शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

संगीतसूर्यांची स्मृती जपणारा रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर

By admin | Updated: August 12, 2015 00:45 IST

भालचंद्र पेंढारकर यांनी केशवराव भोसले यांची ललितकलादर्श संस्था नेटाने चालविली.

कोल्हापूर : संगीत रंगभूमीवर नव्या युगाचा प्रारंभ करणारे संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श संस्थेचा वारसा ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांनी जपला. त्यांच्यामुळे केशवरावांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचे कार्य घडले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे ‘ललितकलादर्श’ ही संस्था सुरू केली. या संस्थेने अनेक नाटकांना लोकप्रियता मिळवून दिली. केशवरावांच्या मृत्यूनंतर बापूराव पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळून सत्तेचे गुलाम, कुंजविहारी, कृष्णार्जुनयुद्ध, श्री, सोन्याचा कळस, आदी नवी नाटके मराठी रंगभूमीवर आणली; पण त्यांच्या अकाली निधनानंतर‘ललितकलादर्श’ पोरकी झाली. त्याचवेळी बोलपटांमुळे संगीत नाटकांची लोकप्रियता ओसरू लागली होती, पण बापूरावांचे सुपुत्र भालचंद्र पेंढारकर यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी १९४२ साली नव्या जोमाने संस्थेचे पुनरुज्जीवन केले. सुरुवातीला त्यांनी बापूरावांची जुनी नाटकेच सादर केली; पण त्यात नावीन्य आणि नवी नाटके रंगमंचावर आणत ललितकलादर्शला ऊर्जितावस्थेत आणले. त्यांनी सादर केलेली दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, गीता गाती ज्ञानेश्वर, आदी नाटके गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातील त्यांनी गाईलेली ‘आई तुझी आठवण येते’ आणि ‘तू जपून टाक पाऊल जरा’ ही गाणी अजरामर झाली. नाटकांच्या प्रयोगांसाठी त्यांनी भारतयात्रा काढली आणि महाराष्ट्राबाहेरील रसिकांना आपले नाट्याविष्कार दाखवून तृप्त केले. भालचंद्र पेंढारकर यांनी केशवराव भोसले यांची ललितकलादर्श संस्था नेटाने चालविली. गायन आणि अभिनयात अत्यंत पारंगत असल्याने त्यांनी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजविला. नवी पिढी यात यायला तयार नाही, हे दुर्दैव आहे. - सुधीर पोटे (गायक)खडतर परिस्थितीत संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा पाया रचण्यात भालचंद्र पेंढारकर यांचे योगदान होते. सांस्कृतिक चळवळ सुरू करणे आणि ती नेटाने चालविण्याचे आव्हान पेंढारकर यांनी पेलल्याने ही समृद्धता अनुभवता आली. - भारती वैशंपायन (गायिका)