शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Maharashtra Election 2019: ना वलय, ना राजकीय वारसा; 'मी पण अण्णा'ने दिला दिग्गजांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 17:28 IST

Maharashtra Assembly Election 2019या काळात सर्वच कार्यकर्त्यांनी कुटुंबाची पर्वा केली नाही. केवळ विजय मिळवायचा, याच ध्यासाने ‘मीपण अण्णा’ असे समजून ते काम करीत राहिले.

ठळक मुद्दे प्रमुख कार्यकर्ते रात्री १२ वाजल्यानंतर एकत्र जमायचे.

कोल्हापूर : कॉँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली, एबी फॉर्म हातात पडला आणि चंद्रकांत जाधव यांच्या समर्थकांनी प्रचाराला मिळणारा कमी कालावधी लक्षात घेता, रात्रीचा दिवस करावा लागणार, याची पक्की खूणगाठ बांधून स्वत:ला प्रचारकार्यात वाहून घेतले. ‘मीपण अण्णा’ ही टॅगलाईन जोडून जाधवांचे अष्टप्रधान मंडळ जोरात कामाला लागले आणि विजय पदरात पाडूनच घरी परतले. विजय सहजसोपा नव्हता; तरीही सर्वांनी कमी वेळेत केलेल्या चांगल्या कामाचे फळ चंद्रकांत जाधव यांना आमदारकीच्या रूपाने मिळाले.

फारसं राजकीय वलय नाही, राजकीय वारसाही नाही, अशा परिस्थितीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक कशी जिंकायची, याचा एक आदर्श चंद्रकांत जाधव यांनी घालून दिला. जसे जाधवांची महत्त्वाकांक्षा विजयासाठी कारणीभूत आहे, तसेच कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रमदेखील कारणीभूत आहेत.

जाधवांची यंत्रणा त्यांना ३ आॅक्टोबरला कॉँग्रेसची उमेदवारी मिळताच कामाला लागली. एक हजाराहून अधिक सक्रिय कार्यकर्त्यांचे जाळे त्यांच्यासाठी काम करीत होते. प्रचारात कुठेही कमतरता, उणिवा राहू नयेत म्हणून आठ पथके त्यांनी निर्माण केली. आशिष पोवार, अजित पोवार, प्रमोद बोंडगे, देवेंद्र रेडेकर, वासीम, अनिकेत सावंत, युवराज कुरणे, नरेंद्र वायचळ असे आठ प्रमुख कार्यकर्ते अष्टप्रधान मंडळात होते. त्यांच्याकडे एकेका पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली.

चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, विद्यमान अध्यक्ष संजय शेटे, विज्ञान मुंडे, रमेश पुरेकर, श्रीकांत माने, संभाजी पोवार, शिवाजीराव पोवार, युवराज उलपे, उदय दुधाणे,राजू साठे, दीपक चोरगे, योगेश कुलकर्णी, संदीप पाटील, अमित हुक्केरीकर अशी मंडळी थिंक टॅँक म्हणून काम करीत होती. १३ दिवसांच्या प्रचाराचे नियोजन यांसह अन्य अनेक जोडण्या लावण्यात हा थिंक टॅँक काम करीत होता.

दिवसभराचा प्रचार संपल्यानंतर प्रमुख कार्यकर्ते रात्री १२ वाजल्यानंतर एकत्र जमायचे. दिवसभराचा आढावा आणि उद्याचे नियोजन यांवर चर्चा करायचे आणि सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा कामाला लागायचे. या काळात सर्वच कार्यकर्त्यांनी कुटुंबाची पर्वा केली नाही. केवळ विजय मिळवायचा, याच ध्यासाने ‘मीपण अण्णा’ असे समजून ते काम करीत राहिले.प्रचाराकरिता मिळालेला कमी कालावधी आमच्यासमोर एक आव्हान होते; परंतु कोणतीही गोष्ट नियोजनपूर्वक केली की सोपी जाते, यावर आमचा विश्वास होता. म्हणून आम्ही नियोजन आणि वेळेचे महत्त्व ओळखून प्रचार केला.- आनंद माने, माजी अध्यक्षचेंबर आॅफ कॉमर्स---------------------- भारत

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूर