शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना रोखले इचलकरंजीत तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: June 5, 2014 01:30 IST

विरोधात ठिय्या आंदोलन; पालिकेसमोर तणावाचे वातावरण

इचलकरंजी : आठवड्याभरापासून नळाला पाणी नसल्यामुळे पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांनी, भाजपचे पदाधिकारी व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह नगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. नळाला पाणी येणार नाही, तोपर्यंत पदाधिकार्‍यांना पालिकेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा पवित्रा घेत सुमारे तासभर झालेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी नियोजनबद्धरीत्या शहरात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आणि ठिय्या आंदोलन संपुष्टात आले. शहरास पाण्याचा पुरवठा करणार्‍या कृष्णा नळयोजनेची दाबनलिका बदलण्याचे काम गेले पाच-सहा दिवस सुरू आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दाबनलिका बदलण्याचे काम काल, मंगळवारी रात्री पूर्ण झाले होते. दाबनलिकेच्या जोडाची चाचणी घेण्यासाठी कृष्णा योजनेवरील ४५० अश्वशक्तीचा पंप सुरू झाला; पण अवघ्या पंधरा मिनिटांत जोडाच्या ठिकाणी मोठे छिद्र पडले आणि गळती सुरू झाली. नलिका फुटलेल्या ठिकाणी मोठा खड्डा पडून त्यातून जोरदारपणे बाहेर पडलेल्या पाण्याने शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतातील सोयाबीनचे पीक वाहून गेले, तर रस्त्यालगतच्या सुमारे पंधरा घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शहरास होणारा पाणीपुरवठा पुन्हा खंडित झाला. आठवडाभरापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. आज, बुधवारी सकाळी भाजपचे शिष्टमंडळ शहर अध्यक्ष विलास रानडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली नायकवडे, धोंडिराम जावळे, अनिल डाळ्या, डॉ. अनघा कुलकर्णी, विनोद कांकाणी, सारिका भोकरे, बाबा नलगे, नगरसेविका आक्काताई कोटगी, संतोष शेळके यांच्यासह पालिकेच्या दारात आले, सोबत नागरिकही होते. त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर पाऊण तास ठिय्या मारला. नगरपालिकेमध्ये कोणासही प्रवेश दिला नाही. नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, जलअभियंता सुभाष देशपांडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे आंदोलनस्थळी आले. त्यांनी, कृष्णा जलवाहिनीवरील दाबनलिका बदलाचे सुरू असलेले काम व नलिका जोडल्यानंतर झालेल्या गळतीबाबतची स्थिती आंदोलकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला; पण आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर शहरात पाणीटंचाई आहे, तेथे प्राधान्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. तसेच कृष्णा व पंचगंगा या दोन्ही योजनांमार्फत त्वरित पाणीपुरवठा सुरू करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे नगराध्यक्षा मुजावर व अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी सांगितले आणि आंदोलन संपुष्टात आले. (प्रतिनिधी)