शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

धर्मवादाच्या झुंडशाहीपुढे प्रसारमाध्यमे हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:47 IST

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने मूल्य आणि संविधानाधिष्ठित प्रसारमाध्यमांना धुडकावून लावत सोशल मीडियाची डिजिटल डेमोक्रसी अवलंबिली आहे. पत्रकारांची जागा आता प्रचारकांनी घेतली असून, ही टोळी मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी धर्मवादाची झुंडशाही पसरविते आणि हिंसाचार घडवून आणते. या आघातापुढे प्रसारमाध्यमे हतबल झाली आहेत. आता देश वाचविण्यासाठी सगळ्यांनी ...

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने मूल्य आणि संविधानाधिष्ठित प्रसारमाध्यमांना धुडकावून लावत सोशल मीडियाची डिजिटल डेमोक्रसी अवलंबिली आहे. पत्रकारांची जागा आता प्रचारकांनी घेतली असून, ही टोळी मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी धर्मवादाची झुंडशाही पसरविते आणि हिंसाचार घडवून आणते. या आघातापुढे प्रसारमाध्यमे हतबल झाली आहेत. आता देश वाचविण्यासाठी सगळ्यांनी सावध व्हायची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी रविवारी व्यक्त केले.शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत त्यांनी ‘बदलती प्रसारमाध्यमे आणि जातीय हिंसाचार’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रकाश पवार होते. व्यासपीठावर ट्रस्टचे विश्वस्त प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, प्रा. शिवाजी जाधव उपस्थित होते.डोळे म्हणाले, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रवादाचा जेव्हा उन्माद होतो तेव्हा तो उत्पात घडवून आणतो. सध्या देशात हेच सुरू आहे; कारण सत्ताधाऱ्यांना हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे, राज्यघटना बदलायची आहे. त्यासाठी नागरिकांना चिथावणी देऊन झुंडीने हिंसा करण्यासाठी उद्युक्त केले जाते. अर्धसत्य बातम्या पसरविल्या जातात. वर्तमानपत्रे सत्य, पुरावा, घटना आणि लोकशाहीच्या मूल्यांचा आधार घेऊन बातम्या प्रसिद्ध करतात. ती ‘हाणा, मारा, तोडा, जाळा आणि फोडा’चे राजकारण करू शकत नाहीत; पण फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल मीडियाला आधारच नसल्याने हे सहजगत्या केले जाते.ते म्हणाले, आज देशातील शेतकरी, उद्योग-व्यापार, बेरोजगार, शिक्षण, महिला, आदिवासी या सगळ्याच घटकांमध्ये नाराजी आहे. त्यांना मूळ प्रश्नापासून विचलित करण्यासाठी हिंसाचाराचा कट रचला जातो. गरीबच गरिबांविरोधात लढताहेत. उजव्या विचारसरणीची सत्ता येत आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. हा देश स्वातंत्र्य चळवळीतील मूल्ये आणि विचारांतून उभारला आहे. तो त्यांना मोडीत काढायचा आहे. हे लोकशाहीवरील मोठे संकट असून प्रत्येकाने सावध झाले पाहिजे. प्रा. प्रकाश पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला.ट्रम्प आणि मोदी सख्खे भाऊडोळे म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी हे प्रस्थापित प्रसारमाध्यमांना धुडकावून लावण्यात एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांचे निर्णय ते वर्तमानपत्रांना सांगत नाहीत, तर फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसिद्ध करतात. गेल्या चार वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. दुसरीकडे, त्यांचे सगळे मंत्री फक्त टिष्ट्वटरवरच काम करताना दिसतात; कारण मोदी त्यांना प्रत्यक्षात काही करूच देत नाहीत.