शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

नागरिकांच्या गराड्यात मंत्र्यांचा लोकशाही दिन,९०० हून अधिक तक्रारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 11:53 IST

कडकनाथ कोंबडी फसवणूक, पूरबाधित शेतकऱ्यांची प्रलंबित अनुदान रक्कम, भू-विकास बँक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा, शेती पंपांच्या प्रलंबित वीजजोडण्या, इचलकरंजी नगरपालिकेकडून प्रलंबित असलेला दिव्यांगांचा पाच टक्के निधी यासह विविध विभागांशी संबंधित ९०० हून अधिक तक्रार अर्ज लोकशाही दिनात दाखल झाल्या.

ठळक मुद्दे९०० हून अधिक तक्रारी अर्ज दाखलएक महिन्यात उत्तर देण्याचे मंत्र्यांचे आदेश

कोल्हापूर :कडकनाथ कोंबडी फसवणूक, पूरबाधित शेतकऱ्यांची प्रलंबित अनुदान रक्कम, भू-विकास बँक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा, शेती पंपांच्या प्रलंबित वीजजोडण्या, इचलकरंजी नगरपालिकेकडून प्रलंबित असलेला दिव्यांगांचा पाच टक्के निधी यासह विविध विभागांशी संबंधित ९०० हून अधिक तक्रार अर्ज सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर या मंत्र्यांच्या लोकशाही दिनात दाखल झाल्या. तक्रारदाराला एक महिन्यात संबंधित विभागाने उत्तर देण्याचे आदेश मंत्र्यांनी यावेळी दिले.शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृह येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.लोकशाही दिन असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपºयांतून ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, शेतकरी, पेन्शनधारक आदी नागरिक सकाळी नऊ वाजल्यापासूनच या ठिकाणी दाखल झाले होते. दुपारी १२ ते २ यावेळेत लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता; परंतु प्रचंड गर्दी पाहता सकाळी अकरापासूनच कामकाजाला सुरुवात करण्यात आली. तक्रार अर्ज देण्यासाठी लांबलचक रांग लागली होती.

सभागृहाबाहेर विविध शासकीय विभागांची २८ टेबल मांडण्यात आली होती. अर्ज स्वीकृतीसाठी या प्रत्येक विभागाची जबाबदारी संबंधित विभागांचे प्रमुख, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अधीक्षक अभियंता आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रांगेतील तक्रारदारांचा अर्ज नोंदवून घेऊन त्यासोबत शासनाचा टोक न अर्ज देऊन त्यांना लोकशाही दिनात मंत्र्यांकडे पाठविले जात होते. या ठिकाणी तक्रारीचे स्वरूप पाहून मंत्री त्यावर शेरा मारून पुढे कार्यवाहीसाठी पाठवत होते. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या टीमकडून त्या अर्जांचे वर्गीकरण करून संबंधित विभागांच्या टेबलकडे पाठविले जात होते. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.

तक्रारदाराला एक महिन्यात उत्तर द्यालोकशाही दिनात तक्रार अर्ज दिलेल्या तक्रारदाराला त्याच्या प्रश्नाचे उत्तर संंबंधित विभागाने द्यावे, असे आदेश मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील व राज्यमंत्री यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

 

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूर