शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

माजी संचालकांच्या वसुलीचा प्रस्तावच गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:57 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालक व सचिवांवर निश्चित केलेल्या जबाबदारी वसुलीचा प्रस्तावच जिल्हाधिकारी कार्यालयातून गहाळ झाला आहे. दीड वर्षांपूर्वी संबंधित संचालकांच्या मालमत्तांची विक्री करून बाजार समितीचे झालेले नुकसान वसूल करून द्यावे, असा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पाठविला होता. त्यांच्यावर कारवाई सोडाच, पण ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालक व सचिवांवर निश्चित केलेल्या जबाबदारी वसुलीचा प्रस्तावच जिल्हाधिकारी कार्यालयातून गहाळ झाला आहे. दीड वर्षांपूर्वी संबंधित संचालकांच्या मालमत्तांची विक्री करून बाजार समितीचे झालेले नुकसान वसूल करून द्यावे, असा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पाठविला होता. त्यांच्यावर कारवाई सोडाच, पण हा प्रस्तावच जिल्हाधिकारी कार्यालयात सापडत नसल्याचे उघड झाले आहे.समितीच्या मागील संचालक मंडळाच्या कारभाराची तत्कालीन शहर उपनिबंधक रंजन लाखे व करवीरचे सहायक निबंधक प्रदीप मालगांवे यांनी चौकशी करून पणन संचालकांकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार संचालक मंडळ बरखास्त झाले होते. चौकशी अहवालानुसार समितीच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जानेवारी २०१५ मध्ये प्रदीप मालगांवे यांची लवाद म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांनी १८ संचालक व तीन सचिवांवर २२ लाख ८७ हजारांची जबाबदारी निश्चित केली. त्याच्या वसुलीसाठी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी २ आॅगस्ट २०१६ रोजी संबंधितांच्या मालमता कागदपत्रांसह प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केला. प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक-जावक रजिस्टरमध्ये ४०३७ या क्रमांकाने आवक झाल्याचा दिसतो. त्यानंतर ६ आॅगस्टला प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वसुली विभागाकडे पाठविल्याचे दिसते. वसुली विभागाकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे हा प्रस्तावच दाखल झालेला दिसत नाही. दीड वर्षे जबाबदारी निश्चितीवर काहीच कार्यवाही दिसत नसल्याने प्रस्तुत प्रतिनिधींनी जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आठ दिवस पाठपुरावा केला. वसुली शाखेतील दोन्ही अधिकाºयांकडील आवक रजिस्टर तपासले, पण या विभागात प्रस्तावाची आवक दिसत नाही. दोनशे पानांचा हा वसुली प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून गहाळ होतोच कसा? याचे उत्तर मात्र महसूल यंत्रणेकडे नाही.हीच का झिरो पेंडन्सी!विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पदभार स्वीकारताच झिरो पेंडन्सीचा उपक्रम हातात घेतला. आयुक्तांचा आदेश मानून जिल्हा प्रशासनानेही काम केले, मग हे प्रकरण निकालात निघण्याऐवजी प्रस्तावच गहाळ कसा होतो? असा प्रश्न विचारला जात आहे.आमचे कोण वाकडे करतोयशेतीमाला चार पैसे जादा दर मिळावा, यासाठी बाजार समित्यांच्या निर्मिती झाली; पण सहकारात वाढलेल्या प्रवृत्तीने ही यंत्रणा खिळखिळी केली आहे. संचालक मंडळ बरखास्त होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही संबंधित संचालकांवर कारवाईच होत नाही आणि हीच मंडळी ‘आमचे कोण वाकडे करतोय’ या आविर्भावात फिरत असतील तर शेतकºयांनी करायचे तरी काय?