शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील सात उमेदवारांना 'मॅट'चा दिलासा; निवड रद्दचा आदेश ठरवला चुकीचा

By उद्धव गोडसे | Updated: May 19, 2024 17:45 IST

जाहिरात प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न.

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत घेतलेल्या परीक्षेतून आणि छाननी प्रक्रियेतून स्टाफ नर्स पदासाठी निवड झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सदोष ठरवून विभागाने सात उमेदवारांची निवड रद्द केली होती. यावर संबंधित उमेदवारांनी महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजेच मॅटमध्ये दाद मागितली असता, मॅटने आरोग्य विभागाच्या जाहिरात प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून सात उमेदवारांची निवड रद्द करण्याचा निर्णय अयोग्य ठरवला. यामुळे सात उमेदवारांना दिलासा मिळाला.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ऑगस्ट २०२३ मध्ये स्टाफ नर्स पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जाहिरातीनुसार प्रीती चौहान (रा. कणेरीवाडी, ता. करवीर), शुभदा कांबळे (रा. बालिंगा, ता. करवीर), धनश्री पोवार (रा. सुभाषनगर, कोल्हापूर), सायली मिसाळ (रा. वडणगे, ता. करवीर), निशात अत्तार (रा. सांगली), अरुणा दांडेगावकर (रा. नांदेड) आणि कांचन खाडे (रा. ठाणे) यांनी अर्ज भरला होता. परीक्षेनंतर आरोग्य विभागाच्या कोल्हापूर परिमंडळाने कागदपत्रांची छाननी करून अर्जदारांनी निवड केली. त्यांना नियुक्तीपत्रही दिले. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत बदल केल्याचे कारण देत सात उमेदवारांची निवड रद्द केली. याबाबत संबंधित उमेदवारांनी ॲड. योगेश जोशी (कुडीत्रेकर) यांच्यामार्फत मुंबईत मॅटमध्ये दाद मागितली. मॅटच्या अध्यक्षांनी आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया तपासून आणि ॲड. जोशी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून सात उमेदवारांची निवड रद्द करण्याचा निर्णय अयोग्य ठरवला. विशेष म्हणजे अवघ्या आठवड्यात हा निकाल लागला.

दोन जाहिरातींमुळे गोंधळसार्वजनिक आरोग्य विभागाने सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत शासकीय शैक्षणिक संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी कोटा पद्धतीचा उल्लेख केला नव्हता. त्यानंतर आठवड्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत शुद्धीपत्रकाचा उल्लेख न करताच कोटा पद्धतीचा अवलंब केला. मात्र, त्यापूर्वीच भरलेल्या अर्जांसंदर्भात काहीच निर्णय घेतला नाही. कोटा पद्धत लागू केल्याचे उमेदवारांना कळवलेही नाही. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, अशी माहिती उमेदवारांनी दिली.

जाहिरातीसंदर्भात शुद्धीपत्रक न काढणे आणि कोटा पद्धती उमेदवारांना न कळवणे ही आरोग्य विभागाची गंभीर चूक होती. त्याचा फटका उमेदवारांना बसून त्यांचे करिअर धोक्यात आले होते. यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला. - ॲड. योगेश जोशी (कुडीत्रेकर)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर