शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एलबीटीबाबतच्या आदेशाचा गोंधळ

By admin | Updated: November 16, 2014 23:34 IST

महापालिका शांत : आर्थिक अडचणी वाढणार

सांगली : कारवाईच्या माध्यमातून एलबीटी वसुलीत वाढ करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना आता शासनस्तरावरून अडथळे येण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून महापालिकेला कारवाई थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली असली तरी, महापालिकेचा यास अद्याप दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे आदेशाच्या चर्चेने एलबीटी वसुलीचे त्रांगडे झाले आहे. महापालिकेच्या आर्थिक अडचणींना सर्वात मोठा फटका एलबीटीच्या माध्यमातून बसत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधित ३८ कोटींच्या घरात एलबीटी वसूल झाली आहे. सध्या एलबीटी वसुली थंडावली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून एलबीटी (स्थानिक संस्था कर) भरण्यावर बहिष्कार टाकला आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने अशा व्यापाऱ्यांवर कारवाईची मोहीम उघडली होती. त्यामुळे व्यापारी व महापालिकेतील संघर्ष आता टोकाला गेला आहे. एलबीटीचा प्रश्न सुटेपर्यंत महापालिकेने कारवाई थांबवावी, अशी मागणी कृती समितीने अनेकदा केली होती. महापालिकेने त्यांची ही मागणी धुडकावून लावली होती. त्यानंतर राज्यातील व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनाही तशा आशयाचे पत्र दिले होते. शनिवारी यासंदर्भात फडणवीस यांनी आदेश दिल्याचे व्यापाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. व्यापाऱ्यांनी शासनाच्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले असतानाच महापालिकेने आदेशाबाबत अद्याप कोणताही दुजोरा दिला नाही. याशिवाय कारवाई किंवा वसुलीबाबतची पुढील भूमिकाही प्रशासनाने स्पष्ट केली नाही. त्यामुळे एलबीटी वसुलीचे त्रांगडे निर्माण झाले आहे. शासनाचे कारवाई थांबविण्याबाबतचे आदेश खरोखरीच आले असतील, तर महापालिकेच्या आर्थिक अडचणी वाढणार आहेत. सध्या महापालिका कर्मचाऱ्यांचे पगारही होणे मुश्किल झाले आहे. विकासकामे ठप्प आहेत. शासन निधीवर जी काही कामे सुरू आहेत, त्यावरच प्रशासनाची मदार आहे. व्यापारी एलबीटी बहिष्कारावर ठाम आहेत. त्यामुळे यापुढे ते कर भरणार नाहीत. महापालिकेच्या एलबीटीची वसुली ठप्प झालीच, तर विकास कामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)