शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

खर्चीवाल्यांच्या मजुरीवाढीची बैठक निष्फळ

By admin | Updated: February 16, 2016 00:01 IST

प्रांताधिकारी पुन्हा बैठक बोलविणार : यंत्रमागधारक-व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक; वादावादीमुळे तणाव

इचलकरंजी : खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसाठी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत सुमारे दोन तास चर्चा झाली. मात्र, व्यापारी असोसिएशनने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीत यंत्रमागधारक व व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडून काहीवेळ तणाव निर्माण झाला. अखेर याप्रकरणी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी पुन्हा बैठक आयोजित केल्यानंतर याबाबत तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले.सन २०१३ पासून खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये वाढ झालेली नाही. या काळात कामगारांच्या मजुरीमध्ये १८ पैसे प्रति मीटर वाढ झाली असून, यंत्रमाग उद्योगातील कांडीवाला, जॉबर, वहिफणी अशा अन्य कामगारांच्या पगारामध्ये सुद्धा सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. तर विजेची बिले ३० टक्क्यांनी वाढली आहेत. त्याचबरोबर महागाईसुद्धा वाढत जात आहे. म्हणून सध्या खर्चीवाले यंत्रमागधारकांनी प्रतिमीटर मिळणारी साडे पाच पैसे मजुरी नऊ पैसे मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे, अशी भूमिका इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी मांडली. तसेच २ जानेवारीपासून इचलकरंजी क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंटस् असोसिएशनला वारंवार पत्रे देऊन सुद्धा त्यावर कोणताही विचार झालेला नाही. अखेर आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या खर्चीवाले यंत्रमागधारकाला प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा लागला. तरी व्यापाऱ्यांनी आपली नकारार्थी भूमिका सोडून दोन पावले पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले.याबाबत बोलताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांनी, सन २०१३ मध्ये ठरल्याप्रमाणे ज्या-ज्यावेळी यंत्रमाग कामगारांची मजुरी वाढली, त्या-त्यावेळी संबंधित खर्चीवाले यंत्रमागधारकांना कापड व्यापाऱ्यांनी मजुरीत वाढ केली आहे, असे सांगून ते म्हणाले, व्यापारी व कारखानदार यांच्यामध्ये त्यांच्या स्तरावर सामंजस्याने मजुरीवाढ झाली असून, त्यामध्ये व्यापारी असोसिएशन कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही.गांधी यांच्या या विधानाला बैठकीतील अनेक यंत्रमाग प्रतिनिधींनी विरोध केला. आतापर्यंतच्या गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार व्यापारी संघटनेने पुढाकार घेऊन खर्चीवाले कारखानदारांना मजुरीवाढ दिली आहे. त्याप्रमाणे आतासुद्धा द्यावी, असे यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे पडले. यावर बोलताना व्यापारी असोसिएशनचे घनश्याम इनानी म्हणाले, कापड उद्योगात मंदी आहे. त्यामुळे कापड व्यापारी आता आणखीन मजुरीवाढ देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांची मन:स्थिती तयार करून पुन्हा त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी या बैठकीला यावे लागेल. त्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी द्यावा.चर्चेमध्ये विनोद कांकाणी, नारायण दुरूगडे, जीवन बर्गे, धर्मराज जाधव, आदींनी भाग घेतला. मात्र, यामध्ये तोडगा निघत नसल्यामुळे आणि वारंवार वादाचे प्रसंग होत असल्याने प्रांताधिकारी जिरंगे यांनी हस्तक्षेप केला. बैठक आठवडाभरातच बोलवली जाईल. दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी यावे, असे निर्देश प्रांताधिकारी जिरंगे यांनी दिले. (प्रतिनिधी)फक्त मजुरीवाढीवेळीचअसोसिएशनची आठवणइचलकरंजीमध्ये कापड व्यापाऱ्यांबरोबरच कापड उत्पादन करणाऱ्या (सटवाले) कारखानदारांकडून ४० हजार यंत्रमागांवर बिमे दिली जातात. त्यांनाही या बैठकीला बोलावून मजुरीवाढीचा तोडगा काढावा, अशी सूचना व्यापारी असोसिएशनचे इनानी यांनी केली. तसेच यंत्रमाग उद्योगाबाबत यापूर्वी सरकार स्तरावर किंवा अन्य काही कारणांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवेळी होणाऱ्या संघर्षासाठी व्यापारी असोसिएशनला बोलविले जात नाही. फक्त खर्चीवाले मजुरीवाढीवेळीच व्यापारी असोसिएशनची आठवण येते, असेही ते म्हणाले.मजुरीवाढीसाठी व्यापाऱ्यांनीपुढाकार घ्यावा : आवाडेखर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीमध्ये तीन वर्षांत वाढ झाली नसली तरी या कालावधीत कामगारांना झालेली मजुरीवाढ, वीज बिले व अन्य घटकांच्या मजुरीतील वाढ, तसेच महागाईचा विचार करता व्यापारी संघटनेने खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ दिली पाहिजे, असे मत या बैठकीत आलेल्या माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले. कामगार, यंत्रमागधारक व व्यापारी अशा तिन्हीही घटकांमुळे वस्त्रनगरीचा विकास झालाय. पारंपरिक सामंजस्य कायम ठेवून व्यापाऱ्यांनी आता पुढाकार घेतला पाहिजे, असेही आवाडे यांनी सूचित केले.