शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-सांगलीतील महापूर रोखण्यासाठी नद्यांच्या संगम ठिकाणांत बदल; भोगावती, कृष्णेचा समावेश

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 16, 2024 14:02 IST

पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसाठी ८०० कोटी व सांगलीसाठी ८८० कोटी रुपये लागणार

इंदुमती गणेशकोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीमध्ये येणारा महापूर रोखण्यासाठी भोगावतीचे पाणी बाेगद्याद्वारे दुधगंगा नदीत वळवणे, राजाराम बंधारा व सांगलीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बदलून येथे बलून (फुगा) प्रकारातील बंधारा तयार करणे, पंचगंगा नदीला मिळणाऱ्या नद्या तसेच पंचगंगा व व कृष्णा नदीच्या संगमाचे क्षेत्र बदल अशा महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.कोल्हापूर व सांगलीमध्ये येणारा महापूर रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येणार असून त्या उपाययोजनांचे सादरीकरण बुधवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले. त्यामध्ये वरील उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम नृसिंहवाडी येथे होतो. भोगावती आणि कासारीचा संगम प्रयाग चिखली येथे आहे. बहिरेश्वर येथील कुंभी, भोगावती यांचा संगम आणि बीडशेड येथे तुळशी आणि भोगावतीचा संगम आहे या संगमाचे क्षेत्र बदलणे प्रस्तावित आहे. यासह विविध उपाययोजनांसाठी काही ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसाठी ८०० कोटी व सांगलीसाठी ८८० कोटी रुपये लागणार आहेत.

अन्य उपाययोजना

  • राधानगरी धरणाच्या स्पिलवेचे नूतनीकरण, रेडियल गेट्सने बदलले, सर्व्हिस गेटसची दुरुस्ती
  • नदीपात्रातील तळातील गाळ काढून योग्य दिशेने पाणी प्रवाहित करणे,
  • नदीचा क्रॉस सेक्शन चांगल्या स्थितीत आणणे.
  • पुलांसह प्रवाहातील वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे दूर करणे
  • मलबा हटवणे आणि नदीचे पुनर्विभागीकरण करणे.

बलून बंधारे..कोल्हापुरातील राजाराम बंधारा आणि पुढे सांगलीत आयर्वीन पूल व डिग्रज येथे बलून पद्धतीचे बंधारे प्रस्तावित आहे. पंचगंगा नदी ते शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुकडी, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ आणि कुरुंदवाड येथील ९ के.टी.च्या ८१ किमी लांबीच्या बाजूने बांधलेल्या तारा पाण्याच्या प्रवाहात अडथळे बनत असून येथे हे बलून प्रकार बंधारा प्रस्तावित असून त्यासाठी २०० कोटी निधी लागणार आहे.

भोगावती दुधगंगा बोगदा

राधानगरी धरणातील विसर्ग भोगावतीतून जातो त्यामुळे पंचगंगा नदीला पूर येतो हा विसर्ग भोगावती नदीतून दुधगंगेकडे वळविण्यात येणार आहे. करंजफेण गावाजवळ राधानगरी धरणाच्या खालच्या दिशेने नरतवडेपर्यंत ५५७ मीटरचा बोगदा प्रस्तावित आहे. बोगद्याची लांबी ६.३ किलोमीटर व व्यास १५ मीटरचा आहे. यामुळे पुराच्या पाण्याची पातळी कमी होणार आहे.

सांगलीतील पूरनियंत्रण उपाययोजना

  • टेंभू (कराड) आणि के. टी. वीर राजापूर येथील कृष्णा नदीतील गाळ काढून नदीचे पात्र खोल करणे.
  • सांगली शहर पाणी पुरवठ्यासाठीची योजना बदलणे व बॅरेज बांधणे
  • सांगली, मिरज, कुपवाडमधील पूरग्रस्त २५०० कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन
  • नदी पुनर्विभागासाठी दोन्ही काठावर ५०० हेक्टर जमिनीचे संपादन
  • कृष्णा नदी काठाची पुनर्बांधणी, संरक्षण व बळकटीकरण.
  • उतारावर गवत (टर्फिंग) लावणे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर