शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना रोखले इचलकरंजीत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: June 5, 2014 01:30 IST

विरोधात ठिय्या आंदोलन; पालिकेसमोर तणावाचे वातावरण

इचलकरंजी : आठवड्याभरापासून नळाला पाणी नसल्यामुळे पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांनी, भाजपचे पदाधिकारी व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह नगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. नळाला पाणी येणार नाही, तोपर्यंत पदाधिकार्‍यांना पालिकेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा पवित्रा घेत सुमारे तासभर झालेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी नियोजनबद्धरीत्या शहरात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आणि ठिय्या आंदोलन संपुष्टात आले. शहरास पाण्याचा पुरवठा करणार्‍या कृष्णा नळयोजनेची दाबनलिका बदलण्याचे काम गेले पाच-सहा दिवस सुरू आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दाबनलिका बदलण्याचे काम काल, मंगळवारी रात्री पूर्ण झाले होते. दाबनलिकेच्या जोडाची चाचणी घेण्यासाठी कृष्णा योजनेवरील ४५० अश्वशक्तीचा पंप सुरू झाला; पण अवघ्या पंधरा मिनिटांत जोडाच्या ठिकाणी मोठे छिद्र पडले आणि गळती सुरू झाली. नलिका फुटलेल्या ठिकाणी मोठा खड्डा पडून त्यातून जोरदारपणे बाहेर पडलेल्या पाण्याने शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतातील सोयाबीनचे पीक वाहून गेले, तर रस्त्यालगतच्या सुमारे पंधरा घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शहरास होणारा पाणीपुरवठा पुन्हा खंडित झाला. आठवडाभरापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. आज, बुधवारी सकाळी भाजपचे शिष्टमंडळ शहर अध्यक्ष विलास रानडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली नायकवडे, धोंडिराम जावळे, अनिल डाळ्या, डॉ. अनघा कुलकर्णी, विनोद कांकाणी, सारिका भोकरे, बाबा नलगे, नगरसेविका आक्काताई कोटगी, संतोष शेळके यांच्यासह पालिकेच्या दारात आले, सोबत नागरिकही होते. त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर पाऊण तास ठिय्या मारला. नगरपालिकेमध्ये कोणासही प्रवेश दिला नाही. नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, जलअभियंता सुभाष देशपांडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे आंदोलनस्थळी आले. त्यांनी, कृष्णा जलवाहिनीवरील दाबनलिका बदलाचे सुरू असलेले काम व नलिका जोडल्यानंतर झालेल्या गळतीबाबतची स्थिती आंदोलकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला; पण आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर शहरात पाणीटंचाई आहे, तेथे प्राधान्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. तसेच कृष्णा व पंचगंगा या दोन्ही योजनांमार्फत त्वरित पाणीपुरवठा सुरू करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे नगराध्यक्षा मुजावर व अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी सांगितले आणि आंदोलन संपुष्टात आले. (प्रतिनिधी)