शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

..एक-एका नगरसेवकाला ३५-३५ लाख, कोरेंच्या कबुलीने पालिकेतील घोडेबाजार आला चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 11:51 IST

पैशाच्या जोरावर राजकारण करणे एक दिवस आपल्याही अंगावर उलटले जाऊ शकते याची प्रचिती आता सर्वच राजकीय नेत्यांना आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना मूळ धरू लागली आहे.

भारत चव्हाण

कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर करण्याकरिता एक-एक नगरसेवकाला ३५-३५ लाख रुपये द्यावे लागले, अशी जाहीर कबुली आमदार विनय कोरे यांनी रविवारी दिल्यामुळे महानगरपालिकेतील राजकारणात पैशाचा कसा अनैतिक वापर झाला यावर प्रकाशझोत पडला आहे. पैशाच्या जोरावर राजकारण करणे एक दिवस आपल्याही अंगावर उलटले जाऊ शकते याची प्रचिती आता सर्वच राजकीय नेत्यांना आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना मूळ धरू लागली आहे. कोल्हापूरकरांच्या दृष्टीने ही एक चांगली सुरुवात समजली जात आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेवर १९९० पासून २००५ पर्यंत माजी आमदार महादेवराव महाडिक यांची निर्विवाद सत्ता राहिली. या सत्तेला छेद देण्यासाठी केवळ काँग्रेस, राष्ट्रवादीनेच नाही तर लहान मोठ्या पंधरा ते वीस पक्षांना सोबत घेऊन महाआघाडीनेही प्रयत्न केला. परंतु महाडिकांचा करिष्मा काही त्यांना कमी करता आला नाही. २००० सालातील निवडणूक सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढविली, पण त्यांना जागा मिळाल्या केवळ दोन! यावरूनच सामान्य जनतेत महाडिकांची किती चलती होती ते स्पष्ट होते.

जनसुराज्य शक्ती पक्षाच्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने सन २००५ मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून झाली. महाडिकांची रणनीती आखणारे प्रा. जयंत पाटील यांनी त्यांची साथ सोडली आणि विनय कोरे यांच्या पक्षात दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कोरे यांनी ही निवडणूक ताकदीने लढविली. परंतु त्यांना कसेबसे आठ नगरसेवक तर राष्ट्रवादीला दोन नगरसेवक निवडून आणता आले. महाडिकांनी मात्र ताराराणी आघाडीचे ५० नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे कोरे-मुश्रीफ यांना महापौर करण्यात अपयश आले. ताराराणी आघाडीकडून सई खराडे या महापौर झाल्या.

ताराराणी आघाडीकडून त्यावेळी सई खराडे यांच्यासह सरिता मोरे, माणिक पाटील अशा तिघी इच्छुक होत्या. तिघांनी दहा - दहा महिने महापौर करण्याचे महाडिक यांनी निश्चित केले होते. कै. महिपतराव बोंद्रे यांच्या आग्रहाखातर पहिला मान सई खराडे यांना दिला. दहा महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आघाडीत धुसफूस सुरू झाली. ही संधी साधत सन २००७ मधील आॅक्टोबर महिन्यात कोरे यांनी सई खराडे यांना जनसुराज्य शक्ती पक्षात घेऊन पुढील वीस महिन्यापर्यंत महापौरपदावर ठेवले. त्याच दरम्यान जनसुराज्य-राष्ट्रवादी नगरसेवकांचे संख्याबळ ३२ ते ३५ पर्यंत वाढविण्यासाठी कोरे यांनी नगरसेवकांना आपल्याकडे खेचले. पण हे बालंट आपल्यावर उलटणार याचा त्यांना अंदाज आला नाही.

यापुढे तरी शहाणपण दाखवावे

महाडिकांनी प्रभागातील तीन तीन नगरसेवकांना ताकद दिली. जो निवडून येईल तो आपला हे त्यांचे सूत्र होते. महाडिक ज्या स्टाईलने राजकारण करतात, त्या पध्दतीने राजकरण करणे तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनाही जमले नाही. किंबहुना त्यांचा तो स्वभाव नव्हता. त्यामुळेच महाआघाडीचा २००० साली दारुण पराभव झाला. पण विनय कोरे यांनी महाडिकांची स्टाईल स्वीकारली. त्यात ते यशस्वी झाले. पण आलेले अनुभव पाहून त्यांना पश्चातापही झाला. मोठ्या मनाने त्यांनी चूक कबूल केली. पण या सगळ्या प्रकारात नगरसेवक आणि महानगरपालिका बदनाम झाली. यापुढे तरी नेत्यांनी शहाणपणा दाखवायला पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा असेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVinay Koreविनय कोरेMayorमहापौरElectionनिवडणूक