शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

वनमित्र संस्थेकडून ‘मिरवेल’ गाव दत्तक

By admin | Updated: June 17, 2016 00:26 IST

लोकांच्या विकासासही प्राधान्य : नैसर्गिक, पर्यावरणपूरक विकास होणार

जहॉँगिर शेख -- कागल --निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता या क्षेत्रांत सामाजिक कार्य करणाऱ्या येथील वनमित्र संस्थेने ‘नैसर्गिक पर्यावरणपूरक विकास’ या संकल्पनेतून चंदगड तालुक्यातील ‘मिरवेल’ हे पारगडच्या पायथ्याशी असलेले गाव दत्तक घेतले आहे. प्रायोगिक पद्धतीने या छोट्याखानी गावात ही संस्था विविध प्रयोग करून पर्यावरणपूरक नैसर्गिक विकासाद्वारे गावचा आणि गावातील लोकांचा विकास घडवून आणणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील मेंढालेखा या गावाने वन विभागाच्या क्षेत्रात असूनही वनसंपदेच्या रक्षणाबरोबरच त्याचे संवर्धन करीत वनसंपदेच्या माध्यमातून गावाचा मोठा आर्थिक विकास केला आहे. एका बाजूला वनसंपदेतून उत्पन्नही आणि दुसऱ्या बाजूला वनसंपदेचे रक्षण-संवर्धन, अशी ही संकल्पना तेथे राबविली आहे. यातून प्रेरणा घेत वनमित्र संस्थेने मिरवेल या गावाची निवड करून प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. पारगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे चंदगड तालुक्यातील हे गाव महाराष्ट्र-गोवा सीमेवर आहे. या गावापासून गोवा राज्याची हद्द केवळ सहा किलोमीटर आहे. हे छोटे गाव आहे. गावातील लोकांच्या मालकीची जमीन अवघी चार एकर आहे. त्यामध्ये दोन एकर जिरायत, तर दोन एकर बागायत आहे. मात्र, गावच्या सभोवती वन विभागाच्या मालकीचे मोठे जंगल आहे. या जंगलाचा उपयोग वस्तू उत्पादनासाठी करून घेणे आणि त्यातून गावचा आर्थिक विकास घडवून आणणे, हे करीत असताना वनसंपदेला कोणताही धक्का लागू न देता उलट त्याचे रक्षण-संवर्धन करणे, असे हे नियोजन असून, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही यासाठी सहमती दिली आहे. गावातील नागरिकांनी संमती दिल्यानंतर आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. संस्थेचे अशोक शिरोळे, विक्रम चव्हाण, अमोल भुरले, मिथून कल्ले, राजू घोरपडे, काशिनाथ गारगोटे, बाळ जाधव, कैलास पाटील, लखन तुरगुडे, आदींनी गावाला भेटी देऊन प्राथमिक बैठका घेतल्या आहेत.