शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

सतेज पाटील यांची मातब्बरांवर मात

By admin | Updated: December 10, 2015 01:28 IST

उमेदवारीची चढाओढ : आता विजयासाठी कस लागणार; महाडिकांचे तगडे आव्हान

कोल्हापूर : कोल्हापूर विधानपरिषदेची काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे या मातब्बर नेत्यांवर मात करीत उमेदवारी खेचून घेण्यात यश मिळविले. कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचे यश त्यांना याकामी उपयोगी पडले. काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याची पहिली लढाई तर ते जिंकले आहेतच. आता त्यांना विजयासाठी मोर्चेबांधणी करावी लागणार आहे; कारण आमदार महाडिक यांनाच त्यांनी आव्हान दिले असून, ते त्यांना सहजासहजी विजय मिळवू देणार नाहीत. या जागेवर गेली अठरा वर्षे आमदार महादेवराव महाडिक हे कॉँग्रेसकडून प्रतिनिधित्व करतात; परंतु राजकारणात महाडिक हे तसे सर्वपक्षीय कुटुंब झाले आहे. तरीही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर हक्क सांगितला होता. त्यामुळे या वेळेला राजकीय परिस्थिती आणि नेतेही त्यांच्या विरोधात होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे यांनी सतेज पाटील यांच्या बाजूने ताकद लावलीच; शिवाय ज्येष्ठ नेते पतंगराव कदम हे तर महाडिक यांना उमेदवारी देण्याच्या ठामपणे विरोधात होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेदेखील खासगीत महाडिक यांच्या विरोधात बोलत होते. कारण या सर्वांना महापालिका निवडणुकीतील महाडिक यांची भूमिका माहीत होती. एवढे करूनही जर महाडिक यांनाच उमेदवारी दिली तर काँग्रेसमध्ये काहीही चालते, असा संदेश कार्यकर्त्यांपासून समाजापर्यंत गेला असता; म्हणून महाडिक यांचा पत्ता कट झाला. त्यांचा पत्ता कट झाल्यावर सतेज यांच्या उमेदवारीचा मार्ग लगेच मोकळा व्हायला हवा होता; परंतु तरीही त्याला शेवटच्या दिवसापर्यंत जो विलंब झाला, त्यामागे पी. एन. पाटील यांनी केलेला आग्रह कारणीभूत ठरला. त्यात पी. एन., महाडिक व प्रकाश आवाडे यांनी आपण तिघे एका बाजूला असल्याचे चित्र तयार केल्यावर प्रदेशाध्यक्षांपुढेही पेच तयार झाला. सतेज यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे; परंतु काँग्रेसमधूनच त्यांना इतका विरोध होत असताना त्यांना कशी उमेदवारी द्यायची, असाही विचार एका टप्प्यावर झाला. त्यातूनच पी. एन. पाटील यांचे नाव चर्चेत आले; परंतु त्यांना उमेदवारी दिल्यास महाडिक गप्प बसणार नाहीत आणि राष्ट्रवादी मदत करणार नाही, हे पक्षश्रेष्ठीपर्यंत गेले होते. आवाडेंचा आग्रह असला तरी ते स्पर्धेत नव्हते.