शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

चार गावांतील १७०९ व्यक्तींचे स्थलांतर; चिखली-आंबेवाडीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:36 IST

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार गावांमधील १७०९ व्यक्तींचे व ३६५ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचार गावांतील १७०९ व्यक्तींचे स्थलांतरचिखली आंबेवाडीतील नागरिकांचा समावेश

 कोल्हापूर : अतिवृष्टी, धरणांतून वाढलेला पाण्याचा विसर्ग या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ व रेस्क्यू टीमच्या सहकार्याने आंबेवाडी आणि चिखली येथील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गावांना भेट देवून नागरिकांना स्थलांतराची सुचना केली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार गावांमधील १७०९ व्यक्तींचे व ३६५ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरसह धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे पून्हा उघडले असून लहान मोठ्या प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे गेली आहे.

त्यामुळे  जिल्हाधिकारी दोलत देसाई यांनी ग्रामस्थांची भेट घेवून त्यांना जनावरांसह स्थलांतर करण्याची सुचना केली. आतापर्यंत एनडीआरएफ व रेसक्यू टीमच्या सहकार्याने जवळपास ४० टक्के नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

करवीर तालुक्यातील चिखली गावातील ८९५ व्यक्ती २३७ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आंबेवाडी गावातील ६१५ व्यक्ती ११२ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड- बाधित १ गावातील ४५ कुटुंबांतील १८४ व्यक्ती, १६ जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील ८ कुटुंबांतील १५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

शहरातील संक्रमण शिबिरात १५ जण

कोल्हापूर शहरात उघडण्यात आलेल्या संक्रमण शिबिरात ५ पुरुष, ९ महिला तर १ लहान मूल अशा १५ जणांचा समावेश आहे.

 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी