शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा आनेवाडी टोलनाक्यावर अनर्थ!--उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 23:50 IST

सायगाव : ‘सातारा हा लोकसभा मतदार संघ माझा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाका कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या व्यक्तीकडे जाऊ देणार नाही,

ठळक मुद्दे ‘लोकमत’च्या वृत्तानंतर स्थानिक कामगारांमध्ये अस्वस्थता तुम्हाला उद्रेक पाहायचा असेल तर पाहा.. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली

लोकमत न्यूज नेटवर्क

सायगाव : ‘सातारा हा लोकसभा मतदार संघ माझा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाका कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या व्यक्तीकडे जाऊ देणार नाही, अन्यथा गाठ माझ्याशी आहे. स्थानिक कर्मचाºयांना कामावरून काढून टाकले तर, अनर्थ घडेल,’ असा सज्जड दम खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.पुणे-बेंगलोर महामार्गावर असणारा आनेवाडी टोलनाका दि. १ आॅक्टोबरपासून अशोका स्थापत्य कंपनीकड़ून काढून घेत कोल्हापूरच्या मक्रोलाइन कंपनीकडे येथील व्यवस्थापनकडे जाणार असल्याचे वृत्त बुधवारी फक्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. या वृत्तामुळे जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे यांना आनेवाडी येथील स्थानिक कामगारांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.‘काहीही झाले तरी टोलनाका अगोदरचेच लोक चालवणार आहेत. कारण दुसºया कुणाला हा टोलनाका अजिबात चालवता येणार नाही, नाही तर रिलायन्स कंपनीला मोठा भुर्दंड बसणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. मी संबंधित कोण आहेत, त्यांच्याशी लवकर बोलून घेणार आहे आणि येथील भूमिपुत्र कामगार वर्गावर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका,’ असे आश्वासन येथे उपस्थित कामगार वर्गाला दिले. बाहेरच्या जिल्ह्यातून कंत्राटदार येणार असल्याने कामगार वर्गही पर जिल्ह्यातून आणले जाणार असल्याने येथील भूमिपुत्र कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार राहणार आहे. रिलायन्स कंपनीकडे याबाबत विचारणा केली तरीही कोणतीही माहिती दिली जात नसल्यामुळे कामगारांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे, अशी भावना व्यक्त करणारे निवेदन येथील कामगारांनी खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन दिले.तर टोल नाका चालू देणार नाही..आनेवाडी टोलनाक्यावर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळाली आहे. व्यवस्थापन बदलो किंवा न बदलो, स्थानिक कर्मचाºयांवर या बदलामुळे गदा येणार असेल तर हा टोल नाका चालू देणार नाही, तुम्हाला उद्रेक पाहायचा असेल तर पाहा.. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे, असेही उदयनराजे म्हणाले.