शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

गहाळ डी. डी.चे पैसे बँकेत सुरक्षित?

By admin | Updated: October 10, 2015 00:02 IST

पोरेवाडीचे नुकसानभरपाई प्रकरण : पैसे मिळणार कधी? मे महिन्यातच गहाळ; प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका

कोल्हापूर : मस्कत (ओमान) येथे अपघाती मृत्यू झालेल्या पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नीतेश पाटील यांच्या वारसांना मिळावयाचा असलेला नुकसानभरपाईचा २३ लाखांचा डी. डी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे गहाळ झाला. असे असले तरी पैसे बँकेत सुरक्षित आहेत. येथील बँक आॅफ बडोदाच्या सूत्रांनी ही माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. पैसे मिळण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून सर्व प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यामुळे गतीने सूत्रे हलविली तरीही सर्व पैसे मिळण्यास कमीत कमी सहा महिने लागण्याची शक्यता आहे. नितीशचा मस्कत (ओमान) येथे अपघाती मृत्यू झाला होता. मस्कत प्रशासनाकडून नुकसान भरपाईपोटी २३ लाख ३९ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे कायदेशीर वारस शोधून देण्यासाठी आला. दूतावासाकडून भरपाईचे पत्र आणि बँक आॅफ बडोदाचा डी.डी. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी पाठविला होता. या डी.डी.ची नियमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक नोंदवहीत नोंदही झाली आहे. त्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदार सुनीता नेर्लीकर यांच्याकडे गेला. डी.डी.ची तीन महिन्यांची मुदत संपण्यापूर्वी वारसांना नुकसानभरपाई पोहोच करण्याची जबाबदारी नेर्लीकर यांची आहे. त्यानुसार दोन महिला अव्वल कारकुनांनी डी.डी.ची मुदत संपत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून नेर्लीकर यांनी स्वतंत्र टिप्पणी तयार केली. ही टिप्पणी तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे नेऊन त्यावर त्यांची त्वरित सही घेणे गरजेचे होते. डी.डी.ची मुदत संपली. मुदतवाढीसाठी वारसदार मूळ डी.डी. मागण्यासाठी नेर्लीकर यांच्याकडे आले. त्यावेळी नेर्लीकर यांनी आपले काहीही चुकलेच नाही, असा त्यांनी आविर्भाव आणला.दोन जिल्हाधिकाऱ्यांना माहिती; तरीही...डी. डी. गहाळ झाल्याची माहिती तत्कालीन जिल्हाधिकारी माने, विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. सैनी, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण या अधिकाऱ्यांना पाच महिन्यांपूर्वीच होती. तरीही पैसे मिळालेले नाहीत, यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात किती टोकाचा गलथानपणा आहे, हे स्पष्ट होते. डी. डी. गहाळ केलेल्यांवर कारवाईही नाही आणि वारसांना पैसेही दिले नाहीत. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आतापर्यंत बघ्याचीच भूमिका घेत डी. डी. गहाळ केलेल्यांना पाठीशी घातल्याचेही पुढे आले आहे. त्वरित पाच लाख देण्याच्या हालचालीभरपाईचे पैसे मिळण्यासाठी दूतावासाकडून डी. डी. गहाळ झाल्याचे सबळ कारण देऊन पुन्हा डी. डी. काढून घ्यावा लागणार आहे किंवा पैसे थेट वारसांच्या बँक खात्यावर जमा करावे लागणार आहेत. यासाठी दूतावास, बँकेचे मुख्य कार्यालय यांच्या पातळीवर पाठपुरावा करावा लागणार आहे. पाठपुरावा किती गतीने होणार त्यावर पैसे त्वरित की विलंबाने मिळणार, हे अवलंबून आहे. दरम्यान, तेथून पैसे मिळेपर्यंत तातडीने मदत म्हणून पाच लाख रुपये द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांना दिल्याचे पालकमंत्री पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.