शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मिरज रेल्वे स्थानक, वसाहतीत पाणीटंचाई

By admin | Updated: July 20, 2014 23:44 IST

योजना बंद : रेल प्रशासनाची तारांबळ

मिरज : रेल्वेची पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने मिरज रेल्वे स्थानकावर व कर्मचारी वसाहतीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली. मिरजेत पाणी नसल्याने हुबळी, निरा व पुणे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली.मिरज स्थानकातून दररोज ६० रेल्वेगाड्या ये-जा करतात. रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेसह पाणी भरण्याचे काम मिरजेत करण्यात येते. स्थानकालगत असलेल्या हैदरखान विहिरीतून मिळणारे पाणी अपुरे असल्याने पाच वर्षापूर्वी रेल्वेने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. दररोज ४५ लाख लिटर पाणी उपसा व शुद्धीकरण करून रेल्वेगाड्यांना कर्मचारी वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. शनिवारी रात्री कृष्णा नदीवरील पंपिंग स्टेशनवरील मोटार बंद पडल्याने स्थानकाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. स्थानकातून येणाऱ्या-जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना दरररोज तीन लाख लिटर पाण्याची गरज आहे, तर रेल्वेस्थानकांत प्रवाशांना पिण्यासाठी, रेल्वेगाड्यांच्या स्वच्छतेसाठी व रेल्वे कर्मचारी वसाहतीला पुरवण्यासाठी उर्वरित पाण्याचा वापर केला जातो. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेची पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने मिरज रेल्वेस्थानकात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. कृष्णाघाट पंपिंग स्टेशनमधील मोटार दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. रविवारी सकाळी मिरजेत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये हुबळी, निरा व पुणे स्थानकावर पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली. प्लॅटफॉर्म तीन व चारवर हैदरखान विहिरीतील पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला. प्लॅटफॉर्म एकवर मात्र पाणी नव्हते. कर्मचारी वसाहतीत आज पाणीपुरवठा बंद होता. सोमवारपर्यंत तो सुरळीत होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा बंद असल्याने हुबळी व पुणे येथे एक्स्प्रेस गाड्या जादा वेळ थांबविण्यात आल्या. पाणीटंचाईमुळे प्रवाशांचे हाल झाले. (वार्ताहर)