शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

‘महिला मोबाईल पेट्रोलिंग’ पुन्हा सुरु

By admin | Updated: May 25, 2014 01:12 IST

थकीत मोबाईल बिलाचा प्रश्न काढला निकाली

 कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून बंद असलेली ‘महिला मोबाईल पेट्रोलिंग ’ ही विशेष हेल्पलाईन मोहीम आता पुन्हा नव्या जोमाने महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी सुरू केली आहे. हेल्पलाईनच्या थकीत मोबाईल बिलाचा प्रश्न पोलीस प्रशासनाने निकाली काढला असून सोमवारपासून हे पथक पुन्हा रस्त्यावर दिसणार आहे. त्यामुळे मोकाट सुटलेल्या आंबटशौकीनांसह गुंडांना आता चांगलाच चाप बसणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेली ‘महिला मोबाईल पेट्रोलिंग’ ८६०५४००५५५ ही विशेष हेल्पलाईन मोहीम गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. हेल्पलाईनवरून करण्यात आलेल्या कॉलचे बिल भरमसाठ आल्याने ते कोणी भरायचे? हा पेच पोलीस प्रशासनापुढे उभा राहिला होता. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तातडीने थकीत बिलाचा प्रश्न निकाली काढीत ही हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हेल्पलाईनवर संपर्क साधताच ‘हॅलो, नमस्कार, जयहिंद, महिला पोलीस कॉन्स्टेबल... बोलतेय, बोला...’ असा आवाज ऐकू येणार आहे. (प्रतिनिधी) सचिवांच्या ‘डोस’ने पदाधिकारी भानावर कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील आमदार व जिल्हाप्रमुख यांच्यातील चिखलफेक शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांच्या कडक ‘डोस’मुळे थांबली. यामुळे सर्वजण चांगलेच भानावर येऊन हे पेल्यातील वादळ शमल्याचे सकृतदर्शनी चित्र आहे. असे असले तरी या ‘डोस’चा अंमल किती दिवस राहतो हे आगामी काळातच स्पष्ट होईल. शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा पराभव शिवसैनिकांना जिव्हारी लागला. यातून आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात वाक्युद्ध रंगले. एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका करून उणीदुणी काढण्याचे काम जाहीर चिंतनाच्या नावाखाली घेतलेल्या मेळाव्यातून झाले. ज्यांचा पराभव झाला त्या प्रा. मंडलिकांनी या पराभवाबाबत कुणाच्याही विरोधात चकार शब्द काढला नाही. मात्र, इथले पदाधिकारी एकमेकांवर बेछूट आरोप करताना दिसत होते. याची गंभीर दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले दूत म्हणून शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांना गुरुवारी कोल्हापूरला पाठविले. त्यांनी सर्वच टीकाकारांना पक्षाच्या चौकटीत रहा, आपल्या मर्यादा ओळखा, हे सर्व आता थांबवा; अन्यथा आम्ही थांबवू, असा कडक डोस दिला. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या द्वंद्वयुद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्हीकडील वातावरण एकदम चिडीचूप झाले आहे. खा. देसाई यांच्या ‘डोस’मुळे सर्वजण चांगलेच भानावर आले आहेत. चिखलफेक थांबल्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे नेहमीच गटबाजीतून होणारी चिखलफेक सद्य:स्थितीला थांबली असली तरी ती कायमची थांबणार का? अशी साशंकताही व्यक्त होत आहे. एकमेकांवर झालेल्या टीकेबाबत विचारणा केली असता आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी हा विषय शिवसेना सचिवांसमोरच संपला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)