शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

वनमित्र संस्थेकडून ‘मिरवेल’ गाव दत्तक

By admin | Updated: June 17, 2016 00:26 IST

लोकांच्या विकासासही प्राधान्य : नैसर्गिक, पर्यावरणपूरक विकास होणार

जहॉँगिर शेख -- कागल --निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता या क्षेत्रांत सामाजिक कार्य करणाऱ्या येथील वनमित्र संस्थेने ‘नैसर्गिक पर्यावरणपूरक विकास’ या संकल्पनेतून चंदगड तालुक्यातील ‘मिरवेल’ हे पारगडच्या पायथ्याशी असलेले गाव दत्तक घेतले आहे. प्रायोगिक पद्धतीने या छोट्याखानी गावात ही संस्था विविध प्रयोग करून पर्यावरणपूरक नैसर्गिक विकासाद्वारे गावचा आणि गावातील लोकांचा विकास घडवून आणणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील मेंढालेखा या गावाने वन विभागाच्या क्षेत्रात असूनही वनसंपदेच्या रक्षणाबरोबरच त्याचे संवर्धन करीत वनसंपदेच्या माध्यमातून गावाचा मोठा आर्थिक विकास केला आहे. एका बाजूला वनसंपदेतून उत्पन्नही आणि दुसऱ्या बाजूला वनसंपदेचे रक्षण-संवर्धन, अशी ही संकल्पना तेथे राबविली आहे. यातून प्रेरणा घेत वनमित्र संस्थेने मिरवेल या गावाची निवड करून प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. पारगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे चंदगड तालुक्यातील हे गाव महाराष्ट्र-गोवा सीमेवर आहे. या गावापासून गोवा राज्याची हद्द केवळ सहा किलोमीटर आहे. हे छोटे गाव आहे. गावातील लोकांच्या मालकीची जमीन अवघी चार एकर आहे. त्यामध्ये दोन एकर जिरायत, तर दोन एकर बागायत आहे. मात्र, गावच्या सभोवती वन विभागाच्या मालकीचे मोठे जंगल आहे. या जंगलाचा उपयोग वस्तू उत्पादनासाठी करून घेणे आणि त्यातून गावचा आर्थिक विकास घडवून आणणे, हे करीत असताना वनसंपदेला कोणताही धक्का लागू न देता उलट त्याचे रक्षण-संवर्धन करणे, असे हे नियोजन असून, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही यासाठी सहमती दिली आहे. गावातील नागरिकांनी संमती दिल्यानंतर आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. संस्थेचे अशोक शिरोळे, विक्रम चव्हाण, अमोल भुरले, मिथून कल्ले, राजू घोरपडे, काशिनाथ गारगोटे, बाळ जाधव, कैलास पाटील, लखन तुरगुडे, आदींनी गावाला भेटी देऊन प्राथमिक बैठका घेतल्या आहेत.