शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गहाळ डी. डी.चे पैसे बँकेत सुरक्षित?

By admin | Updated: October 10, 2015 00:02 IST

पोरेवाडीचे नुकसानभरपाई प्रकरण : पैसे मिळणार कधी? मे महिन्यातच गहाळ; प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका

कोल्हापूर : मस्कत (ओमान) येथे अपघाती मृत्यू झालेल्या पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नीतेश पाटील यांच्या वारसांना मिळावयाचा असलेला नुकसानभरपाईचा २३ लाखांचा डी. डी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे गहाळ झाला. असे असले तरी पैसे बँकेत सुरक्षित आहेत. येथील बँक आॅफ बडोदाच्या सूत्रांनी ही माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. पैसे मिळण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून सर्व प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यामुळे गतीने सूत्रे हलविली तरीही सर्व पैसे मिळण्यास कमीत कमी सहा महिने लागण्याची शक्यता आहे. नितीशचा मस्कत (ओमान) येथे अपघाती मृत्यू झाला होता. मस्कत प्रशासनाकडून नुकसान भरपाईपोटी २३ लाख ३९ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे कायदेशीर वारस शोधून देण्यासाठी आला. दूतावासाकडून भरपाईचे पत्र आणि बँक आॅफ बडोदाचा डी.डी. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी पाठविला होता. या डी.डी.ची नियमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक नोंदवहीत नोंदही झाली आहे. त्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदार सुनीता नेर्लीकर यांच्याकडे गेला. डी.डी.ची तीन महिन्यांची मुदत संपण्यापूर्वी वारसांना नुकसानभरपाई पोहोच करण्याची जबाबदारी नेर्लीकर यांची आहे. त्यानुसार दोन महिला अव्वल कारकुनांनी डी.डी.ची मुदत संपत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून नेर्लीकर यांनी स्वतंत्र टिप्पणी तयार केली. ही टिप्पणी तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे नेऊन त्यावर त्यांची त्वरित सही घेणे गरजेचे होते. डी.डी.ची मुदत संपली. मुदतवाढीसाठी वारसदार मूळ डी.डी. मागण्यासाठी नेर्लीकर यांच्याकडे आले. त्यावेळी नेर्लीकर यांनी आपले काहीही चुकलेच नाही, असा त्यांनी आविर्भाव आणला.दोन जिल्हाधिकाऱ्यांना माहिती; तरीही...डी. डी. गहाळ झाल्याची माहिती तत्कालीन जिल्हाधिकारी माने, विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. सैनी, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण या अधिकाऱ्यांना पाच महिन्यांपूर्वीच होती. तरीही पैसे मिळालेले नाहीत, यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात किती टोकाचा गलथानपणा आहे, हे स्पष्ट होते. डी. डी. गहाळ केलेल्यांवर कारवाईही नाही आणि वारसांना पैसेही दिले नाहीत. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आतापर्यंत बघ्याचीच भूमिका घेत डी. डी. गहाळ केलेल्यांना पाठीशी घातल्याचेही पुढे आले आहे. त्वरित पाच लाख देण्याच्या हालचालीभरपाईचे पैसे मिळण्यासाठी दूतावासाकडून डी. डी. गहाळ झाल्याचे सबळ कारण देऊन पुन्हा डी. डी. काढून घ्यावा लागणार आहे किंवा पैसे थेट वारसांच्या बँक खात्यावर जमा करावे लागणार आहेत. यासाठी दूतावास, बँकेचे मुख्य कार्यालय यांच्या पातळीवर पाठपुरावा करावा लागणार आहे. पाठपुरावा किती गतीने होणार त्यावर पैसे त्वरित की विलंबाने मिळणार, हे अवलंबून आहे. दरम्यान, तेथून पैसे मिळेपर्यंत तातडीने मदत म्हणून पाच लाख रुपये द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांना दिल्याचे पालकमंत्री पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.