शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

माजी संचालकांच्या वसुलीचा प्रस्तावच गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:57 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालक व सचिवांवर निश्चित केलेल्या जबाबदारी वसुलीचा प्रस्तावच जिल्हाधिकारी कार्यालयातून गहाळ झाला आहे. दीड वर्षांपूर्वी संबंधित संचालकांच्या मालमत्तांची विक्री करून बाजार समितीचे झालेले नुकसान वसूल करून द्यावे, असा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पाठविला होता. त्यांच्यावर कारवाई सोडाच, पण ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालक व सचिवांवर निश्चित केलेल्या जबाबदारी वसुलीचा प्रस्तावच जिल्हाधिकारी कार्यालयातून गहाळ झाला आहे. दीड वर्षांपूर्वी संबंधित संचालकांच्या मालमत्तांची विक्री करून बाजार समितीचे झालेले नुकसान वसूल करून द्यावे, असा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पाठविला होता. त्यांच्यावर कारवाई सोडाच, पण हा प्रस्तावच जिल्हाधिकारी कार्यालयात सापडत नसल्याचे उघड झाले आहे.समितीच्या मागील संचालक मंडळाच्या कारभाराची तत्कालीन शहर उपनिबंधक रंजन लाखे व करवीरचे सहायक निबंधक प्रदीप मालगांवे यांनी चौकशी करून पणन संचालकांकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार संचालक मंडळ बरखास्त झाले होते. चौकशी अहवालानुसार समितीच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जानेवारी २०१५ मध्ये प्रदीप मालगांवे यांची लवाद म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांनी १८ संचालक व तीन सचिवांवर २२ लाख ८७ हजारांची जबाबदारी निश्चित केली. त्याच्या वसुलीसाठी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी २ आॅगस्ट २०१६ रोजी संबंधितांच्या मालमता कागदपत्रांसह प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केला. प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक-जावक रजिस्टरमध्ये ४०३७ या क्रमांकाने आवक झाल्याचा दिसतो. त्यानंतर ६ आॅगस्टला प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वसुली विभागाकडे पाठविल्याचे दिसते. वसुली विभागाकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे हा प्रस्तावच दाखल झालेला दिसत नाही. दीड वर्षे जबाबदारी निश्चितीवर काहीच कार्यवाही दिसत नसल्याने प्रस्तुत प्रतिनिधींनी जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आठ दिवस पाठपुरावा केला. वसुली शाखेतील दोन्ही अधिकाºयांकडील आवक रजिस्टर तपासले, पण या विभागात प्रस्तावाची आवक दिसत नाही. दोनशे पानांचा हा वसुली प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून गहाळ होतोच कसा? याचे उत्तर मात्र महसूल यंत्रणेकडे नाही.हीच का झिरो पेंडन्सी!विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पदभार स्वीकारताच झिरो पेंडन्सीचा उपक्रम हातात घेतला. आयुक्तांचा आदेश मानून जिल्हा प्रशासनानेही काम केले, मग हे प्रकरण निकालात निघण्याऐवजी प्रस्तावच गहाळ कसा होतो? असा प्रश्न विचारला जात आहे.आमचे कोण वाकडे करतोयशेतीमाला चार पैसे जादा दर मिळावा, यासाठी बाजार समित्यांच्या निर्मिती झाली; पण सहकारात वाढलेल्या प्रवृत्तीने ही यंत्रणा खिळखिळी केली आहे. संचालक मंडळ बरखास्त होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही संबंधित संचालकांवर कारवाईच होत नाही आणि हीच मंडळी ‘आमचे कोण वाकडे करतोय’ या आविर्भावात फिरत असतील तर शेतकºयांनी करायचे तरी काय?