शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सांगलीला महिन्यात मंत्रिपद : चंद्रकांतदादा

By admin | Updated: November 10, 2015 00:01 IST

आर्थिक परिस्थितीच्या कारणास्तव अर्थखात्याने बायबॅकचे कोणतेही प्रस्ताव अडविलेले नाहीत.

सांगली : दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद, अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी यामुळे सांगलीला हवा तेवढा वेळ आपणास देता आला नाही. मंत्रिपदाचा या जिल्ह्याचा अनुशेष येत्या महिन्याभरात दूर होणार असल्याने सांगलीची चिंता मिटेल, असे मत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, सांगलीसाठी अनेक योजना सरकारने मंजूर करून त्याची अंमलबजावणीही केली आहे. अग्रणी नदी पुनरुज्जीवन, चांदोली पर्यटन विकास, वायफाय सुविधा, महाराजस्व अभियान अशा अनेक योजना जिल्ह्यात राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका चुकीची आहे. सांगली जिल्ह्यातून जे विकासाचे प्रस्ताव येतील, त्यांचा पाठपुरावा करून मंजुरी मिळवून देण्यात येईल. मंत्रिपद नसल्याने होत असलेली सांगली जिल्ह्याची अडचणही मी समजू शकतो. येत्या महिन्याभरात ही अडचण दूर होईल. सांगलीतला टोल बायबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बायबॅकचे जेवढे प्रस्ताव तयार झाले आहेत, त्याला मंजुरी मिळेल. आर्थिक परिस्थितीच्या कारणास्तव अर्थखात्याने बायबॅकचे कोणतेही प्रस्ताव अडविलेले नाहीत. त्यामुळे सांगलीच्या टोलबाबतही नागरिकांनी निश्चिंत राहावे. यापुढे सांगलीकरांना टोल द्यावा लागणार नाही. सांगलीच्या चांदोली पर्यटन विकासाअंतर्गत मत्स्यबीज प्रकल्पासाठी निधी उलपब्ध करून देण्यात आला आहे. याठिकाणी ट्रॅकिंग ट्रॅक व अन्य सुविधांसाठीही शासन मदत करणार आहे. जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळे व तीर्थस्थळांचा विकास करण्यात येईल. शासनाच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त जिल्ह्यात नाबार्ड-राज्यमार्ग, जिल्हा व इतर मार्गांतर्गत एकूण ८० प्रकल्पांना लवकरच सुरुवात होईल. महामार्गांच्या प्रस्तावाबाबतही पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जमिनी संपादनाचा प्रश्न...रस्त्यांचे रुंदीकरण आणि नव्या महामार्गांच्या कामात सर्वांत मोठा अडथळा भूमी संपादनाचा येत आहे. लोकांशी चर्चा करून त्यांची समजूत घालून जमिनी संपादन करण्यात वेळ जातो. त्यामुळे प्रकल्प रेंगाळून खर्च वाढतो. सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरणातही असाच अनुभव आला. तरीही आता जमीन संपादनाचा प्रश्न निकालात काढला आहे. यापुढे कोणत्याही रस्ते प्रकल्पात अशा अडचणी येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करू, असे पाटील म्हणाले.