शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शाळा समायोजनाबाबत ‘डाव्यां’कडून दिशाभूल: तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:00 IST

कोल्हापूर : दहा पटसंख्येखालील शाळा समायोजनाबाबत कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक पालक, सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करीत आहेत. बहुजनांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू नये, असा त्यांचा डाव असून, तो सरकार हाणून पाडेल. समायोजनाबाबत खुल्या चर्चेसाठी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी बिंदू चौकात यावे, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे दिले.कोल्हापूर दौऱ्यावर ...

कोल्हापूर : दहा पटसंख्येखालील शाळा समायोजनाबाबत कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक पालक, सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करीत आहेत. बहुजनांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू नये, असा त्यांचा डाव असून, तो सरकार हाणून पाडेल. समायोजनाबाबत खुल्या चर्चेसाठी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी बिंदू चौकात यावे, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे दिले.कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शिक्षणमंत्री तावडे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अतिथिगृहात पत्रकारांशी संवाद साधला.तावडे म्हणाले, दहा पटसंख्येखालील शाळांमध्ये चार ते पाच विद्यार्थी असतात. या शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा, सहली, स्नेहसंमेलन होत नाही. अशा शाळांचे समायोजन केल्यास या सर्व उपक्रमांमध्ये तेथील विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. बहुजनांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवीत आहे. मात्र, त्याला जाणीवपूर्वक कोल्हापुरातील डाव्या विचारसरणीचे लोक विरोध करीत आहेत. त्यांनी खुल्या चर्चेसाठी बिंदू चौकात यावे. त्यांची भूमिका मांडावी. सरकारची भूमिका मी मांडेन. त्यातून खरे चित्र समोर येईल.ते म्हणाले, राज्यातील १३०० पैकी ५४७ शाळांचे समायोजन सरकारने केले आहे. उर्वरित ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा मुद्दा असल्याने तेथील समायोजन केलेले नाही. मात्र, तरीही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सरकारने १३०० शाळा बंद केल्याचे चुकीचे वक्तव्य केले आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाद्वारे १३ ओजस आणि शंभर तेजस शाळांची सुरुवात येत्या शैक्षणिक वर्षांपासून केली जाणार आहे. आंतरविद्याशाखीय पदवीधर घडण्यासाठी क्लस्टर युनिव्हर्सिटीला मान्यता देण्याचे पाऊल सरकारने टाकले आहे. कलचाचणी अहवाल लक्षात घेऊन पालकांनी आपल्या पाल्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा.दरम्यान, शिक्षणमंत्री तावडे यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही. जे. पवार, के. के. पाटील यांनी विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले. दि. १ व २ जुलैला पात्र शाळा व तुकड्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य (कायम) विनाअनुदान शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, गजानन काटकर यांनी शिक्षणमंत्री तावडे यांचा सत्कार केला. शिवाजी विद्यापीठ येथे राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे उपाध्यक्ष संतोष आयरे यांनी निवेदन दिले.एन. डी. पाटील यांची दिशाभूलया डाव्या विचारसरणीच्या लोकांनी शाळा समायोजनाबाबत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली आहे. समायोजनाबाबतची शासनाची भूमिका प्रा. पाटील यांना पटवून देण्याची माझी तयारी असल्याचे शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, शाळेला परवानगी देतानाही सरकारला शासकीय आदेश काढावा लागतो. त्यामुळे आदेशांची संख्या वाढलेली दिसते. धोरणात्मक असे केवळ ७८ शासकीय आदेश काढले आहेत.