शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 16:29 IST

२१ मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपत आहे. परंतू सदस्यांना दिलेला निधी खर्च करण्यासाठी वाव मिळणार आहे.

कोल्हापूर : आणखी चार पाच महिने तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार नाहीत असा अंदाज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘चंदगड’ भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, २१ मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपत आहे. येथील मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे प्रशासक म्हणून नेमले जातील. परंतू सदस्यांना दिलेला निधी खर्च करण्यासाठी वाव मिळणार आहे. कारण चार, पाच महिने जिल्हा परिषद निवडणुका होणार नाहीत.कारण ओबीसी आरक्षणाबाबत १७ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. इम्पिरिकल डाटाचे तुमचे काम प्रगतीपथावर आहे का अशी विचारणा न्यायालयाने महाराष्ट्राला केली होती. त्यानुसार आम्ही मागास आयोगासाठी निधी दिला आहे. मनुष्यबळ दिले आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यत निवडणुका घेवू नयेत अशीही मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी तीन, चार महिने वेळ लागेल.सर्व जिल्ह्यांमध्ये अशा पध्दतीने भवन उभारणीकोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका हा ११० ते १६० किलोमीटर अंतरावर आहे. तेथून आलेल्या सदस्य, सरपंच यांना एका दिवसात जिल्हापातळीवरील सर्व कामे करता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या निवासासाठी सदस्य निधीतून हे ‘चंदगड भवन’ उभारण्यात आले आहे. अशा पध्दतीने ज्या जिल्ह्यात अडचण असेल तेथील जिल्हा परिषदेने प्रस्ताव दिल्यास तेथेही भवन उभारण्यास सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी मुश्रीफ यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषद