शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

‘महिला मोबाईल पेट्रोलिंग’ पुन्हा सुरु

By admin | Updated: May 25, 2014 01:12 IST

थकीत मोबाईल बिलाचा प्रश्न काढला निकाली

 कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून बंद असलेली ‘महिला मोबाईल पेट्रोलिंग ’ ही विशेष हेल्पलाईन मोहीम आता पुन्हा नव्या जोमाने महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी सुरू केली आहे. हेल्पलाईनच्या थकीत मोबाईल बिलाचा प्रश्न पोलीस प्रशासनाने निकाली काढला असून सोमवारपासून हे पथक पुन्हा रस्त्यावर दिसणार आहे. त्यामुळे मोकाट सुटलेल्या आंबटशौकीनांसह गुंडांना आता चांगलाच चाप बसणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेली ‘महिला मोबाईल पेट्रोलिंग’ ८६०५४००५५५ ही विशेष हेल्पलाईन मोहीम गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. हेल्पलाईनवरून करण्यात आलेल्या कॉलचे बिल भरमसाठ आल्याने ते कोणी भरायचे? हा पेच पोलीस प्रशासनापुढे उभा राहिला होता. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तातडीने थकीत बिलाचा प्रश्न निकाली काढीत ही हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हेल्पलाईनवर संपर्क साधताच ‘हॅलो, नमस्कार, जयहिंद, महिला पोलीस कॉन्स्टेबल... बोलतेय, बोला...’ असा आवाज ऐकू येणार आहे. (प्रतिनिधी) सचिवांच्या ‘डोस’ने पदाधिकारी भानावर कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील आमदार व जिल्हाप्रमुख यांच्यातील चिखलफेक शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांच्या कडक ‘डोस’मुळे थांबली. यामुळे सर्वजण चांगलेच भानावर येऊन हे पेल्यातील वादळ शमल्याचे सकृतदर्शनी चित्र आहे. असे असले तरी या ‘डोस’चा अंमल किती दिवस राहतो हे आगामी काळातच स्पष्ट होईल. शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा पराभव शिवसैनिकांना जिव्हारी लागला. यातून आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात वाक्युद्ध रंगले. एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका करून उणीदुणी काढण्याचे काम जाहीर चिंतनाच्या नावाखाली घेतलेल्या मेळाव्यातून झाले. ज्यांचा पराभव झाला त्या प्रा. मंडलिकांनी या पराभवाबाबत कुणाच्याही विरोधात चकार शब्द काढला नाही. मात्र, इथले पदाधिकारी एकमेकांवर बेछूट आरोप करताना दिसत होते. याची गंभीर दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले दूत म्हणून शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांना गुरुवारी कोल्हापूरला पाठविले. त्यांनी सर्वच टीकाकारांना पक्षाच्या चौकटीत रहा, आपल्या मर्यादा ओळखा, हे सर्व आता थांबवा; अन्यथा आम्ही थांबवू, असा कडक डोस दिला. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या द्वंद्वयुद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्हीकडील वातावरण एकदम चिडीचूप झाले आहे. खा. देसाई यांच्या ‘डोस’मुळे सर्वजण चांगलेच भानावर आले आहेत. चिखलफेक थांबल्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे नेहमीच गटबाजीतून होणारी चिखलफेक सद्य:स्थितीला थांबली असली तरी ती कायमची थांबणार का? अशी साशंकताही व्यक्त होत आहे. एकमेकांवर झालेल्या टीकेबाबत विचारणा केली असता आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी हा विषय शिवसेना सचिवांसमोरच संपला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)