शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मेघोली तलाव फुटला, शेतकरी उद्ध्वस्त -एका महिलेचा वाहून गेल्याने मृत्यू, परिसरातील शेतीचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी /शिवाजी सावंत मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू पाटबंधारे तलाव बुधवारी (दि. १ सप्टेंबर) ला रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी /शिवाजी सावंत

मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू पाटबंधारे तलाव बुधवारी (दि. १ सप्टेंबर) ला रात्री फुटल्याने परिसरातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. रात्री धरण फुटल्यानंतर पाण्यातून एक महिला आणि अकरा जनावरे बुडाली. पाण्याचा प्रवाह वेगवान आणि मोठ्या प्रमाणात असल्याने ओढ्याच्या दोन्ही बाजूची सर्व पिके आणि माती वाहून गेली आहेत. मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ या गावांचे मोठं नुकसान झाले आहे.

सन १९९६ साली हे मातीचे धरण बांधण्यास सुरुवात झाली. तर २००० च्या दरम्यान या धरणात ९८ दशलक्ष घनफूट क्षमतेने पाणी साठवण्यात येऊ लागले. या धरणच्या बांधकामासाठी ४ कोटी ७० लाख रुपये खर्च आलेला आहे. धरणाच्या आऊटलेट जवळ पायथ्यालाच या धरणाच्या भिंतीतून सुरुवातीपासून गळती लागलेली होती. याबाबत अनेकवेळा शेतकऱ्यांनी तर गतवर्षी आमदार प्रकाश आबिटकर, माजी सभापती बाबा नांदेकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन गळतीची पाहणी करून दुरुस्तीचा प्रस्ताव नाशिक येथे पाठविण्यात आला होता. दुरुस्तीसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. या धरणावर असलेल्या रक्षकाची बदली अन्य ठिकाणी केल्याने रात्री धरण फुटल्याचे स्थानिक लोकांच्याकडून प्रशासनाला समजले.

बुधवारी रात्री धरण फुटल्याचे समजताच लोकांनी धरणस्थळाकडे धाव घेतली. अंधारात बॅटरीच्या उजेडात लोकांना पाण्याचा प्रवाह पाहून काळजात धस्स झाले. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. जवळच्या गावांना सतर्क राहण्यासाठी फोन केले जाऊ लागले.

या पाण्यातून नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते (वय ५५) या महिला वाहून गेल्या. ही महिला व पती, मुलगा, नातू आपल्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करीत होते. काही जनावरे सोडली. पाणी अचानक वाढल्याने अंधारातून पाण्याबरोबर सर्व जण वाहून गेले; परंतु पती व मुलगा नातू एका झाडाला धरून बसले व कसेबसे बाहेर आले. परंतु आपली आई वाहून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. ग्रामस्थही मदतीला धावले. त्यांचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत सापडला.

पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घरे कोसळली, मोटारसायकली वाहून गेल्या, विजेचे खांब उखडून गेले आहेत. तलावापासून शेळोलीपर्यंतच्या शेकडो एकरांवरील पिके वाया गेली आहेत. जमिनीला बांध शिल्लक राहिले नाहीत. सगळीकडे दगडगोटे पसरले आहेत. प्रशासनातील सर्व अधिकार, पदाधिकारी रात्री रात्रभर घटनास्थळी बसून होते.