शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी स्टॅलिनप्रमाणे आंदाेलन चिरडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:39 IST

कोल्हापूर : दिल्लीच्या सभोवती अर्धसैनिक बल तैनात करून मोदी सरकारने दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याची तयारी केली आहे. स्टॅलिनने ...

कोल्हापूर : दिल्लीच्या सभोवती अर्धसैनिक बल तैनात करून मोदी सरकारने दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याची तयारी केली आहे. स्टॅलिनने रशियात असेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर रणगाडे घालून बळाच्या जोरावर आंदोलन चिरडले होते. आता पंतप्रधान मोदींनी दुसरे स्टॅलिन होऊ नये, नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. विधेयक मागे घेईपर्यंत शेतकरी अजिबात मागे हटणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ असल्याने मोदींनी पुढचा धोका ओळखून मनाचा मोठेपणा दाखवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दिल्लीतील चारही बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन शेट्टी हे कोल्हापुरात परतले आहेत. तेथील अनुभव त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठकीत कथन केला व मोदींना सबुरीचा सल्लाही दिला. ते म्हणाले, पंजाब, हरयाणातील प्रत्येक कुटुंबातील एकेक सदस्य आंदोलनाला बसला आहे. जमिनीचा तुकडा वाचवण्यासाठी लहान मुले, स्त्रिया, वृद्धासह तरुणही आंदोलनात आहेत, जीव गेला तरी मागे हटायचे नाही, अशी त्यांची ठाम मानसिकता आहे. आतापर्यंत १४ जणांचा बळीही गेला आहे. निकराने लढा सुरूच ठेवला आहे. राष्ट्रीय महामार्ग वीस दिवसांपासून बंद आहे. तरीदेखील मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आपल्या भडकाऊ वक्तव्याने जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. भडका उडाला तर त्याची किंमत देशाला मोजावी लागेल, तेव्हा मोदी यांनी दोन पाऊले मागे घेत हे विधेयक मागे घ्यावे.

स्टॅलिनचे आंदोलन काय होते

सोव्हिएत रशियाच्या कम्युनिस्ट क्रांतीचा स्टॅलिन हा हिरो होता. लेनिनच्या काळात तो लष्करशहा होता. लेनिनच्या मृत्यूनंतर तो वारसदार म्हणून सत्तेवर आला, पण निरंकुश सत्तेमुळे त्याच्यातील क्रूरता वाढीस गेली. त्याने जमिनीचे राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला, त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला, जनआंदोलन पेटले, पण स्टॅलिन मागे हटला नाही. त्यांनी विरोधासाठी रस्त्यावर आलेल्या दहा लाख शेतकऱ्यांच्या अंगावर रणगाडे घालून आंंदोलन चिरडले. याचा पुढे दीर्घकालीन परिणाम होऊन रशियातील कम्युनिस्ट क्रांती संपून सोव्हिएत संघाचे विभाजन झाले, देश अराजकाकडे गेला.