शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 16:29 IST

२१ मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपत आहे. परंतू सदस्यांना दिलेला निधी खर्च करण्यासाठी वाव मिळणार आहे.

कोल्हापूर : आणखी चार पाच महिने तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार नाहीत असा अंदाज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘चंदगड’ भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, २१ मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपत आहे. येथील मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे प्रशासक म्हणून नेमले जातील. परंतू सदस्यांना दिलेला निधी खर्च करण्यासाठी वाव मिळणार आहे. कारण चार, पाच महिने जिल्हा परिषद निवडणुका होणार नाहीत.कारण ओबीसी आरक्षणाबाबत १७ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. इम्पिरिकल डाटाचे तुमचे काम प्रगतीपथावर आहे का अशी विचारणा न्यायालयाने महाराष्ट्राला केली होती. त्यानुसार आम्ही मागास आयोगासाठी निधी दिला आहे. मनुष्यबळ दिले आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यत निवडणुका घेवू नयेत अशीही मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी तीन, चार महिने वेळ लागेल.सर्व जिल्ह्यांमध्ये अशा पध्दतीने भवन उभारणीकोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका हा ११० ते १६० किलोमीटर अंतरावर आहे. तेथून आलेल्या सदस्य, सरपंच यांना एका दिवसात जिल्हापातळीवरील सर्व कामे करता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या निवासासाठी सदस्य निधीतून हे ‘चंदगड भवन’ उभारण्यात आले आहे. अशा पध्दतीने ज्या जिल्ह्यात अडचण असेल तेथील जिल्हा परिषदेने प्रस्ताव दिल्यास तेथेही भवन उभारण्यास सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी मुश्रीफ यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषद