शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

चार गावांतील १७०९ व्यक्तींचे स्थलांतर; चिखली-आंबेवाडीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:36 IST

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार गावांमधील १७०९ व्यक्तींचे व ३६५ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचार गावांतील १७०९ व्यक्तींचे स्थलांतरचिखली आंबेवाडीतील नागरिकांचा समावेश

 कोल्हापूर : अतिवृष्टी, धरणांतून वाढलेला पाण्याचा विसर्ग या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ व रेस्क्यू टीमच्या सहकार्याने आंबेवाडी आणि चिखली येथील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गावांना भेट देवून नागरिकांना स्थलांतराची सुचना केली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार गावांमधील १७०९ व्यक्तींचे व ३६५ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरसह धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे पून्हा उघडले असून लहान मोठ्या प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे गेली आहे.

त्यामुळे  जिल्हाधिकारी दोलत देसाई यांनी ग्रामस्थांची भेट घेवून त्यांना जनावरांसह स्थलांतर करण्याची सुचना केली. आतापर्यंत एनडीआरएफ व रेसक्यू टीमच्या सहकार्याने जवळपास ४० टक्के नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

करवीर तालुक्यातील चिखली गावातील ८९५ व्यक्ती २३७ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आंबेवाडी गावातील ६१५ व्यक्ती ११२ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड- बाधित १ गावातील ४५ कुटुंबांतील १८४ व्यक्ती, १६ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील ८ कुटुंबांतील १५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

शहरातील संक्रमण शिबिरात १५ जण

कोल्हापूर शहरात उघडण्यात आलेल्या संक्रमण शिबिरात ५ पुरुष, ९ महिला तर १ लहान मूल अशा १५ जणांचा समावेश आहे.

 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी