शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना रोखले इचलकरंजीत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: June 5, 2014 01:30 IST

विरोधात ठिय्या आंदोलन; पालिकेसमोर तणावाचे वातावरण

इचलकरंजी : आठवड्याभरापासून नळाला पाणी नसल्यामुळे पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांनी, भाजपचे पदाधिकारी व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह नगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. नळाला पाणी येणार नाही, तोपर्यंत पदाधिकार्‍यांना पालिकेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा पवित्रा घेत सुमारे तासभर झालेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी नियोजनबद्धरीत्या शहरात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आणि ठिय्या आंदोलन संपुष्टात आले. शहरास पाण्याचा पुरवठा करणार्‍या कृष्णा नळयोजनेची दाबनलिका बदलण्याचे काम गेले पाच-सहा दिवस सुरू आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दाबनलिका बदलण्याचे काम काल, मंगळवारी रात्री पूर्ण झाले होते. दाबनलिकेच्या जोडाची चाचणी घेण्यासाठी कृष्णा योजनेवरील ४५० अश्वशक्तीचा पंप सुरू झाला; पण अवघ्या पंधरा मिनिटांत जोडाच्या ठिकाणी मोठे छिद्र पडले आणि गळती सुरू झाली. नलिका फुटलेल्या ठिकाणी मोठा खड्डा पडून त्यातून जोरदारपणे बाहेर पडलेल्या पाण्याने शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतातील सोयाबीनचे पीक वाहून गेले, तर रस्त्यालगतच्या सुमारे पंधरा घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शहरास होणारा पाणीपुरवठा पुन्हा खंडित झाला. आठवडाभरापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. आज, बुधवारी सकाळी भाजपचे शिष्टमंडळ शहर अध्यक्ष विलास रानडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली नायकवडे, धोंडिराम जावळे, अनिल डाळ्या, डॉ. अनघा कुलकर्णी, विनोद कांकाणी, सारिका भोकरे, बाबा नलगे, नगरसेविका आक्काताई कोटगी, संतोष शेळके यांच्यासह पालिकेच्या दारात आले, सोबत नागरिकही होते. त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर पाऊण तास ठिय्या मारला. नगरपालिकेमध्ये कोणासही प्रवेश दिला नाही. नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, जलअभियंता सुभाष देशपांडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे आंदोलनस्थळी आले. त्यांनी, कृष्णा जलवाहिनीवरील दाबनलिका बदलाचे सुरू असलेले काम व नलिका जोडल्यानंतर झालेल्या गळतीबाबतची स्थिती आंदोलकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला; पण आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर शहरात पाणीटंचाई आहे, तेथे प्राधान्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. तसेच कृष्णा व पंचगंगा या दोन्ही योजनांमार्फत त्वरित पाणीपुरवठा सुरू करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे नगराध्यक्षा मुजावर व अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी सांगितले आणि आंदोलन संपुष्टात आले. (प्रतिनिधी)