शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शेतकऱ्यांच्या विधेयकांसाठी राष्ट्रपतींना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:00 IST

जयसिंगपूर : लोकसभेत आणि राज्यसभेत शेतकºयांची दोन खासगी विधेयके मांडण्यात येणार असून, याप्रश्नी राष्ट्रपतींना भेटण्याचा निर्णय घेत अंतिम मसुद्याला बुधवारी दिल्ली येथे विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नवी दिल्ली येथे आॅल इंडिया किसान संघर्ष को-आॅर्डिनेशन समिती या देशातील १९३ शेतकरी संघटनांच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक ...

जयसिंगपूर : लोकसभेत आणि राज्यसभेत शेतकºयांची दोन खासगी विधेयके मांडण्यात येणार असून, याप्रश्नी राष्ट्रपतींना भेटण्याचा निर्णय घेत अंतिम मसुद्याला बुधवारी दिल्ली येथे विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नवी दिल्ली येथे आॅल इंडिया किसान संघर्ष को-आॅर्डिनेशन समिती या देशातील १९३ शेतकरी संघटनांच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यावतीने आमंत्रित बैठकीस देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार उपस्थित होते. यावेळी पवार यांनी मार्गदर्शन करत विधेयकाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. बैठकीत शेतकºयांच्या प्रश्नावर संपूर्ण देशभर आवाज उठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच १० मे रोजी १८५७ च्या बंडाला १६१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिनाचं औचित्य साधून देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांच्या प्रश्नांवर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने शेतकºयांना कर्जमुक्ती व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव यासाठी गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे. शेतकºयांचा सातबारा कर्जातून कोरा करण्यात यावा तसेच स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालास उत्पादन खर्चाच्या आधारावर खर्च अधिक किमान पन्नास टक्के अधिक दर मिळावा या प्रमुख मागणीकरिता संसदेमध्ये मांडण्यात येणाºया खासगी सदस्य विधेयकाच्या मसुद्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. देशभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या विधेयकाच्या मंजुरीसाठी ठराव करण्याचा निर्णय झाला, तसेच या सर्व ठरावाच्या प्रती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष यांना पाठविण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. बैठकीस खा. शरद यादव, खा. अरविंद सावंत, जयप्रकाश यादव, खा. नरेंद्र कुमार, खा. दिनेश त्रिवेदी, कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष टी. हक, दीपेंद्रसिंग हुडा, जयंत चौधरी, आशुतोष गुप्ता, हानन मौला, व्ही. विजय साई रेड्डी, तसेच सुकाणू समितीतर्फे निमंत्रक व्ही. एम. सिंग, किरण व्ही., कविता के., आदी उपस्थित होते.भाजपला शेतकरीच उत्तर देतील : राजू शेट्टीभाजपने सत्तेमध्ये येताना शेतकºयांना जी आश्वासने दिलेली होती, ती अद्याप पाळलेली नाहीत. शेतकºयांना दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती यासाठी त्यांना सत्तेत बसविले आहे. तो शब्द त्यांनी पाळावा, शेतकºयांची ही दोन विधेयके आहेत, त्यास त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा, अन्यथा हेच शेतकरी भाजपला सत्तेतून पायउतार करतील, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.