शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
4
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
5
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
6
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
7
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
8
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
9
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
10
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
11
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
12
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
13
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
14
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
15
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
16
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
17
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
18
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
19
"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप
20
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

फसवणूक करणारे मोदी सरकार हटवा : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:51 IST

मालगाव (ता. मिरज) : खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे.

ठळक मुद्देमालगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा, शाखेचे उद्घाटन

मालगाव (ता. मिरज) : खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. सात-बारा कोरा करण्याचे केवळ आश्वासन देणाºया व स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू न करणाºया मोदी सरकारला सत्तेवरून हटविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केले. शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याचीही मागणी केली.

मालगाव येथे स्वाभिमानी विद्यार्थी व वाहतूक संघटनेच्या शाखा उद्घाटनानिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यावेळी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, देशात भाजपची सत्ता येण्यापूर्वी पंतप्र्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांच्या शेतजमिनीवर असलेला कर्जाचा बोजा कमी करून सात-बारा कोरा करण्याबरोबरच शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्याची आश्वासने दिली होती. मात्र सत्ता मिळताच मोदी सरकाने शेतकºयांना वाºयावर सोडले.

खा. शेट्टी म्हणाले, सरकारच्या चुकीच्या व दुटप्पी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादनाला हमीभाव नाही. शेतकºयांना कर्ज देतानाही दुटप्पीपणा सुरू केला आहे. उद्योगपतींना ४० हजार कोटीचे कर्ज विनातारण दिले जाते, मात्र शेतकºयांना दहा हजार रूपयांच्या कर्जासाठी लाखो रूपये किमतीची जमीन तारण ठेवल्याशिवाय कर्ज मिळू शकत नाही. हे अन्यायकारक धोरण बदलण्यासाठी व केवळ शेतकºयांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आहे. देशातील २१ संघटनांनी एकत्र येऊन शेतकºयांच्या प्रश्नासाठी संसदेचे एक आठवड्याचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी राष्टपतींकडे केली आहे. मोदी सरकारला सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा व शेतकºयांचा विसर पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना सत्तेवरून हटविण्याची गरज आहे.शेतकºयांच्या न्यायासाठी लढा सुरू ठेवणारदेशातील उद्योगपती नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी यांनी करोडो रूपयांचे घोटाळे करून देश सोडला. मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. उद्योगपतींना दिलेली कोट्यवधीची कर्जे सरकार माफ करते; मात्र सर्वसामान्य शेतकºयांना कर्जमाफी देताना निकष लावले जातात. कर्ज वसुलीसाठी त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाते. सरकारचा हा दुटप्पी अन्याय सहन न होणारा असल्याने आम्ही सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरू केला आहे. शेतकºयांच्या न्यायासाठी हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारण