शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

‘तपोवन’वर रंगले ‘आठवणीतील खेळ ’

By admin | Updated: December 26, 2015 00:13 IST

आबालवृद्धांनी लुटला आनंद : गोट्या...विटी-दांडू... खो-खो... पळापळी... धावरिंग... गलोरी... अशा पारंपरिक खेळांची रेलचेल

कोल्हापूर : गोट्या...विटी-दांडू... खो-खो... पळापळी... धावरिंग... गलोरी... सूरपारंब्या... ढकलगाडी... टायर पळविणे... अशा पारंपरिक खेळांचा आनंद शुक्रवारी सकाळी आबालवृद्धांनी लुटला. निमित्त होत... कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘आठवणीतील शाळा’ या उपक्रमाचे.तपोवन मैदानावर आज, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता ही शाळा सुरू झाली. त्यामध्ये सहभागी झालेली मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी आपल्याला आवडते पारंपरिक खेळ खेळायला सुरुवात केली. कोण विटी-दांडू खेळतोय, तर कोण ढकलगाडीवर बसून मैदानावर फेरफटका मारतोय...तर कोणी हातात धावरिंग घेऊन गोल रिंगण घालतोय...असे खेळ खेळता लहानांसोबत ज्येष्ठही लहान झाल्याचे दिसले. दुपारपर्यंत ही शाळा सुरू होती. सोबत आणलेली शिदोरी म्हणजे जेवणाचे डबे हे एकत्रितपणे सर्वांनी खाऊन एकत्र खेळासोबत एकत्र जेवण्याचाही मनसोक्त आनंद लुटला. दुपारपर्यंत सुरू असलेल्या या शाळेत कोल्हापूरसह सांगली, कऱ्हाड, सातारा येथील चारशेहून अधिकजण सहभागी झाले होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. ही शाळा तीन दिवस सुरू राहणार असून, त्याचे संयोजन सागर वासुदेवन, सागर बकरे, सचिन जिल्हेदार यांनी केले आहे.गोट्या, सूरपारंब्या, टायर पळविणे, रस्सीखेच, रुमाल पळविणे, विटी-दांडू, भोवरा, खो-खो., ढकलगाडा, धावरिंग, आईचे पत्र हरविले, गलोरी, मातीची रास, असे अनेक पारंपरिक खेळ खेळून अबालवृद्धांनी आनंद लुटला.मोबाईलच्या जमान्यातया खेळांची गरजमोबाईल, व्हॉटस् अ‍ॅपच्या जमान्यात या पारंपरिक खेळांची गरज आहे; परंतु ‘आठवणीतील शाळा’ या उपक्रमातून या जुन्या मैदानी खेळांना एक व्यासपीठ देऊन लहान मुलांना हे खेळ खेळण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळेल. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य व चांगला असल्याच्या प्रतिक्रिया आठवणीतल्या शाळेत सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या.आज मी लहान झालो...या शाळेत खेळायला आलेले जवाहरनगर येथील ६५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक मोहन आत्माराम शिरवडेकर यांनी मनसोक्त सर्व खेळ खेळले. हातात धावरिंग घेऊन ते एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीने मैदानावर पळत होते. त्याबरोबरच विटी-दांडू, रस्सीखेच असे खेळ खेळून ते यामध्ये दोनवेळा जिंकलेही. आज माझ्या जुन्या आठवणी जाग्या होऊन या लहान मुलांमध्ये मीही लहान झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.सध्या कॉम्प्युटर, मोबाईलच्या जमान्यात मुले पारंपरिक खेळ विसरली आहेत. त्यांना या खेळांची माहिती व्हावी, तसेच या मातीतील खेळांमुळे त्यांचा या मातीशी स्पर्श होऊन ही पिढी सुदृढ होण्यासाठी ‘आठवणीतील शाळे’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. या शाळेत सर्व मुले मनसोक्त आनंद लुटत असल्याचे समाधान होत आहे.- सागर वासुदेवन(आयोजक, आठवणीतील शाळा)