शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

कोल्हापूर : रताळी, खजूर, फळांना मागणी, शारदीय नवरात्रौत्सवामुळे बाजार फुलला; भाज्या स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:50 IST

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजारात विशेषत: रताळी, खजूर, फळांना ग्राहकांची मागणी होती; तर दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते; पण ऐन सणामध्ये सरकी तेलाच्या किलोदरात वाढ होऊन ते ९० रुपयांवरून ९२ रुपयांवर जाऊन पोहोचले.

ठळक मुद्देरताळी, खजूर, फळांना मागणी, भाज्या स्थिरशारदीय नवरात्रौत्सवामुळे बाजार फुलला

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजारात विशेषत: रताळी, खजूर, फळांना ग्राहकांची मागणी होती; तर दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते; पण ऐन सणामध्ये सरकी तेलाच्या किलोदरात वाढ होऊन ते ९० रुपयांवरून ९२ रुपयांवर जाऊन पोहोचले.बुधवार (दि. १०)पासून शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात होत आहे. लक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजारात कोबी, दुधी भोपळा, मेथीच्या पेंढीसह टोमॅटोचे ढीगच्या ढीग लागले होते. तसेच मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, सीताफळ, अननस, पपई, केळी या फळांना मागणी होती. घाऊक बाजारात रताळी दहा किलोंना १२० रुपये; तर किरकोळ बाजारात ४० रुपये, खजूर १०० रुपये, काळा खजूर १५० ते ४०० रुपयांपर्यंंत; वरी ६० पासून ८० रुपयांपर्यंत असा दर झाला आहे.

रताळ्यांबरोबरच फळांनाही आठवडी बाजारात ग्राहकांकडून मागणी होती. त्यामुळे सफरचंदांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. (छाया : दीपक जाधव)याचबरोबर सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर स्थिर होते. कोबीचा गड्डा पाच रुपये, वांगी, ढबू मिरची, दोडका, दुधी भोपळा १५ रुपये प्रतिकिलो, टोमॅटो दहा रुपये, गवार, शेवग्याची शेंग, बिनीस ३५ रुपये, ओला वाटाणा ४५ रुपये, कारली, चवळीची शेंग, वाल, भेंडी २० रुपये, वरणा ३० रुपये, फ्लॉवर आठ ते दहा रुपये, पडवळ बंडल ८५ रुपये, कांदापात पाच रुपये पेंढी; तर पालक, पोकळा, शेपू दहा रुपये असा दर होता.तसेच शेंगतेल १२५ रुपये, सूर्यफुलाच्या तेलदरात वाढ होऊन ते ८० रुपयांवरून ८५ रुपये झाले आहे. साखर ३६ ते ३८ रुपये; तर बन्सी गहू २८ रुपये, आॅलिम्पिक गहू ३४, तर सिव्होरी ३२ रुपयांवरून ३४ रुपये झाला. आंबेमोहर तांदळाच्या दरात चार रुपयांची वाढ होऊन तो ७६ रुपये झाला.कोथिंबीर, मेथी वाढली; मका कणीस, शेंगदरात घसरणकोथिंबिरीच्या दरात वाढ होऊन ती १५ रुपये, तर गेल्या आठवड्यात मेथीच्या पेंढीचा दर दहा रुपये होता. तो आता १५ रुपये झाला; पण मका कणीस व ओली भुईमूग शेंग उतरली. कणीस पाच रुपये प्रतिनग, तर ओली भुईमूग शेंग ३० रुपये प्रतिकिलो होती. ती गेल्या आठवड्यात ३५ रुपयांजवळ होती.

फळबाजारावर नजर

  1. मोसंबी - चुमडे ५०० रुपये
  2.  संत्री - बॉक्स ४०० रुपये
  3. चिक्कू - ४० रुपये किलो
  4. सफरचंद - ६० ते ७० रुपये किलो
  5.  डाळिंब - ५० रुपये किलो
  6.  अननस - ३० ते ३५ रुपये.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर