शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

चार गावांतील १७०९ व्यक्तींचे स्थलांतर; चिखली-आंबेवाडीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:36 IST

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार गावांमधील १७०९ व्यक्तींचे व ३६५ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचार गावांतील १७०९ व्यक्तींचे स्थलांतरचिखली आंबेवाडीतील नागरिकांचा समावेश

 कोल्हापूर : अतिवृष्टी, धरणांतून वाढलेला पाण्याचा विसर्ग या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ व रेस्क्यू टीमच्या सहकार्याने आंबेवाडी आणि चिखली येथील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गावांना भेट देवून नागरिकांना स्थलांतराची सुचना केली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार गावांमधील १७०९ व्यक्तींचे व ३६५ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरसह धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे पून्हा उघडले असून लहान मोठ्या प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे गेली आहे.

त्यामुळे  जिल्हाधिकारी दोलत देसाई यांनी ग्रामस्थांची भेट घेवून त्यांना जनावरांसह स्थलांतर करण्याची सुचना केली. आतापर्यंत एनडीआरएफ व रेसक्यू टीमच्या सहकार्याने जवळपास ४० टक्के नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

करवीर तालुक्यातील चिखली गावातील ८९५ व्यक्ती २३७ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आंबेवाडी गावातील ६१५ व्यक्ती ११२ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड- बाधित १ गावातील ४५ कुटुंबांतील १८४ व्यक्ती, १६ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील ८ कुटुंबांतील १५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

शहरातील संक्रमण शिबिरात १५ जण

कोल्हापूर शहरात उघडण्यात आलेल्या संक्रमण शिबिरात ५ पुरुष, ९ महिला तर १ लहान मूल अशा १५ जणांचा समावेश आहे.

 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी