शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘महिला मोबाईल पेट्रोलिंग’ पुन्हा सुरु

By admin | Updated: May 25, 2014 01:12 IST

थकीत मोबाईल बिलाचा प्रश्न काढला निकाली

 कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून बंद असलेली ‘महिला मोबाईल पेट्रोलिंग ’ ही विशेष हेल्पलाईन मोहीम आता पुन्हा नव्या जोमाने महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी सुरू केली आहे. हेल्पलाईनच्या थकीत मोबाईल बिलाचा प्रश्न पोलीस प्रशासनाने निकाली काढला असून सोमवारपासून हे पथक पुन्हा रस्त्यावर दिसणार आहे. त्यामुळे मोकाट सुटलेल्या आंबटशौकीनांसह गुंडांना आता चांगलाच चाप बसणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेली ‘महिला मोबाईल पेट्रोलिंग’ ८६०५४००५५५ ही विशेष हेल्पलाईन मोहीम गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. हेल्पलाईनवरून करण्यात आलेल्या कॉलचे बिल भरमसाठ आल्याने ते कोणी भरायचे? हा पेच पोलीस प्रशासनापुढे उभा राहिला होता. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तातडीने थकीत बिलाचा प्रश्न निकाली काढीत ही हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हेल्पलाईनवर संपर्क साधताच ‘हॅलो, नमस्कार, जयहिंद, महिला पोलीस कॉन्स्टेबल... बोलतेय, बोला...’ असा आवाज ऐकू येणार आहे. (प्रतिनिधी) सचिवांच्या ‘डोस’ने पदाधिकारी भानावर कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील आमदार व जिल्हाप्रमुख यांच्यातील चिखलफेक शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांच्या कडक ‘डोस’मुळे थांबली. यामुळे सर्वजण चांगलेच भानावर येऊन हे पेल्यातील वादळ शमल्याचे सकृतदर्शनी चित्र आहे. असे असले तरी या ‘डोस’चा अंमल किती दिवस राहतो हे आगामी काळातच स्पष्ट होईल. शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा पराभव शिवसैनिकांना जिव्हारी लागला. यातून आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात वाक्युद्ध रंगले. एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका करून उणीदुणी काढण्याचे काम जाहीर चिंतनाच्या नावाखाली घेतलेल्या मेळाव्यातून झाले. ज्यांचा पराभव झाला त्या प्रा. मंडलिकांनी या पराभवाबाबत कुणाच्याही विरोधात चकार शब्द काढला नाही. मात्र, इथले पदाधिकारी एकमेकांवर बेछूट आरोप करताना दिसत होते. याची गंभीर दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले दूत म्हणून शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांना गुरुवारी कोल्हापूरला पाठविले. त्यांनी सर्वच टीकाकारांना पक्षाच्या चौकटीत रहा, आपल्या मर्यादा ओळखा, हे सर्व आता थांबवा; अन्यथा आम्ही थांबवू, असा कडक डोस दिला. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या द्वंद्वयुद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्हीकडील वातावरण एकदम चिडीचूप झाले आहे. खा. देसाई यांच्या ‘डोस’मुळे सर्वजण चांगलेच भानावर आले आहेत. चिखलफेक थांबल्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे नेहमीच गटबाजीतून होणारी चिखलफेक सद्य:स्थितीला थांबली असली तरी ती कायमची थांबणार का? अशी साशंकताही व्यक्त होत आहे. एकमेकांवर झालेल्या टीकेबाबत विचारणा केली असता आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी हा विषय शिवसेना सचिवांसमोरच संपला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)