शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

व्यापाऱ्यांचा संप मागे;

By admin | Updated: July 14, 2016 00:43 IST

बाजार समिती आजपासून सुरू

कोल्हापूर : राज्य शासनाने पणन कायद्यात सुधारणा करून कांदा-बटाटा, फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्याने व्यापाऱ्यांनी सोमवार (दि. ११)पासून सुरू केलेले काम बंद आंदोलन बुधवारी रात्री मागे घेतले. व्यापारी महासंघ व राज्य शासनाच्या प्रतिनिधींची मुंबईत बैठक झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. त्यामुळे आज, गुरुवारपासून व्यवहार सुरू होईल. आज सकाळी ११ वाजता व्यापाऱ्यांनी पुढील दिशा निश्चित करण्यासाठी बैठक बोलविली आहे. तीन दिवस बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने त्याची गंभीर दखल घेतली. शेतकरी बाजार समितीत आले तर त्यांच्या मालाच्या विक्रीची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी समित्यांना दिले होते. त्यामुळे संचालक मंडळ जागे झाले. कोल्हापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत या आदेशाची चर्चा झाली. व्यापारी असोसिएशनची मुंबईत चर्चा सुरू आहे, त्यातून मार्ग निघेल, असे व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार वळंजू व सदानंद कोरगावकर यांनी सांगितले. प्रथम बाजारपेठ सुरू करा आणि मग चर्चा सुरू ठेवा, अशी भूमिका सभापती परशराम खुडे व उपसभापती विलास साठे यांनी घेतली. बंद थांबवा : ११० व्यापाऱ्यांना नोटिसा बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरणे थांबवून पूर्ववत व्यवहार सुरू करा; अन्यथा परवाना रद्द करण्यात येईल, अशा नोटिसा बुधवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने ११० कांदा-बटाटा, फळे-भाजीपाला व्यापाऱ्यांना लागू केल्या होत्या. सरकारच्या पातळीवरून समितीच्या प्रशासनावर दबाव असल्याने संचालक मंडळाने तातडीने बैठक घेऊन व्यापाऱ्यांवर कारवाईचे हत्यार उपसले. (प्रतिनिधी)