शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

महापालिकेत कोट्यवधीचा रस्ते घोटाळा

By admin | Updated: June 1, 2017 00:28 IST

अधिकारी व ठेकेदार यांचा संगनमताने डल्ला--साडेसहा कोटींची रस्त्याची कामे खराब,खराब ५६ रस्त्यांऐवजी १८ रस्त्यांचे ‘थर्ट पार्टी आॅडिट’

१८ रस्त्यांत ७३ लाखांचे नुकसान; अहवालही लपविला---‘त्या’ अधिकारी ठेकेदारांवर फौजदारीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महानगरपालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीभगत असल्याचे आरोप वारंवार झाले, परंतु ते कधी उघड झाले नाहीत. मात्र, शहरातील खराब रस्त्यांच्या ‘थर्ड पार्टी आॅडिट’मुळे ते पुराव्यांसह उघड झाले आहेत. दायित्व कालावधीत रस्ते खराब झाल्यानंतही संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचे टाळले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचार बाहेर येईल या भीतीने ५६ पैकी १८ रस्त्यांचेच ‘थर्ड पार्टी आॅडिट’ करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला असल्याची गंभीर बाबसुद्धा यातून समोर आली आहे. महानगरपालिका प्रशासनाने गेल्यावर्षी राज्य व जिल्हा नगरोत्थान तसेच स्वत:च्या निधीतून ६ कोटी ५० लाखांची रस्त्यांची कामे करून घेतली होती; परंतु ही रस्त्यांची कामे खराब झाल्याचा आक्षेप काही नगरसेवकांनी केला. तत्कालिन आयुक्तांच्या आदेशाने कनिष्ठ अभियंत्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी तयार केला. त्यावेळी ढोबळमानाने ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगून सरनोबत यांनी संबंधित ठेकेदारांकडून दुरूस्त करून घेण्याचे आश्वासनही दिले होते. तथापि या सर्व रस्त्यांच्या कामाचे ‘थर्ट पार्टी आॅडिट’ करून घेण्याची मागणी करण्यात आली. ती मान्य करण्यात येऊन हे काम वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे देण्यात आले. त्यांनी आपला अहवाल ७ मार्चला सादर केला. या अहवालात गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत; परंतु हा अहवालच अधिकाऱ्यांच्या साखळीने लपवून ठेवला. संबंधित ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेण्याचे टाळले. संबंधितांवर फौजदारी करावी : शेटे शहरातील खराब झालेले रस्ते आणि ठेकेदारांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न लक्षात घेता महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याने संबंधित सर्व अधिकारी व ठेकेदारांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी बुधवारी आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे पुराव्यांसह केली. अशाच प्रकारच्या मागणीचे निवेदन आपण नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे करणार असल्याचे शेटे यांनी पत्रकारांना सांगितले.मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अशा प्रकरणात कठोर कारवाई करून सर्वांवर गुन्हे दाखल केले होते; मग कोल्हापूर महानगरपालिकेत का होत नाही, असा सवालही शेटे यांनी उपस्थित केला. बुधवारी पत्रकार परिषदेत अधिकारी-ठेकेदार यांच्यातील साखळीचा शेटे यांनी पर्दाफाश केला. १८ रस्त्यांच्या कामात ७३ लाखांचे नुकसान ‘वालचंद’ महाविद्यालयाने केलेल्या पाहणीत अनेक त्रुटी दिसून आल्या. रस्ते करण्यापूर्वी क्रॅचेस केलेले नाही, डांबराचे प्रमाण कमी आहे. खडीचा दर्जा चांगला नाही, डांबर व खडी मिक्सिंग एकदम कमी प्रमाणाचे आहे, तसेच अपुरे मटेरियल वापरले आहे, अशी निरीक्षणे ‘वालचंद’ने नोंदविली आहेत. या अठरा रस्त्यांच्या कामात महानगरपालिकेचे ७२ लाख ९९ हजार ७३३ रुपयांचे नुकसान झाले आहे. जर अठरा कामांत एवढे नुकसान झाले असेल तर प्रत्यक्षात ५६ रस्त्यांमध्ये किती नुकसान झाले असेल? हा प्रश्न नव्याने तयार झाला आहे. ५६ रस्ते खराब, आॅडिट मात्र १८ रस्त्यांचेगतवर्षी प्रशासनाने ५६ रस्ते केले. त्यातील बहुतांशी रस्ते खराब झाले. जेव्हा या रस्त्यांचे टेक्निकल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा केवळ १८ रस्त्यांचीच यादी देण्यात आली. वास्तविक ५६ रस्त्यांची यादी देणे आवश्यक असताना तसे का केले नाही, भ्रष्टाचार बाहेर येईल, या भीतीनेच १८ रस्त्यांची यादी देण्यात आल्याचा आरोप शेटे यांनी केला. केवळ दहा टक्केच दुरुस्ती : खराब रस्ते संबंधितांकडून दुरुस्त करून घेण्याचे आश्वासन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिले होते. या आश्वासनांप्रमाणे त्यांनी ५६ पैकी केवळ दहा टक्के रस्त्यांची दुरुस्ती करून घेतल्याचे नाटक केले. ७ मार्चला ‘वालचंद’चा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला पण तो लपवून ठेवला. अठरा रस्त्यांच्या कामाची संबंधित ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेणे अपेक्षित होते. मात्र, हे प्रकरणच दाबून ठेवले, असा आरोप भूपाल शेटे यांनी केला.