शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

धर्मवादाच्या झुंडशाहीपुढे प्रसारमाध्यमे हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:47 IST

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने मूल्य आणि संविधानाधिष्ठित प्रसारमाध्यमांना धुडकावून लावत सोशल मीडियाची डिजिटल डेमोक्रसी अवलंबिली आहे. पत्रकारांची जागा आता प्रचारकांनी घेतली असून, ही टोळी मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी धर्मवादाची झुंडशाही पसरविते आणि हिंसाचार घडवून आणते. या आघातापुढे प्रसारमाध्यमे हतबल झाली आहेत. आता देश वाचविण्यासाठी सगळ्यांनी ...

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने मूल्य आणि संविधानाधिष्ठित प्रसारमाध्यमांना धुडकावून लावत सोशल मीडियाची डिजिटल डेमोक्रसी अवलंबिली आहे. पत्रकारांची जागा आता प्रचारकांनी घेतली असून, ही टोळी मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी धर्मवादाची झुंडशाही पसरविते आणि हिंसाचार घडवून आणते. या आघातापुढे प्रसारमाध्यमे हतबल झाली आहेत. आता देश वाचविण्यासाठी सगळ्यांनी सावध व्हायची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी रविवारी व्यक्त केले.शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत त्यांनी ‘बदलती प्रसारमाध्यमे आणि जातीय हिंसाचार’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रकाश पवार होते. व्यासपीठावर ट्रस्टचे विश्वस्त प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, प्रा. शिवाजी जाधव उपस्थित होते.डोळे म्हणाले, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रवादाचा जेव्हा उन्माद होतो तेव्हा तो उत्पात घडवून आणतो. सध्या देशात हेच सुरू आहे; कारण सत्ताधाऱ्यांना हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे, राज्यघटना बदलायची आहे. त्यासाठी नागरिकांना चिथावणी देऊन झुंडीने हिंसा करण्यासाठी उद्युक्त केले जाते. अर्धसत्य बातम्या पसरविल्या जातात. वर्तमानपत्रे सत्य, पुरावा, घटना आणि लोकशाहीच्या मूल्यांचा आधार घेऊन बातम्या प्रसिद्ध करतात. ती ‘हाणा, मारा, तोडा, जाळा आणि फोडा’चे राजकारण करू शकत नाहीत; पण फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल मीडियाला आधारच नसल्याने हे सहजगत्या केले जाते.ते म्हणाले, आज देशातील शेतकरी, उद्योग-व्यापार, बेरोजगार, शिक्षण, महिला, आदिवासी या सगळ्याच घटकांमध्ये नाराजी आहे. त्यांना मूळ प्रश्नापासून विचलित करण्यासाठी हिंसाचाराचा कट रचला जातो. गरीबच गरिबांविरोधात लढताहेत. उजव्या विचारसरणीची सत्ता येत आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. हा देश स्वातंत्र्य चळवळीतील मूल्ये आणि विचारांतून उभारला आहे. तो त्यांना मोडीत काढायचा आहे. हे लोकशाहीवरील मोठे संकट असून प्रत्येकाने सावध झाले पाहिजे. प्रा. प्रकाश पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला.ट्रम्प आणि मोदी सख्खे भाऊडोळे म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी हे प्रस्थापित प्रसारमाध्यमांना धुडकावून लावण्यात एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांचे निर्णय ते वर्तमानपत्रांना सांगत नाहीत, तर फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसिद्ध करतात. गेल्या चार वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. दुसरीकडे, त्यांचे सगळे मंत्री फक्त टिष्ट्वटरवरच काम करताना दिसतात; कारण मोदी त्यांना प्रत्यक्षात काही करूच देत नाहीत.