शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांसमवेत २०ला खासदारांची बैठक

By admin | Updated: November 18, 2014 01:03 IST

राजू शेट्टी : राज्याच्या प्रश्नांची होणार चर्चा ; सह्याद्री अतिथीगृहात आयोजन

कोल्हापूर : राज्यातील केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी राज्यभरातील खासदारांची येत्या गुरुवारी (दि.२०) सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली.राज्यात नव्याने मंत्रिमंडळ सत्तारूढ झाले की नवे मुख्यमंत्री खासदारांशी चर्चा करतात हा रिवाज आहे. त्यानुसार ही बैठक होत आहे. राज्यभरातील अनेक प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित आहे. ते जसे एखाद्या जिल्ह्यापुरते मर्यादित आहेत तसेच ते राज्याशीही संबंधित आहेत. अशा सगळ््या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य म्हणून एकत्रित प्रयत्न झाल्यास प्रश्नाची सोडवणूक होण्यास त्याची नक्कीच मदत होऊ शकते, असे कोणते प्रश्न आहेत हे समजून घेतानाच प्रत्येक खासदाराशी संवाद साधता यावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे.शेट्टी यांच्याकडून ‘पेरिड’ दत्तकखासदार शेट्टी यांनी शाहूवाडी तालुक्यातील पेरिड हे गाव विकासासाठी दत्तक घेतले आहे. त्याअंतर्गत उद्या (मंगळवारी) इंद्रजित देशमुख यांचे प्रबोधनपर व्याख्यान गावात आयोजित केले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर मलकापूर पासून दीड किलोमीटरवर हे सुमारे अडीच हजार लोकवस्तीचे गाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील एक गाव घेवून ते आदर्श करून दाखवावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार शेट्टी यांनी हे गाव निवडले आहे. शाहूवाडी मतदारसंघांने शेट्टी यांना दोन्ही लोकसभा निवडणुकीत भक्कम पाठबळ दिले. त्यामुळे त्याच तालुक्यातील गावाचा विकास करायचा असे त्यांनी ठरविले होते.शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार राऊ धोंडी पाटील यांचे हे गाव. या गावाचे वैशिष्ट्य असे की कोणत्याच संस्थेची या गावात कधीच निवडणूक झालेली नाही. तसे राजकीयदृष्ट्या धगधगते असूनही गावांतील लोक निवडणूक न घेण्याचा शहाणपणा अगोदरच दाखवत आले असल्याने गाव ‘आदर्श’ करण्यातही ते पुढाकार घेतील, असा विश्वास शेट्टी यांना आहे. पोलीस व लष्करामध्येही या गावातील जवान मोठ्या प्रमाणावर आहेत.राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी यापूर्वीच चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द या गावाची निवड केली आहे. (प्रतिनिधी)