शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

संगीतसूर्यांची स्मृती जपणारा रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर

By admin | Updated: August 12, 2015 00:45 IST

भालचंद्र पेंढारकर यांनी केशवराव भोसले यांची ललितकलादर्श संस्था नेटाने चालविली.

कोल्हापूर : संगीत रंगभूमीवर नव्या युगाचा प्रारंभ करणारे संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श संस्थेचा वारसा ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांनी जपला. त्यांच्यामुळे केशवरावांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचे कार्य घडले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे ‘ललितकलादर्श’ ही संस्था सुरू केली. या संस्थेने अनेक नाटकांना लोकप्रियता मिळवून दिली. केशवरावांच्या मृत्यूनंतर बापूराव पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळून सत्तेचे गुलाम, कुंजविहारी, कृष्णार्जुनयुद्ध, श्री, सोन्याचा कळस, आदी नवी नाटके मराठी रंगभूमीवर आणली; पण त्यांच्या अकाली निधनानंतर‘ललितकलादर्श’ पोरकी झाली. त्याचवेळी बोलपटांमुळे संगीत नाटकांची लोकप्रियता ओसरू लागली होती, पण बापूरावांचे सुपुत्र भालचंद्र पेंढारकर यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी १९४२ साली नव्या जोमाने संस्थेचे पुनरुज्जीवन केले. सुरुवातीला त्यांनी बापूरावांची जुनी नाटकेच सादर केली; पण त्यात नावीन्य आणि नवी नाटके रंगमंचावर आणत ललितकलादर्शला ऊर्जितावस्थेत आणले. त्यांनी सादर केलेली दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, गीता गाती ज्ञानेश्वर, आदी नाटके गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातील त्यांनी गाईलेली ‘आई तुझी आठवण येते’ आणि ‘तू जपून टाक पाऊल जरा’ ही गाणी अजरामर झाली. नाटकांच्या प्रयोगांसाठी त्यांनी भारतयात्रा काढली आणि महाराष्ट्राबाहेरील रसिकांना आपले नाट्याविष्कार दाखवून तृप्त केले. भालचंद्र पेंढारकर यांनी केशवराव भोसले यांची ललितकलादर्श संस्था नेटाने चालविली. गायन आणि अभिनयात अत्यंत पारंगत असल्याने त्यांनी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजविला. नवी पिढी यात यायला तयार नाही, हे दुर्दैव आहे. - सुधीर पोटे (गायक)खडतर परिस्थितीत संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा पाया रचण्यात भालचंद्र पेंढारकर यांचे योगदान होते. सांस्कृतिक चळवळ सुरू करणे आणि ती नेटाने चालविण्याचे आव्हान पेंढारकर यांनी पेलल्याने ही समृद्धता अनुभवता आली. - भारती वैशंपायन (गायिका)