शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर्गत आघाड्यांमध्येच सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या, बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे गावगाड्यातील राजकीय हालचाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या, बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे गावगाड्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. पक्षीय पातळीवर निवडणुका न लढता पक्षांतर्गत आघाड्यामध्येच सामना पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे आघाड्यांसाठी जोडण्यांना वेग आला असून, अनेक गावात भाऊबंदकी उफाळून येणार, हे निश्चित आहे.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींसाठी उद्यापासून रणधुमाळी सुरू होत आहे. मर्यादित मतदान, त्यात नात्यागोत्यातील लढतीने ग्रामपंचायत निवडणुकीत अधिक ईर्ष्या निर्माण होते. प्रभाग निश्चितीपासूनच गावपातळीवरील राजकारण सुरू होऊन प्रभाग आरक्षणानंतर त्यास गती येते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असल्याने गावगाड्यातील राजकारणाला चांगलीच उखळी फुटली आहे. एरव्ही पक्षावर निष्ठा ठेवून नेत्यांसाठी एकदिलाने काम करणारे स्थानिक गट ग्रामपंचात निवडणुकीत मात्र एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. त्यामुळे अनेक गावांत पक्षांतर्गतच आघाड्यामध्येच सामना होणार आहे.

प्रभागनिहाय ताकदवान उमेदवारांचा शोध घेतला जात असून, शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. कोणाचा प्रभाव कोणत्या भागात आहे, त्यानुसार उमेदवारांची निवड केली जात आहे. एकाच जागेवर दोन-तीन इच्छुक असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची? ही पॅनेलप्रमुखांसमोर डोकेदुखी आहे. इतर संस्थेत संधी देण्याचे आश्वासन देऊन बंडोबा थंड होतो का? याची चाचपणीही नेतृत्वाला करावी लागत आहे. आघाड्यांच्या राजकारणात जागा वाटपांवर अनेक ठिकाणी पेच निर्माण झाले आहेत. इच्छुकांकडून मतदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्याने ऐन थंडीत गावगाड्यातील राजकारण तापू लागले आहे.

सरपंच आरक्षणासाठी ठोकताळे

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण काढले जाणार असल्याने इच्छुकांची कोंडी झाली आहे. मागील दोन पंचवार्षिकमध्ये कोणते आरक्षण होते, आता काय पडू शकते. याचे ठोकताळे बांधले जात आहेत.

दाखल्यांसाठी धावाधाव

ग्रामपंचायत निवडणूक अचानक जाहीर झाल्याने राखीव गटातील इच्छुकांची गोची झाली आहे. ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत, तिथे इच्छुकांची धावाधाव सुरू झाली आहे.

- राजाराम लोंढे