जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित पूर्ण करा, या मागणीसाठी संजय घोडावत ग्रुपच्यावतीने आज, मंगळवारी अंकली नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. उद्योगपती संजय घोडावत यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांसह व्यापारी, उद्योग समूहातील घटक आंदोलनात सहभागी झाले होते. येत्या जूनपर्यंत ठेकेदार कंपनीने काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली असून, त्यानंतरही काम पूर्ण न झाल्यास शासनच काम हाती घेऊन पूर्ण करेल, असे आश्वासन बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. आर. प्रभुणे यांनी दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे एक तास झालेल्या आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अंकली नाक्यावर सकाळी पावणे अकराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. चौपदरीकरणाचे काम त्वरित पूर्ण करा, रस्त्यावरील खड्डे बनले मृत्यूचे अड्डे, शिरोली-सांगली रस्ता मरणासाठी, मग टॅक्सचा हट्ट कशासाठी, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.यावेळी संजय घोडावत म्हणाले, या रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले असून, त्यांनी रत्नागिरी, नागपूर या कामांच्या अंतर्गत कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही काम सुरू नाही. हे काम रखडल्यामुळे अपघातांची संख्या प्रचंड वाढली असून, प्रवाशांचा नाहक वेळ, श्रम आणि पैसा वाया जात आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात दहा ते बारा हजार लोकांनी सहभाग घेतला आहे. हे काम जर वेळेत पूर्ण झाले नाही, तर आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढविली जाईल. पूर्वीच्या व आताच्या सरकारने आश्वासने दिली. मात्र, त्या आश्वासनांना वाटाण्याच्या अक्षताच लावल्या आहेत. आता तरी शासनाला जाग येऊन रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. यावेळी मागण्यांचे निवेदन बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रभुणे यांना देण्यात आले. वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर येत्या जून २०१५ पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे लेखी आश्वासन प्रभुणे यांनी घोडावत यांना दिले. आंदोलनात घोडावत इन्स्टिट्युटचे ट्रस्टी विनायक भोसले, अतुल शिंदे, विनोद घोडावत, श्रेणिक घोडावत, राजेंद्र नांद्रेकर, संजय मालू, दादा पाटील-चिंचवाडकर, राजेंद्र दार्इंगडे, गजाधर मानधना, विश्वास बालिघाटे यांच्यासह विद्यार्थी, उद्योजक सहभागी झाले होते.कशासाठी आंदोलनकोल्हापूर (शिरोली)-सांगली रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, जीव मुठीत धरून प्रवास करावालागत आहे. गेल्या चार वर्षांपासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आजअखेर काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण सध्या काम अपूर्ण आहे.खराब रस्त्यांमुळे जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील वाहनधारक वर्षाला २२५ कोटींचा रोड टॅक्स भरतात. ठेकेदार कंपनीकडून सुरू असलेले काम समाधानकारक नाही.रस्ता बांधणीकडे दुर्लक्ष झाल्याने औद्योगिक विकास खुंटला आहे.कशासाठी आंदोलनकोल्हापूर (शिरोली)-सांगली रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, जीव मुठीत धरून प्रवास करावालागत आहे. गेल्या चार वर्षांपासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आजअखेर काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण सध्या काम अपूर्ण आहे.खराब रस्त्यांमुळे जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील वाहनधारक वर्षाला २२५ कोटींचा रोड टॅक्स भरतात. ठेकेदार कंपनीकडून सुरू असलेले काम समाधानकारक नाही.रस्ता बांधणीकडे दुर्लक्ष झाल्याने औद्योगिक विकास खुंटला आहे.
कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी ‘मेगा ब्लॉक’
By admin | Updated: December 16, 2014 23:59 IST