

एका भागात पाणी भरपूर येत असेल तर त्याच्या शेजारील भागात मात्र लोकांना पाणी मिळत नाही, अशी तक्रार करीत सुरेखा शहा यांनी लोणार वसाहत, मार्केट यार्ड, महाडिक वसाहत, बापट कॅम्प परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत असून जर त्यात सुधारणा झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.टाकीत पाणीच नाही; मग पैसे का दिले?मार्केट यार्ड येथील नवीन बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी पडत नाही. मुळात टाकी चुकीच्या ठिकाणी बांधली आहे. तरीही टाकीच्या कामाचे २५ लाख रुपये ठेकेदाराला दिले आहेत, असे सांगताना जर कामच चुकीचे केले असेल तर ठेकेदाराचे पैसे का दिले? अशी विचारणा भूपाल शेटे यांनी केली. जनतेच्या सोईसाठी काम करता की पैशांसाठी काम करता? अशी विचारणाही त्यांनी केली.काय सांगायचंय ते ठरलंयपूजा नाईकनवरे यांनी कुलकर्णी यांना धारेवर धरले. शाहूपुरीतील पाण्याच्या टाकीत पाणी पडलेले नाही. चौदा इंची जलवाहिनी टाकायची होती तेथे आठ इंची टाकण्यात आली ती कोणाला विचारून टाकली, अशी विचारणा त्यांनी केली. कोणा नगरसेवकांना काय उत्तरे द्यायची हे अधिकाºयांनी ठरवून टाकलेय. तीन वर्षे केवळ पाण्याच्या नियोजनावर चर्चा करतो; पण अधिकारी काहीच करीत नाहीत. काय केले तीन वर्र्षांत एकदा सांगा, असा संतप्त सवाल त्यांनी केला.यावेळी झालेल्या चर्चेत सूरमंजिरी लाटकर, उमा बनछोडे, गीता गुरव, अश्विनी बारामते, स्वाती यवलुजे, निलोफर आजरेकर, विजयराव सूर्यवंशी, प्रा. जयंत पाटील, सचिन पाटील, विजय खाडे, राजसिंह शेळके, आदींनी भाग घेतला.------------------------------------------------------------------फोटो केएमसी मीटिंग या नावाने देत आहे - भारत चव्हाण

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर