शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना रोखले इचलकरंजीत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: June 5, 2014 01:30 IST

विरोधात ठिय्या आंदोलन; पालिकेसमोर तणावाचे वातावरण

इचलकरंजी : आठवड्याभरापासून नळाला पाणी नसल्यामुळे पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांनी, भाजपचे पदाधिकारी व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह नगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. नळाला पाणी येणार नाही, तोपर्यंत पदाधिकार्‍यांना पालिकेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा पवित्रा घेत सुमारे तासभर झालेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी नियोजनबद्धरीत्या शहरात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आणि ठिय्या आंदोलन संपुष्टात आले. शहरास पाण्याचा पुरवठा करणार्‍या कृष्णा नळयोजनेची दाबनलिका बदलण्याचे काम गेले पाच-सहा दिवस सुरू आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दाबनलिका बदलण्याचे काम काल, मंगळवारी रात्री पूर्ण झाले होते. दाबनलिकेच्या जोडाची चाचणी घेण्यासाठी कृष्णा योजनेवरील ४५० अश्वशक्तीचा पंप सुरू झाला; पण अवघ्या पंधरा मिनिटांत जोडाच्या ठिकाणी मोठे छिद्र पडले आणि गळती सुरू झाली. नलिका फुटलेल्या ठिकाणी मोठा खड्डा पडून त्यातून जोरदारपणे बाहेर पडलेल्या पाण्याने शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतातील सोयाबीनचे पीक वाहून गेले, तर रस्त्यालगतच्या सुमारे पंधरा घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शहरास होणारा पाणीपुरवठा पुन्हा खंडित झाला. आठवडाभरापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. आज, बुधवारी सकाळी भाजपचे शिष्टमंडळ शहर अध्यक्ष विलास रानडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली नायकवडे, धोंडिराम जावळे, अनिल डाळ्या, डॉ. अनघा कुलकर्णी, विनोद कांकाणी, सारिका भोकरे, बाबा नलगे, नगरसेविका आक्काताई कोटगी, संतोष शेळके यांच्यासह पालिकेच्या दारात आले, सोबत नागरिकही होते. त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर पाऊण तास ठिय्या मारला. नगरपालिकेमध्ये कोणासही प्रवेश दिला नाही. नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, जलअभियंता सुभाष देशपांडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे आंदोलनस्थळी आले. त्यांनी, कृष्णा जलवाहिनीवरील दाबनलिका बदलाचे सुरू असलेले काम व नलिका जोडल्यानंतर झालेल्या गळतीबाबतची स्थिती आंदोलकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला; पण आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर शहरात पाणीटंचाई आहे, तेथे प्राधान्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. तसेच कृष्णा व पंचगंगा या दोन्ही योजनांमार्फत त्वरित पाणीपुरवठा सुरू करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे नगराध्यक्षा मुजावर व अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी सांगितले आणि आंदोलन संपुष्टात आले. (प्रतिनिधी)