शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

..एक-एका नगरसेवकाला ३५-३५ लाख, कोरेंच्या कबुलीने पालिकेतील घोडेबाजार आला चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 11:51 IST

पैशाच्या जोरावर राजकारण करणे एक दिवस आपल्याही अंगावर उलटले जाऊ शकते याची प्रचिती आता सर्वच राजकीय नेत्यांना आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना मूळ धरू लागली आहे.

भारत चव्हाण

कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर करण्याकरिता एक-एक नगरसेवकाला ३५-३५ लाख रुपये द्यावे लागले, अशी जाहीर कबुली आमदार विनय कोरे यांनी रविवारी दिल्यामुळे महानगरपालिकेतील राजकारणात पैशाचा कसा अनैतिक वापर झाला यावर प्रकाशझोत पडला आहे. पैशाच्या जोरावर राजकारण करणे एक दिवस आपल्याही अंगावर उलटले जाऊ शकते याची प्रचिती आता सर्वच राजकीय नेत्यांना आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना मूळ धरू लागली आहे. कोल्हापूरकरांच्या दृष्टीने ही एक चांगली सुरुवात समजली जात आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेवर १९९० पासून २००५ पर्यंत माजी आमदार महादेवराव महाडिक यांची निर्विवाद सत्ता राहिली. या सत्तेला छेद देण्यासाठी केवळ काँग्रेस, राष्ट्रवादीनेच नाही तर लहान मोठ्या पंधरा ते वीस पक्षांना सोबत घेऊन महाआघाडीनेही प्रयत्न केला. परंतु महाडिकांचा करिष्मा काही त्यांना कमी करता आला नाही. २००० सालातील निवडणूक सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढविली, पण त्यांना जागा मिळाल्या केवळ दोन! यावरूनच सामान्य जनतेत महाडिकांची किती चलती होती ते स्पष्ट होते.

जनसुराज्य शक्ती पक्षाच्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने सन २००५ मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून झाली. महाडिकांची रणनीती आखणारे प्रा. जयंत पाटील यांनी त्यांची साथ सोडली आणि विनय कोरे यांच्या पक्षात दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कोरे यांनी ही निवडणूक ताकदीने लढविली. परंतु त्यांना कसेबसे आठ नगरसेवक तर राष्ट्रवादीला दोन नगरसेवक निवडून आणता आले. महाडिकांनी मात्र ताराराणी आघाडीचे ५० नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे कोरे-मुश्रीफ यांना महापौर करण्यात अपयश आले. ताराराणी आघाडीकडून सई खराडे या महापौर झाल्या.

ताराराणी आघाडीकडून त्यावेळी सई खराडे यांच्यासह सरिता मोरे, माणिक पाटील अशा तिघी इच्छुक होत्या. तिघांनी दहा - दहा महिने महापौर करण्याचे महाडिक यांनी निश्चित केले होते. कै. महिपतराव बोंद्रे यांच्या आग्रहाखातर पहिला मान सई खराडे यांना दिला. दहा महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आघाडीत धुसफूस सुरू झाली. ही संधी साधत सन २००७ मधील आॅक्टोबर महिन्यात कोरे यांनी सई खराडे यांना जनसुराज्य शक्ती पक्षात घेऊन पुढील वीस महिन्यापर्यंत महापौरपदावर ठेवले. त्याच दरम्यान जनसुराज्य-राष्ट्रवादी नगरसेवकांचे संख्याबळ ३२ ते ३५ पर्यंत वाढविण्यासाठी कोरे यांनी नगरसेवकांना आपल्याकडे खेचले. पण हे बालंट आपल्यावर उलटणार याचा त्यांना अंदाज आला नाही.

यापुढे तरी शहाणपण दाखवावे

महाडिकांनी प्रभागातील तीन तीन नगरसेवकांना ताकद दिली. जो निवडून येईल तो आपला हे त्यांचे सूत्र होते. महाडिक ज्या स्टाईलने राजकारण करतात, त्या पध्दतीने राजकरण करणे तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनाही जमले नाही. किंबहुना त्यांचा तो स्वभाव नव्हता. त्यामुळेच महाआघाडीचा २००० साली दारुण पराभव झाला. पण विनय कोरे यांनी महाडिकांची स्टाईल स्वीकारली. त्यात ते यशस्वी झाले. पण आलेले अनुभव पाहून त्यांना पश्चातापही झाला. मोठ्या मनाने त्यांनी चूक कबूल केली. पण या सगळ्या प्रकारात नगरसेवक आणि महानगरपालिका बदनाम झाली. यापुढे तरी नेत्यांनी शहाणपणा दाखवायला पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा असेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVinay Koreविनय कोरेMayorमहापौरElectionनिवडणूक