शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

कोरे-सरुडकर यांच्यातच रंगणार सामना

By admin | Updated: June 16, 2014 00:40 IST

राजू शेट्टी यांची भूमिका निर्णायक : भारत पाटील, अमर पाटील यांची उमेदवारी कोरे यांना अडचणीची

राजाराम कांबळे ल्ल मलकापूरशाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी डझनभर इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मात्र, विद्यमान आमदार विनय कोरे व माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यातच मुख्य लढत रंगणार आहे. खासदार राजू शेट्टी यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील व काँग्रेसचे अमर पाटील यांची उमेदवारी विनय कोरे यांची डोकेदुखी वाढविणारी आहे.‘राष्ट्रवादी’चे कार्याध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, ‘काँग्रेस’चे कर्णसिंह गायकवाड हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की, अन्य कोणाला पाठिंबा देणार यावर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुनर्रचनेनंतर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शाहूवाडी तालुका आणि पन्हाळ्यातील दहा जिल्हा परिषद गटात मतदारसंघाची बांधणी उमेदवाराला करावी लागते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांना १ लाख ६ हजार १९३ मते मिळाली, काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना ६३ हजार २१३ मते मिळाली. राजू शेट्टी यांना ४२ हजार ९८० मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा निवडणुकीत दबदबा राहणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने फारसे समाधानकारक नाही. मोदी लाटेत शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना दिलेला पाठिंबा जनतेला मान्य झाला नाही. त्यामुळे मातब्बर दोन्ही गायकवाड गट, सरुडकर गट व जनसुराज्य पक्षाचा धुव्वा उडाला. त्यामुळे आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील यांना विधानसभा निवडणूक सोपी नसल्याचा जनतेने इशारा दिला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड गटाची युती झाली. या आघाडीने चार जिल्हा परिषद व सात पंचायत समितीचे उमेदवार निवडून आणले, तर आमदार विनय कोरे व राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांच्या युतीने पंचायत समितीची एक जागा व मलकापूर नगर परिषदेवर सत्ता स्थापन केली. या साडेचार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळेल.मानसिंगराव गायकवाड यांनी सरुडकर गटाशी साधलेली जवळीक, तर कर्णसिंह गायकवाड गटाचे जनसुराज्यशी वाढलेले संबंध, शिवसेनेत असलेला अंतर्गत कलह, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाढत असलेले महत्त्व या सर्व बाबींचा विचार करता आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. पन्हाळ्यातून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारत पाटील आणि अमर पाटील यांनी केलेली विधानसभेची तयारी आमदार विनय कोरे यांना अडचणीची ठरणार आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सेनेची उमेदवारी घेणार, अशी केलेली जाहीर भूमिका तर सेनेतील उपजिल्हाप्रमुख जयवंतराव काटकर व निष्ठावंत शिवसैनिकांनी या उमेदवारीला विरोध जाहीर केला आहे. त्यामुळे सत्यजित पाटील यांना देखील ही निवडणूक सोपी नाही. युवासेना उपाध्यक्ष युवराज काटकर, ‘दलित महासंघा’चे कार्याध्यक्ष रमेश चांदणे ‘भाजप’चे राजू प्रभावळकर, ‘शेतकरी संघटने’चे माजी सरपंच संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य योगिराज गायकवाड, कर्णासिंह गायकवाड, मानसिंगराव गायकवाड या उमेदवारांनी आगामी विधानसभेची चाचपणी सुरू आहे.आज घडीला विधानसभा निवडणुकीचे चित्र अस्पष्ट असले, तरी आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील अशी लढत होणार आहे. या दोन्ही गटांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.