शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘तपोवन’वर रंगले ‘आठवणीतील खेळ ’

By admin | Updated: December 26, 2015 00:13 IST

आबालवृद्धांनी लुटला आनंद : गोट्या...विटी-दांडू... खो-खो... पळापळी... धावरिंग... गलोरी... अशा पारंपरिक खेळांची रेलचेल

कोल्हापूर : गोट्या...विटी-दांडू... खो-खो... पळापळी... धावरिंग... गलोरी... सूरपारंब्या... ढकलगाडी... टायर पळविणे... अशा पारंपरिक खेळांचा आनंद शुक्रवारी सकाळी आबालवृद्धांनी लुटला. निमित्त होत... कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘आठवणीतील शाळा’ या उपक्रमाचे.तपोवन मैदानावर आज, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता ही शाळा सुरू झाली. त्यामध्ये सहभागी झालेली मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी आपल्याला आवडते पारंपरिक खेळ खेळायला सुरुवात केली. कोण विटी-दांडू खेळतोय, तर कोण ढकलगाडीवर बसून मैदानावर फेरफटका मारतोय...तर कोणी हातात धावरिंग घेऊन गोल रिंगण घालतोय...असे खेळ खेळता लहानांसोबत ज्येष्ठही लहान झाल्याचे दिसले. दुपारपर्यंत ही शाळा सुरू होती. सोबत आणलेली शिदोरी म्हणजे जेवणाचे डबे हे एकत्रितपणे सर्वांनी खाऊन एकत्र खेळासोबत एकत्र जेवण्याचाही मनसोक्त आनंद लुटला. दुपारपर्यंत सुरू असलेल्या या शाळेत कोल्हापूरसह सांगली, कऱ्हाड, सातारा येथील चारशेहून अधिकजण सहभागी झाले होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. ही शाळा तीन दिवस सुरू राहणार असून, त्याचे संयोजन सागर वासुदेवन, सागर बकरे, सचिन जिल्हेदार यांनी केले आहे.गोट्या, सूरपारंब्या, टायर पळविणे, रस्सीखेच, रुमाल पळविणे, विटी-दांडू, भोवरा, खो-खो., ढकलगाडा, धावरिंग, आईचे पत्र हरविले, गलोरी, मातीची रास, असे अनेक पारंपरिक खेळ खेळून अबालवृद्धांनी आनंद लुटला.मोबाईलच्या जमान्यातया खेळांची गरजमोबाईल, व्हॉटस् अ‍ॅपच्या जमान्यात या पारंपरिक खेळांची गरज आहे; परंतु ‘आठवणीतील शाळा’ या उपक्रमातून या जुन्या मैदानी खेळांना एक व्यासपीठ देऊन लहान मुलांना हे खेळ खेळण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळेल. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य व चांगला असल्याच्या प्रतिक्रिया आठवणीतल्या शाळेत सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या.आज मी लहान झालो...या शाळेत खेळायला आलेले जवाहरनगर येथील ६५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक मोहन आत्माराम शिरवडेकर यांनी मनसोक्त सर्व खेळ खेळले. हातात धावरिंग घेऊन ते एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीने मैदानावर पळत होते. त्याबरोबरच विटी-दांडू, रस्सीखेच असे खेळ खेळून ते यामध्ये दोनवेळा जिंकलेही. आज माझ्या जुन्या आठवणी जाग्या होऊन या लहान मुलांमध्ये मीही लहान झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.सध्या कॉम्प्युटर, मोबाईलच्या जमान्यात मुले पारंपरिक खेळ विसरली आहेत. त्यांना या खेळांची माहिती व्हावी, तसेच या मातीतील खेळांमुळे त्यांचा या मातीशी स्पर्श होऊन ही पिढी सुदृढ होण्यासाठी ‘आठवणीतील शाळे’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. या शाळेत सर्व मुले मनसोक्त आनंद लुटत असल्याचे समाधान होत आहे.- सागर वासुदेवन(आयोजक, आठवणीतील शाळा)