शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शेतकऱ्यांंना मीटरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:04 IST

तानाजी पोवार।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतीसाठी पाणी उपसा करणाºया कृषिपंपधारकांसाठीही ‘पाणी वाचवा’ हे शासनाचे धोरण आता लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नदीतून कृषिपंपांद्वारे उपसा होणाºया पाण्याचे मीटरद्वारे मोजमाप होऊन त्याचे बिल शेतकºयांच्या आणि पाणीपुरवठा संस्थांच्या हाती पडणार आहे. राज्यातील प्रत्येक कृषिपंपाला पाण्याचे मीटर बसविण्यात येणार असून, त्याची अंमलबजावणी१ मार्चपासून सुरू ...

तानाजी पोवार।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतीसाठी पाणी उपसा करणाºया कृषिपंपधारकांसाठीही ‘पाणी वाचवा’ हे शासनाचे धोरण आता लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नदीतून कृषिपंपांद्वारे उपसा होणाºया पाण्याचे मीटरद्वारे मोजमाप होऊन त्याचे बिल शेतकºयांच्या आणि पाणीपुरवठा संस्थांच्या हाती पडणार आहे. राज्यातील प्रत्येक कृषिपंपाला पाण्याचे मीटर बसविण्यात येणार असून, त्याची अंमलबजावणी१ मार्चपासून सुरू झाली आहे. त्यामुळे आता शेतकºयाला पाणी उपसा करण्यावर मर्यादा येणार आहे.‘पाटबंधारे’च्या नियमानुसार धरणापासून पाटापर्यंतच्या पाण्यावर शेतकºयाचा अधिकार मानला जातो. यासाठी प्रती अश्वशक्ती (हॉर्सपॉवर)नुसार ठरावीक रक्कम एकदाच आकारून वर्षभर कृषिपंपातून पाहिजे तेवढ्या पाण्याचा उपसा केला जातो. हे दर शासनाच्या मंजुरीनंतर महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामार्फत अमलात आणले जातात. दर तीन वर्षांनी ते बदलतात. २००५ च्या नियमानुसार पाणी काटकसरीने वापरण्याचे व धरणातून समन्यायी पाणी वाटप करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार शेतीसाठी वर्षातून एकदाच पैसे भरून अहोरात्र उपसा करणाºया शेतकºयांच्या कृषिपंपालाच मीटर बसविण्याची योजना शासनाने कार्यरत केली आहे. तिची पहिली बिले ३० जूननंतर दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.प्रतिवर्षी दरात वाढमहाराष्टÑ जल संपत्ती नियमन प्राधिकरणाने प्रतिहजार लिटरमागे मीटरवर दर जाहीर केले असले तरीही त्यांची अद्याप शेतकºयांच्या कृषिपंपांपर्यंत अंमलबजावणी झाली नसतानाही या जाहीर केलेल्या दरामध्ये जुलै २०१८ पासून १० टक्के वाढ करण्यात येणार आहे; तर त्यानंतर २०१९ नंतर २० टक्के वाढ सुचविण्यात आलेली आहे.दुहेरी बिल द्यावे लागणारकृषीपंपांना मीटरद्वारे पाणी देण्याच्या योजनेची अंमलबजावणी १ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयाला आता उपसा केलेल्या पाण्याचे बिल उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे ऋतूप्रमाणे तीन वेळा तसेच दरमहा विजेचे बिल असे दुहेरी बिल भरावे लागणार आहे.शेतकºयांनी धरणांसाठी जमिनी दिल्या. त्यामुळे पाण्यावर शेतकºयांचा हक्क आहे. प्रकल्पग्रस्त शेतकºयांचे अनेक ठिकाणी पुनर्वसन झालेले नाही. सरकार जर मीटरने पाण्याचा दर आकारणार असेल तर प्रकल्पग्रस्त शेतकºयांना आजच्या बाजारभावाने जमिनींचा मोबदला द्या. अशाप्रकारे पैसे गोळा करण्याचा सरकारला अधिकार नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही.- खा. राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनाकृषिपंपांना मीटर बसविणे म्हणजे शेतकºयाचे अधिकार काढून घेण्याचा प्रकार आहे. पाटबंधारे विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे होणारी पाणीचोरी थांबविण्यासाठी अगोदर प्रयत्न करावेत. त्यानंतर मीटर बसविण्यासारखी बंधने घालावीत. शेतकºयांचे पाण्यावरील अधिकार मर्यादित ठेवण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही. - भगवान काटे, जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी संघटना, कोल्हापूरकृषिपंप मीटरचे दरकृषिपंपावर वॉटर मीटर बसविल्यानंतर वर्षातून तीनवेळा वापरलेल्या पाण्याचे बिल कृषिपंपधारक आणि इरिगेशन संस्थांच्या हातात पुढील तारखांना पडणार आहे.च्दि. ३० जून : ०.२.९३ पैसे (प्रतिहजार लिटर)च्दि. १४ आॅक्टोबर : ०.८.७८ पैसे (प्रतिहजार लिटर)च्दि. २८ फेब्रुवारी : ०.५.८५ पैसे (प्रतिहजार लिटर)